शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशकांचा ‘साईड ईफेक्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 22:02 IST

गावपातळीवर सध्या विविध आजारांनी थैमान घातले आहे. त्यामुळे शासकीय व खाजगी रुग्णालयात रुग्णांची मोठी संख्या आढळून येत आहे.

ठळक मुद्देअनेक शेतकरी रुग्णालयात दाखल : कृषी विभागाचे काळजी घेण्याचे आवाहन

गजानन अक्कलवार।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : गावपातळीवर सध्या विविध आजारांनी थैमान घातले आहे. त्यामुळे शासकीय व खाजगी रुग्णालयात रुग्णांची मोठी संख्या आढळून येत आहे. विशेष म्हणजे यात सर्वाधिक रुग्णसंख्याही शेतात कीटकनाशकाच्या फवारणी दरम्यान त्वचारोगाने बाधील झालेल्यांची आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.कळंब तालुक्यातील पार्डी (सावळापूर), दोनाडा, बोरीमहल आदी गावातील शेतकºयांना या रोगाचा सामना करावा लागत आहे. येथीलच ईश्वर पुरुषोत्तम पिसे, मारोती नामदेव वसू व चरणदास पुरुषोत्तम पिसे यांच्या त्वचेवर कीटकनाशक फवारणीचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यावर यवतमाळ व सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात उपचार सुुरू आहे.शेतातील पिकांवर किटकनाशक फवारणी दरम्यान नाक, तोंड व त्वचेच्या माध्यमातून विषबाधा होण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. फवारणी करणारे शेतकरी व मजूरवर्ग या आजाराला बळी पडत आहे. दरदिवशी रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे रुग्णालयेसुद्धा हाऊस फुल झाले आहेत. या प्रकारामुळे शेतीत घाम गाळणाºया शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे कीटकनाशकांची फरवाणी शेतकरी वर्ग दरवर्षीच करतो. कीटकनाशकामुळे साईड इफेक्ट होणारी एखाद दुसरी घटना घडायची. परंतु यावर्षी अशा घटना मोठ्या प्रमाणात घडू लागल्या आहे. हा सर्व प्रकार वातावरणातील बदलामुळे की किटकनाशकातील रासायनिकतेचा परिणाम आहे, हा संशोधनाचा विषय ठरू पाहत आहे.फवारणीदरम्यान मास्क वापरणे गरजेचेफवारणी करताना सुरक्षेबाबत दक्ष राहणे गरजेचे आहे. वाºयाच्या दिशेने फवारणी करावी. त्यामुळे औषधी अंगावर उडणार नाही. नाका-तोंडावर मास्क वापरावा. हात व अंग स्वच्छ धुवावे. पावसाने उसंत घेतल्याने बहुतेक शेतकरी फवारणीकडे वळला आहे. त्यामुळे सुरक्षिततेची काळजी न घेतल्यामुळे कदाचीत त्वचा रोगाचे प्रमाण वाढले असू शकते, अशी माहिती कृषी शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद यादगीरवार यांनी दिली.मागील आठवड्यापासून किटकनाशक फवारणी करताना विषबाधा होण्याचे प्रमाण वाढत आहे. रोज दोन ते तीन रूग्ण रुग्णालयात दाखल होत आहे.- डॉ.रवी पाटील, वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय, कळंब