शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

सक्तीच्या वसुलीमुळे घबराहट

By admin | Updated: December 3, 2014 22:58 IST

बँकांकडून सक्तीची वसुली होत नसल्याचे कितीही दावे करण्यात येत असले तरी ग्रामीण भागात मात्र बँकेचे वसुली पथक घरोघरी फिरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराहट पसरली आहे.

शेतकऱ्यांच्या मागे बँकेचा तगादा : दोन वर्षाच्या नापिकीमुळे आर्थिक संकटमहागाव कसबा : बँकांकडून सक्तीची वसुली होत नसल्याचे कितीही दावे करण्यात येत असले तरी ग्रामीण भागात मात्र बँकेचे वसुली पथक घरोघरी फिरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराहट पसरली आहे.गेल्या दोन-तीन वर्षांपासून जिल्ह्यात पाहिजे तसे शेतीचे उत्पादन झाले नाही. कधी अतिवृष्टी, गारपीट तर कधी अत्यल्प पाऊस यामुळे जिल्ह्यातील नगदी समजले जाणारे कापूस व सोयाबीनसारखे पिकही शेतकऱ्यांना तारू शकले नाही. आधीचेच कर्ज अंगावर असल्यामुळे बँका नवीन कर्ज देण्यास तयार नाही. त्यातच जुन्या कर्जासाठी शेतकऱ्यांच्या मागे सततचा तगादा बँकांनी लावल्याचे ग्रामीण भागात दिसून येत आहे. केवळ बँकांचेच नाही तर सध्या शेतकऱ्यांच्या अंगावर कृषी केंद्र व इतर शेती साहित्य विक्रेत्यांचे कर्ज आहे. अशावेळी कुणाकुणाचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत शेतकरी सापडलेला आहे. सध्याच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांजवळ कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी दमडीही नाही. अशा स्थितीत बँक व लोकांचे देणे कसे करावे, हा मोठा प्रश्न आहे. अशा स्थितीत अनेकांनी खासगी सावकारांचे कर्जही घेतले आहे. परंतु बँका व कर्जदार थांबण्याच्या स्थितीत नाही. बँकेचे वसुली पथक शेतकऱ्यांच्या मागेच लागले आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून दुचाकीसाठी कर्ज घेतले होते. परंतु नापिकीमुळे ते या कर्जाचे हप्तेही भरू शकले नाही. आता मात्र वाहनाच्या वसुलीसाठी बँकेचे पथक तगादा लावत आहे. परिसरातील काही शेतकऱ्यांच्या तर दुचाकी ओढून नेण्यात आल्या आहे. अशा परिस्थितीत शासनसुद्धा कोणत्याही प्रकारचे ठोस निर्णय घेण्यास तयार नाही. राज्यात आलेले नवीन सरकार अजूनही स्थिरावले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी कोणतीही ठोस घोषणा भाजपा सरकारने केलेली नाही. शेतकऱ्यांना राज्यातील सत्ता परिवर्तनातून मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु अद्याप तरी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असे कोणतेही चित्र शासनाकडून दिसून येत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मते मिळवून सत्ता काबीज करणाऱ्या भाजपा सरकारबाबत आता मात्र शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. बँक तोट्यात असल्याचे कारण सांगून वसुली सुरू आहे. यातच संचालकांच्या जवळच्या लोकांना मात्र वसुलीतून वगळण्यात येत आहे. अशा स्थितीत काय करावे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. भारनियमनामुळे रबी पिकालाही ओलित करणे कठीण झाले आहे. वीज कंपनीसुद्धा वसुलीच्या मागे लागली आहे. शासनाने यामध्ये त्वरित मार्ग काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आहे. (वार्ताहर)