शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हिवताप अधिकार्‍याकडून प्रकल्पग्रस्तांचा छळ

By admin | Updated: May 27, 2014 01:11 IST

केवळ आर्थिक स्वार्थ ठेऊन यवतमाळच्या जिल्हा हिवताप अधिकार्‍यांनी सात प्रकल्पग्रस्तांचा गेल्या काही वर्षांपासून छळ चालविला आहे. हे प्रकल्पग्रस्त ‘प्रतिसाद’ देत नसल्याने

यवतमाळ : केवळ आर्थिक स्वार्थ ठेऊन यवतमाळच्या जिल्हा हिवताप अधिकार्‍यांनी सात प्रकल्पग्रस्तांचा गेल्या काही वर्षांपासून छळ चालविला आहे. हे प्रकल्पग्रस्त ‘प्रतिसाद’ देत नसल्याने हेतुपुरस्सर त्यांच्या प्रस्तावात चुकीची माहिती नमूद केली जात असून प्रशासनालाही खोटी माहिती पुरविली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष असे जिल्हा हिवताप अधिकारी हे आमदार, आपले वरिष्ठ सहसंचालक, जिल्हाधिकार्‍यांनाही जुमानत नसल्याचे दिसून येते. सदर अधिकारी यापूर्वी अमरावती जिल्ह्यात असतानाही अशाच कारभारामुळे वादग्रस्त ठरले होते. या अधिकार्‍यांना संबंधित दोन लिपिकांचाही हातभार असल्याचे सांगितले जाते. जिल्हा हिवताप विभागाची प्रकल्पग्रस्तांची सात जणांची यादी आहे. परंतु या यादीतील एकालाही अद्याप नोकरीची संधी मिळाली नाही. यामागे जिल्हा हिवताप अधिकार्‍याचेच षडयंत्र असल्याचे सांगितले जाते. या कार्यालयाकडून जिल्हाधिकार्‍यांकडे प्रकल्पग्रस्तांची यादी पाठविताना हेतुपुरस्सर चुकीची माहिती सादर केली जात आहे. जन्म तारीख बदलणे, नाव बदलणे, राहण्याचे ठिकाण बदलणे असे प्रकार केले जात आहे. एक नव्हे तर सर्वच उमेदवारांना याचा अनुभव आला आहे. प्रस्ताव नाकारला जावा आणि उमेदवार भेटीसाठी यावा हाच उद्देश या कारभारामागे असल्याचे सांगितले जाते. आपल्या सोईसाठी अनेक उमेदवारांना संवर्ग बदलून खुल्या प्रवर्गातून अर्ज करण्याचा उफराटा सल्ला दिला जातो आहे. याच अधिकार्‍याने काही प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या वडिलांनाही असाच त्रास दिल्याच्या तक्रारी आहे. एक तर हे कार्यालय माहिती देत नाही आणि माहितीच्या अधिकारात अर्ज टाकल्यास नोकरी करायची नाही का अशा सुरात तंबी देते. जिल्हा हिवताप अधिकार्‍यांनाच प्रकल्पग्रस्तांबाबतचे अधिकार आहे, असे स्पष्ट आदेश अकोल्याच्या सहायक संचालकांनी दिले असतानाही येथील अधिकारी हात वर करीत आहे. मोर्शीचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी सदर अधिकार्‍याची १७ डिसेंबर २०१३ रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सवनीक यांच्याकडे रितसर तक्रार केली होती. १० मार्च रोजी येथील जिल्हाधिकार्‍यांनीसुद्धा प्रकल्पग्रस्तांचा अचूक प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. मात्र अद्याप त्यांनाही प्रस्ताव पोहोचला नाही. यावरून जिल्हा हिवताप अधिकारी कुणालाच जुमानत नसल्याचे स्पष्ट होते. (प्रतिनिधी)