शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

जिल्हा सहकारी बँकेचे ‘शासकीय’ ऑडिट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 05:00 IST

जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे, उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर यांनी बुधवारी अमरावती येथे सहनिबंधक राजेश दाभेराव यांची भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. त्याबाबत दाभेराव यांनी ‘लोकमत’ला माहिती दिली. ते म्हणाले, जिल्हा बँकेच्या आर्णी शाखेतील उघडकीस आलेला अपहार गंभीर आहे. बँकेने या शाखेचे त्रयस्थ ‘सीए’मार्फत तसेच अंतर्गत लेखापरीक्षण सुरू केले आहे.

ठळक मुद्देबोलावले सीईओंना, गेले अध्यक्ष-उपाध्यक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्णी शाखेतील अपहाराचा सहकार प्रशासनाने धसका घेतला आहे. त्यामुळेच केवळ आर्णी शाखाच नव्हे, तर जिल्हा बँकेच्या सर्व शाखांचे शासकीय यंत्रणेमार्फत लेखापरीक्षण करण्यात यावे, असा सल्ला अमरावतीचे विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) राजेश दाभेराव यांनी बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांना दिला आहे. विशेष असे, बँकेचे शासकीय ऑडिट व्हावे, यासाठी पोलीसही आग्रही आहेत. जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंगरे, उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर यांनी बुधवारी अमरावती येथे सहनिबंधक राजेश दाभेराव यांची भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. त्याबाबत दाभेराव यांनी ‘लोकमत’ला माहिती दिली. ते म्हणाले, जिल्हा बँकेच्या आर्णी शाखेतील उघडकीस आलेला अपहार गंभीर आहे. बँकेने या शाखेचे त्रयस्थ ‘सीए’मार्फत तसेच अंतर्गत लेखापरीक्षण सुरू केले आहे. परंतु, आपण अध्यक्षांकडे आर्णी शाखेसह इतरही शाखांचे शासकीय ऑडिटर्समार्फत लेखापरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. आर्णीतील गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे आहे. त्यामुळे पोलिसांनीही शासकीय ऑडिटवर अधिक भर दिला असल्याचे दाभेराव यांनी सांगितले. जिल्हा बँकेतील १०५ जागांच्या नोकरभरतीबाबत न्यायालयात काही याचिका दाखल आहेत. मुख्यमंत्री पोर्टलवर व शासनाकडे इतरही मार्गाने तक्रारी झाल्या आहेत. या याचिका व तक्रारींच्या प्रती बँकेला मागण्यात आल्या आहेत. मागासवर्गीयांच्या ४२ जागांबाबत अद्याप एजंसी ठरलेली नाही. कंत्राटी पदाच्या भरतीबाबतही ओरड सुरू आहे. या सर्व मुद्यांची बँकेकडून माहिती घेतली जाईल, अभ्यास केला जाईल व नंतर आवश्यकतेनुसार योग्य ती कार्यवाही केली जाणार असल्याचे सहनिबंधक दाभेराव यांनी स्पष्ट केले.  

बोलावले सीईओंना, गेले अध्यक्ष-उपाध्यक्ष जिल्हा बँकेच्या आर्णी शाखेतील अपहार, १०५ जागांची भरती, ४२ जागांची भरती, कंत्राटी भरती अशा विविध मुद्यांवर बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ३१ मार्च रोजी अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांनी समक्ष पाचारण केले होते. मात्र, सीईओंना थांबवून बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्षांनी सहनिबंधकांच्या भेटीला जाणे पसंत केले. बँकेचा एकूणच कारभार पाहता, पुन्हा आणखी एखादी कलम ८३ ची चौकशी मागे लागण्याची हुरहुर संचालक मंडळाला असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळेच अध्यक्ष-उपाध्यक्षांनी निबंधकांना भेटण्याला प्राधान्य दिल्याचा तर्क लावला जात आहे. दरम्यान, ३१ मार्च हा आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस असल्याने सीईओ येऊ शकले नाही, असे सहनिबंधक दाभेराव यांनी ‘लोकमत’कडे स्पष्ट केले.४२ जागांना न्यायालयाची सहा महिने मुदतवाढ  मागासवर्गीयांच्या ४२ जागांना गुरुवारी नागपूर उच्च न्यायालयाने सहा महिने मुदतवाढ दिली आहे. बँकेने ही मुदतवाढ मागितली होती, अशी माहिती जिल्हा बँकेचे सीईओ अरविंद देशपांडे यांनी ‘लोकमत’ला दिली. 

 

टॅग्स :bankबँक