शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

पावसाळ्यापूर्वी कामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2015 02:18 IST

जलयुक्त शिवार अतिशय महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. भविष्यात यातून पाणीटंचाईवर पुर्णपणे मात होणार आहे.

यवतमाळ : जलयुक्त शिवार अतिशय महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. भविष्यात यातून पाणीटंचाईवर पुर्णपणे मात होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाअंतर्गत होत असलेली कामे गुणवत्तापुर्वक होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील अशा कामांची पाहणी करण्यासाठी जिल्हास्तरीय दक्षता पथकासह त्रयस्थ संस्थेची नेमणूक करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. पावसाळ्यापूर्वी जलयुक्त शिवारची कामे पूर्ण करण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले. महसुल भवन येथे जलयुक्त शिवार तसेच सिमेंट नाला बांधातील गाळ काढण्याच्या कामाचा त्यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, उपजिल्हाधिकारी फडके, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, उपविभागीय अधिकारी विकास माने, उपवनसंरक्षक धामगे यांच्यासह पाणी पुरवठा, जलसंपदा, कृषी आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जलयुक्त शिवार अंतर्गत होत असलेली सर्व कामे पावसाळ्यापुर्वी होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने संबंधीत विभागांनी कामाला गती देणे आवश्यक आहे. या कार्यक्रमांतर्गत होत असलेली कामे अंदाजपत्रकानुसार तसेच निकषाप्रमाणे केली जात आहेत का याची पाहणी त्रयस्थ संस्था नेमूण त्यांच्याकडून केली जातील. जिल्हास्तरावर बांधकाम व जलसंपदा विभागाच्या अधिक्षक अभियंत्यांची जिल्हा दक्षता पथकाची नेमणूक केली जाईल. या पथकाकडून कामाची गुणवत्ता तसेच निकषाप्रमाणे कामे होत आहेत का हे पाहल्या जातील. यात त्रृट्या किंवा गैरप्रकार आढळूण आल्यास संबंधीतांवर निलंबनाची कार्यवाही केली जातील, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात कृषी व वन विभागाचे अनेक सिमेंट नाला बंधारे आहेत. या बंधाऱ्यामधील गाळ काढण्यासोबतच खोलीकरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. कोल्हापुरी पध्दतीच्या बंधाऱ्याचा सुयोग्य वापर होण्यासाठी त्याचा अभ्यास करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत होत असलेल्या प्रत्येक कामाचे मुल्यमापन होणार आहे. आपण स्वत: प्रत्येक कामास भेटी देणार असून इतर जिल्ह्याचे अधिकारीही कामांना भेटी देवून पाहणी करणार आहे. त्यामुळे सर्व कामे गुणवत्तापुर्वक आणि वेळेत करा, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी केल्या. (प्रतिनिधी)