शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
3
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
4
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
5
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
6
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
7
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
8
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
9
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
10
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
11
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
12
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
13
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
14
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
15
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
16
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
17
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
18
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
19
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
20
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?

काळी रेंजमध्ये उपवनसंरक्षकांची पेट्रोलिंग

By admin | Updated: October 27, 2016 01:04 IST

काळीदौलत रेंजमध्ये उपवनसंरक्षकांची पेट्रोलिंग सुरू असताना महागावचे वनपरिक्षेत्र अधिकारी (रेंजर) नॉट रिचेबल आढळून आले.

रेंजर नॉट रिचेबल : ‘हॅमर’पुरते सांभाळले जाते कार्यालय महागाव : काळीदौलत रेंजमध्ये उपवनसंरक्षकांची पेट्रोलिंग सुरू असताना महागावचे वनपरिक्षेत्र अधिकारी (रेंजर) नॉट रिचेबल आढळून आले. मागील आठ दिवसांपासून महागावचे रेंजर दिग्रस येथे मुक्कामी होते. यावेळी त्यांचा मोबाईलही बंद होता. अधिकारीच मुख्यालयी नसल्यामुळे दोनही रेंजमध्ये सागवानाची अवैध वृक्षतोड आणि वन्यप्राण्यांच्या शिकारीत वाढ झाली आहे. पुसद विभागात शासनाचे होत असलेले नुकसान पाहता यावर नियंत्रण मिळविण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी युवा व कर्तव्यदक्ष म्हणून ख्याती असलेले उपवनसंरक्षक अरविंद मुंडे यांची नेमणूक पुसद येथे केली आहे. अरविंद मुंडे पुसद येथे रुजू झाल्यापासून अधिकारी वर्गाने चांगलीच धास्ती घेतली आहे. ते रात्री अपरात्री सर्व परिसर पिंजून काढत आहे. परंतु महागाव-काळी दौलतचे अधिकारी याला अपवाद ठरत आहे. थेट वनमंत्र्यांचे आदेश असतानाही अधिकारी मुख्यालयी न राहता पुसद, दिग्रस येथून आपल्या रेंजचा कारभार पाहतात. परिणामी शासकीय योजना आणि जंगलाच्या सुरक्षिततेवर परिणाम झाला आहे. आठ दिवसांपूर्वी स्वत: मुंडे यांनी रात्री २ वाजता महागाव रेंजरच्या मोबाईलवर कॉल केला असता त्यांचा मोबाईल स्वीच आॅफ आला. महागाव, काळीदौलत रेंजमध्ये वर्षाला किमान १२०० मीटर सागवान पट्टी निघत असल्याची माहिती आहे. मालकी पट्ट्यात मिळणारा मार्जीन मनी मीटरला चार हजार रुपये घेण्यात येत असल्याची माहिती एका सागवान ठेकेदाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे. १२०० मीटर तुटलेल्या सागवानाचे चार हजार रुपये मीटर मार्जीन धरला तरी अलिखित व्यवहारात वर्षाला ४८ लाख रुपयांची उलाढाल सहज होत आहे. या मार्जीन मनीचे पाट मुख्य वनसंरक्षक कार्यालयापर्यंत पोहोचत आहे. परंतु अरविंद मुंडे आल्यापासून या कार्यालयापुरता त्याला ब्रेक लावण्यात आला आहे. महागाव आणि काळीदौलत रेंजरकरिता विशेष सहायक वनसंरक्षक कार्यालय देण्यात आले असून येथील अधिकाऱ्यांची कार्यक्षमता पाहता वरिष्ठांनी पुसदचे सहायक वनसंरक्षक अधिकारी के.पी. धुमाळ यांना महागाव व काळीदौलत रेंजमध्ये लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. दोनही रेंजमधील मालकी पट्ट्यात सागवान वृक्षाची कटाई होत असून तेवढे वृक्ष लावण्याची सक्ती असूनही एकही वृक्ष लावले जात नाही. याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. (शहर प्रतिनिधी)