शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

मुजोर कर्मचाऱ्यांपुढे लोकप्रतिनिधीही हतबल

By admin | Updated: June 24, 2015 00:13 IST

पंचायत समितीचे कर्मचारी पदाधिकाऱ्यांनाही जुमानत नसल्याचे प्रकार वाढीस लागले आहे.

अडवणूक : शेतकऱ्यांना सिंचन विहिरीच्या रकमेसाठी हेलपाटेसुधाकर अक्कलवार घाटंजीपंचायत समितीचे कर्मचारी पदाधिकाऱ्यांनाही जुमानत नसल्याचे प्रकार वाढीस लागले आहे. त्यामुळे समस्या मांडायच्या कुणाकडे आणि सोडविणार कोण हा प्रश्न नागरिकांपुढे निर्माण झाला आहे. आर्थिक अपेक्षा पूर्ण करूनही या कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या अडवणुकीमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांनाही या गंभीर प्रकाराला तोंड द्यावे लागत आहे. विशेष म्हणजे, पंचायत समितीच्या उपसभापतीने मांडलेली समस्याही निकाली काढली जात नाही, हे वास्तव आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यात विविध प्रकारची कामे हाती घेण्यात आली आहे. या योजनेचा कारभार सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू आहे. सदर योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचा लाभ देण्यात आला. शेतकऱ्यांनी मजुरांची जुळवाजुळव करत विहिरी पूर्ण केल्या. मात्र याचा मोबदला काढण्यासाठी सदर विभागातील कर्मचाऱ्यांकडून सातत्याने अडवणूक सुरू आहे. होत असलेली अडवणूक आर्थिक अपेक्षेतून सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर ती पूर्ण केल्यानंतरही वारंवार चकरा मारण्यास भाग पाडले जाते. ही गंभीर समस्या काही शेतकऱ्यांनी उपसभापती रमेश धुर्वे यांच्याकडे मांडली. त्यांनी संबंधितांना या प्रकाराविषयी समजाविले. यानंतरही कर्मचाऱ्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये बदल झालेला नाही. हा विषय धुर्वे यांनी सभेमध्ये गटविकास अधिकाऱ्यांकडे मांडला. या अधिकाऱ्यानेही याची दखल घेतली नाही. सदर विभागातील कर्मचारी प्रत्येकवेळी नवनवीन कारणे पुढे करून लाभार्थ्यांची अडवणूक करतात. पेरणीची कामे सोडून शेतकऱ्यांना पंचायत समितीत चकरा माराव्या लागतात. या बाबीकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आहे.अधिकाऱ्यांनाही जुमानत नाहीघाटंजी पंचायत समितीचा कारभार जणू कनिष्ठ कर्मचारीच चालवितात की काय, असा प्रश्न निर्माण होतो. कुठलाही कर्मचारी पदाधिकाऱ्यांनाच काय अधिकाऱ्यांनाही जुमानत नाही. पदाधिकाऱ्यांनी सांगितलेले काम तर होतच नाही. शिवाय अधिकाऱ्यांच्या आदेशालाही ठोकरले जाते. या प्रकारात सामान्य नागरिकांची मात्र गोची होत आहे. कर्मचारी मानत नाही, अधिकारी लक्ष देत नाही आणि पदाधिकाऱ्यांचे चालत नाही. या स्थितीत ते हतबल झाले आहे. पंचायत समितीच्या वारंवार चकरा मारूनही काम होत नाही. मजुरी बुडवून दाखल्यांसाठी या कार्यालयाचे उंबरठे त्यांना झिजवावे लागत आहेत.