लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळ शहरात अमृत योजनेचे कामकाज गत अनेक महिन्यांपासून सुरू आहे. मात्र अद्यापही हे काम पूर्ण झाले नाही. विशेष म्हणजे या कामाची डेडलाईनही संपली आहे. मात्र खोदकाम केल्यानंतर ते अर्धवट सोडून द्यायचे आणि दुसऱ्या भागात काम करायचे, असा प्रकार सुरू आहे. उघड्या खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. आता पावसाळ्यातही तक्रारींची दखल न घेतल्याने यवतमाळकरांनी स्वत:च टिकास पावडे हातात घेऊन नाल्या बुजविणे सुरू केले आहे.यवतमाळ शहरातील कुठल्याही भागात जा, आपल्याला रस्ते खोदलेले दिसतात. खोदलेले रस्ते थातूरमातूर काम करून बुजविले जातात. आता त्या ठिकाणी खड्डे पडत आहे. तर शहरातील अंतर्गत वसाहतीमध्ये हे खड्डेही अनेक ठिकाणी उघडे ठेवले आहे. तर काही भागात संपूर्ण रस्त्यावर माती पसरलेली आहे. काही ठिकाणी हापसीही या मातीच्या ढिगाºयात निकामी करण्याचा प्रयत्न झाला आहे.आता या भागात दैयनीय अवस्था आहे. पाईपलाईन झाली पण अजूनही पाणी नाही. खड्डे तसेच आहेत. यामुळे अपघात होत आहेत. प्राधिकरण आणि नगरपरिषदेला सांगितल्यावरही उपाययोजना झाल्या नाही. यामुळे काही भागात नागरिकांनी स्वत:च टिकास पावडे घेत खड्डे बुजविणे सुरू केले आहे.बोरेलेनगर : नवीन रस्ता झाल्यावरच कामबोरेलेनगरातील काही नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदविल्या. हितेंद्र पांडे म्हणाले, दोन महिन्यांपासून साई सहवास नगरातील खड्डे बुजवायचे आहेत. या भागात रोज अपघात होतात. पवन येलमुळे म्हणाले, पहिले केबलधारकांनी रस्ते खोदले, आता प्राधिकरणाने रस्ते खोदून ठेवले. कालीकाप्रसाद मूर्ती यांनी प्राधिकरण व पालिकेच्या कामावर नाराजी नोंदविली.अमृत योजनेत पाईपलाईन टाकण्यासोबत खोदलेले खड्डे बुजविण्याची जबाबदारी प्राधिकरणाची आहे. नाली बुजविताना माती दबते. यामुळे दोन चार दिवस वाट पाहून नंतर ती बुजविली जाते.- सुरेश हुंगे, कार्यकारी अभियंता, जीवन प्राधिकरणअमृत योजनेतील पाईपलाईनचे काम आमच्याकडे नाही. ही जबाबदारी जीवन प्राधिकरणाची आहे. तेच खोदलेला रस्ता बुजविणार आहेत.- विनय देशमुख, अभियंता, नगरपालिका यवतमाळ
पाणीपुरवठा योजनेच्या नावाखाली खड्डेच खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:00 IST
यवतमाळ शहरातील कुठल्याही भागात जा, आपल्याला रस्ते खोदलेले दिसतात. खोदलेले रस्ते थातूरमातूर काम करून बुजविले जातात. आता त्या ठिकाणी खड्डे पडत आहे. तर शहरातील अंतर्गत वसाहतीमध्ये हे खड्डेही अनेक ठिकाणी उघडे ठेवले आहे. तर काही भागात संपूर्ण रस्त्यावर माती पसरलेली आहे. काही ठिकाणी हापसीही या मातीच्या ढिगाºयात निकामी करण्याचा प्रयत्न झाला आहे.
पाणीपुरवठा योजनेच्या नावाखाली खड्डेच खड्डे
ठळक मुद्देबुजवणार कोण ? : नागरिकांच्या तक्रारींचीही दखल नाही, अपघात वाढले