शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

काळी रेंजमध्ये उपवनसंरक्षकांची पेट्रोलिंग

By admin | Updated: October 27, 2016 01:04 IST

काळीदौलत रेंजमध्ये उपवनसंरक्षकांची पेट्रोलिंग सुरू असताना महागावचे वनपरिक्षेत्र अधिकारी (रेंजर) नॉट रिचेबल आढळून आले.

रेंजर नॉट रिचेबल : ‘हॅमर’पुरते सांभाळले जाते कार्यालय महागाव : काळीदौलत रेंजमध्ये उपवनसंरक्षकांची पेट्रोलिंग सुरू असताना महागावचे वनपरिक्षेत्र अधिकारी (रेंजर) नॉट रिचेबल आढळून आले. मागील आठ दिवसांपासून महागावचे रेंजर दिग्रस येथे मुक्कामी होते. यावेळी त्यांचा मोबाईलही बंद होता. अधिकारीच मुख्यालयी नसल्यामुळे दोनही रेंजमध्ये सागवानाची अवैध वृक्षतोड आणि वन्यप्राण्यांच्या शिकारीत वाढ झाली आहे. पुसद विभागात शासनाचे होत असलेले नुकसान पाहता यावर नियंत्रण मिळविण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी युवा व कर्तव्यदक्ष म्हणून ख्याती असलेले उपवनसंरक्षक अरविंद मुंडे यांची नेमणूक पुसद येथे केली आहे. अरविंद मुंडे पुसद येथे रुजू झाल्यापासून अधिकारी वर्गाने चांगलीच धास्ती घेतली आहे. ते रात्री अपरात्री सर्व परिसर पिंजून काढत आहे. परंतु महागाव-काळी दौलतचे अधिकारी याला अपवाद ठरत आहे. थेट वनमंत्र्यांचे आदेश असतानाही अधिकारी मुख्यालयी न राहता पुसद, दिग्रस येथून आपल्या रेंजचा कारभार पाहतात. परिणामी शासकीय योजना आणि जंगलाच्या सुरक्षिततेवर परिणाम झाला आहे. आठ दिवसांपूर्वी स्वत: मुंडे यांनी रात्री २ वाजता महागाव रेंजरच्या मोबाईलवर कॉल केला असता त्यांचा मोबाईल स्वीच आॅफ आला. महागाव, काळीदौलत रेंजमध्ये वर्षाला किमान १२०० मीटर सागवान पट्टी निघत असल्याची माहिती आहे. मालकी पट्ट्यात मिळणारा मार्जीन मनी मीटरला चार हजार रुपये घेण्यात येत असल्याची माहिती एका सागवान ठेकेदाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे. १२०० मीटर तुटलेल्या सागवानाचे चार हजार रुपये मीटर मार्जीन धरला तरी अलिखित व्यवहारात वर्षाला ४८ लाख रुपयांची उलाढाल सहज होत आहे. या मार्जीन मनीचे पाट मुख्य वनसंरक्षक कार्यालयापर्यंत पोहोचत आहे. परंतु अरविंद मुंडे आल्यापासून या कार्यालयापुरता त्याला ब्रेक लावण्यात आला आहे. महागाव आणि काळीदौलत रेंजरकरिता विशेष सहायक वनसंरक्षक कार्यालय देण्यात आले असून येथील अधिकाऱ्यांची कार्यक्षमता पाहता वरिष्ठांनी पुसदचे सहायक वनसंरक्षक अधिकारी के.पी. धुमाळ यांना महागाव व काळीदौलत रेंजमध्ये लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. दोनही रेंजमधील मालकी पट्ट्यात सागवान वृक्षाची कटाई होत असून तेवढे वृक्ष लावण्याची सक्ती असूनही एकही वृक्ष लावले जात नाही. याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. (शहर प्रतिनिधी)