शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

शेतकऱ्यांसाठी पायलट प्रोजेक्ट

By admin | Updated: August 20, 2016 00:04 IST

यवतमाळ आणि उसमानाबाद जिल्हा शेतकरी आत्महत्या प्रवण म्हणून ओळखला जातो.

पांडुरंग फुंडकर : यवतमाळ, उस्मानाबादसाठी ११०० कोटी यवतमाळ : यवतमाळ आणि उसमानाबाद जिल्हा शेतकरी आत्महत्या प्रवण म्हणून ओळखला जातो. या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासनातर्फे ११०० कोटींचा पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येणार असल्याची घोषणा कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी शुक्रवारी येथे केली. येथील वसंतराव नाईक जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या मुले आणि मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री संजय राठोड, ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवीप्रकाश दाणी, कृषि शास्त्रज्ञ डॉ. चारूदत्त माई, कुलसचिव डॉ. कडू, नितीन हिवसे, गोपी ठाकरे, अधिष्ठाता डॉ. भाले उपस्थित होते. फुंडकर यांनी शेतीची स्थिती सुधारण्यासोबतच आत्महत्या प्रवण यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ११०० कोटींचा प्रायोगिक प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. शेतीशी निगडीत जोडधंदा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. जोडधंद्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. या माध्यमातून कृषिला पुन्हा वैभवाचे दिवस प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी महाविद्यालयांतील संशोधन, उद्दिष्ठांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे कृषीमंत्री फुंडकर यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी) ‘ती’ महाविद्यालये बंद करणार विद्यार्थ्यांसाठी कृषि महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली. मात्र या महाविद्यालयांकडे कोणतीही सुविधा नाही. केवळ व्यवस्थापन कोट्यातून देणगी घेऊन ही महाविद्यालये प्रवेश देण्याचे काम करतात. येत्या तीन महिन्यात सुविधा नसणाऱ्यांची मान्यता रद्द करण्यात येणार असल्याचे फुंडकर यांनी सांगितले.