शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

काळी रेंजमध्ये उपवनसंरक्षकांची पेट्रोलिंग

By admin | Updated: October 27, 2016 01:04 IST

काळीदौलत रेंजमध्ये उपवनसंरक्षकांची पेट्रोलिंग सुरू असताना महागावचे वनपरिक्षेत्र अधिकारी (रेंजर) नॉट रिचेबल आढळून आले.

रेंजर नॉट रिचेबल : ‘हॅमर’पुरते सांभाळले जाते कार्यालय महागाव : काळीदौलत रेंजमध्ये उपवनसंरक्षकांची पेट्रोलिंग सुरू असताना महागावचे वनपरिक्षेत्र अधिकारी (रेंजर) नॉट रिचेबल आढळून आले. मागील आठ दिवसांपासून महागावचे रेंजर दिग्रस येथे मुक्कामी होते. यावेळी त्यांचा मोबाईलही बंद होता. अधिकारीच मुख्यालयी नसल्यामुळे दोनही रेंजमध्ये सागवानाची अवैध वृक्षतोड आणि वन्यप्राण्यांच्या शिकारीत वाढ झाली आहे. पुसद विभागात शासनाचे होत असलेले नुकसान पाहता यावर नियंत्रण मिळविण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी युवा व कर्तव्यदक्ष म्हणून ख्याती असलेले उपवनसंरक्षक अरविंद मुंडे यांची नेमणूक पुसद येथे केली आहे. अरविंद मुंडे पुसद येथे रुजू झाल्यापासून अधिकारी वर्गाने चांगलीच धास्ती घेतली आहे. ते रात्री अपरात्री सर्व परिसर पिंजून काढत आहे. परंतु महागाव-काळी दौलतचे अधिकारी याला अपवाद ठरत आहे. थेट वनमंत्र्यांचे आदेश असतानाही अधिकारी मुख्यालयी न राहता पुसद, दिग्रस येथून आपल्या रेंजचा कारभार पाहतात. परिणामी शासकीय योजना आणि जंगलाच्या सुरक्षिततेवर परिणाम झाला आहे. आठ दिवसांपूर्वी स्वत: मुंडे यांनी रात्री २ वाजता महागाव रेंजरच्या मोबाईलवर कॉल केला असता त्यांचा मोबाईल स्वीच आॅफ आला. महागाव, काळीदौलत रेंजमध्ये वर्षाला किमान १२०० मीटर सागवान पट्टी निघत असल्याची माहिती आहे. मालकी पट्ट्यात मिळणारा मार्जीन मनी मीटरला चार हजार रुपये घेण्यात येत असल्याची माहिती एका सागवान ठेकेदाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे. १२०० मीटर तुटलेल्या सागवानाचे चार हजार रुपये मीटर मार्जीन धरला तरी अलिखित व्यवहारात वर्षाला ४८ लाख रुपयांची उलाढाल सहज होत आहे. या मार्जीन मनीचे पाट मुख्य वनसंरक्षक कार्यालयापर्यंत पोहोचत आहे. परंतु अरविंद मुंडे आल्यापासून या कार्यालयापुरता त्याला ब्रेक लावण्यात आला आहे. महागाव आणि काळीदौलत रेंजरकरिता विशेष सहायक वनसंरक्षक कार्यालय देण्यात आले असून येथील अधिकाऱ्यांची कार्यक्षमता पाहता वरिष्ठांनी पुसदचे सहायक वनसंरक्षक अधिकारी के.पी. धुमाळ यांना महागाव व काळीदौलत रेंजमध्ये लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. दोनही रेंजमधील मालकी पट्ट्यात सागवान वृक्षाची कटाई होत असून तेवढे वृक्ष लावण्याची सक्ती असूनही एकही वृक्ष लावले जात नाही. याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. (शहर प्रतिनिधी)