शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

जिल्ह्यातील १,७०० कोटींच्या कर्जाचे नियोजन

By admin | Updated: May 2, 2015 01:59 IST

पिककर्जासह शेतकऱ्यांना मुदतीकर्ज तसेच विविध प्रकारच्या व्यवसायांसाठी विविध बँकांकडून दरवर्षी कर्ज वितरीत केल्या जाते.

यवतमाळ : पिककर्जासह शेतकऱ्यांना मुदतीकर्ज तसेच विविध प्रकारच्या व्यवसायांसाठी विविध बँकांकडून दरवर्षी कर्ज वितरीत केल्या जाते. यावर्षी बँकांनी जिल्ह्यात एक हजार सातशे ७०४ कोटींच्या पिककर्ज वितरणाचे नियोज केले आहे. या कर्ज वितरणाचा दरवर्षी वार्षिक आराखडा केल्या जात असतो. या आराखड्या प्रमाणे गेल्या वर्षी जिल्ह्यात एकूण दोन हजार २४ कोटींंच्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. या वितरणात सर्वाधिक ४६६ कोटींचा वाटा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा होता. गेल्यावर्षी पिककर्ज व मुदती कजार्साठी एक हजार ९४८ कोटींचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी एक हजार ११३ कोटी रुपयांचे वितरण झाले. वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांसाठी कर्ज वितरणाला १२५ कोटीची तरतूद करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र ३४२ कोटींचे वितरण करण्यात आले आहे. अनेकजन छोट्यामोठ्या व्यवसाय, दुकानासाठी कर्ज घेतात यात किराणा, स्टेशनरी, दुध भांडार, कापड व्यवसाय यासारख्या छोट्या व्यवसायांचा समावेश आहे. या व्यवसायांकरीता गेल्या वर्षीच्या आराखड्यात ५२५ कोटींचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात ५६९ कोटी रुपये यासाठी कर्ज म्हणून वितरीत करण्यात आले आहे. घर, शिक्षण आदी स्वरुपाच्या कर्जाचाही यात समावेश आहे. गेल्या वर्षीच्या आराखड्याप्रमाणे दोन हजार ५९८ कोटींचे नियोजन असतांना दोन हजार २४ कोटींच्या कजार्चे वितरण करण्यात आले आहे. २०१५-१६ या वर्षीचा कर्ज वितरणाचा आराखडा नुकताच जाहिर करण्यात आला. त्याप्रमाणे यावर्षी कृषी व व्यवसायासाठी दोन हजार ८२७ कोटींचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात पिक कजार्साठी एक हजार ७०४ तर शेतकऱ्यांना मुदती कजार्साठी ४४ कोटींचा समावेश आहे. आराखड्याप्रमाणे सहकारी व राष्ट्रीयकृत बॅकांना त्यांच्या शाखानिहाय कर्ज वाटपाचे नियोजन करुन देण्यात आले आहे. त्याप्रमाणे वाटप करण्याच्या सूचना सर्व बँकांना करण्यात आल्या आहे. यावर्षी सुध्दा सर्वाधिक वाटप जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक करणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)