टँकरची मागणी : अरुणावती प्रकल्प वसाहतीची समस्याआर्णी : अरुणावती प्रकल्प वसाहतीमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या भागातील संतप्त महिलांनी नगरपरिषदेवर धडक देऊन टँकरची मागणी केली. आर्णी शहरात सर्वत्र टंचाईच्या पार्श्वभूमीवर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र शहराला लागूनच असलेल्या अरुणावती प्रकल्पामधील वसाहतीतही गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईची समस्या भीषण बनली आहे. पिण्यासाठी पाणी मिळणेही कठीण झाले आहे. पूर्वी येथे बोअरवेलवरून पाणीपुरवठा होत होता. आता तोही जलस्त्रोत आटला आहे. या भागात रोज चार टँकरद्वारे विहिरीत पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी महिलांनी केली आहे. टँकरच्या मागणीसाठी निवेदन घेऊन महिला नगरपरिषदेवर धडकल्या. मात्र नगराध्यक्ष हजर नसल्यामुळे महिलांनी नगराध्यक्षांच्या रिकाम्या खुर्चीवरच निवेदन ठेवून वेगळ्या पद्धतीने निषेध नोंदविला. या निवेदनावर चौधरी, शकुंतलाबाई नागपूरकर, इंगळे, पवार, कोयरे, राधिका भोगे, अलका राठोड, हिरा पवार, बोरगावकर, एस.आर. धन्नासेठ, गायत्री टेकाम, जोगदंडे, बांबोडे, गावंडे आदी महिलांच्या स्वाक्षरी आहेत. (शहर प्रतिनिधी)
पालिकेवर महिलांची धडक
By admin | Updated: June 20, 2016 02:18 IST