शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुजोर कर्मचाऱ्यांपुढे लोकप्रतिनिधीही हतबल

By admin | Updated: June 24, 2015 00:13 IST

पंचायत समितीचे कर्मचारी पदाधिकाऱ्यांनाही जुमानत नसल्याचे प्रकार वाढीस लागले आहे.

अडवणूक : शेतकऱ्यांना सिंचन विहिरीच्या रकमेसाठी हेलपाटेसुधाकर अक्कलवार घाटंजीपंचायत समितीचे कर्मचारी पदाधिकाऱ्यांनाही जुमानत नसल्याचे प्रकार वाढीस लागले आहे. त्यामुळे समस्या मांडायच्या कुणाकडे आणि सोडविणार कोण हा प्रश्न नागरिकांपुढे निर्माण झाला आहे. आर्थिक अपेक्षा पूर्ण करूनही या कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या अडवणुकीमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांनाही या गंभीर प्रकाराला तोंड द्यावे लागत आहे. विशेष म्हणजे, पंचायत समितीच्या उपसभापतीने मांडलेली समस्याही निकाली काढली जात नाही, हे वास्तव आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यात विविध प्रकारची कामे हाती घेण्यात आली आहे. या योजनेचा कारभार सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू आहे. सदर योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचा लाभ देण्यात आला. शेतकऱ्यांनी मजुरांची जुळवाजुळव करत विहिरी पूर्ण केल्या. मात्र याचा मोबदला काढण्यासाठी सदर विभागातील कर्मचाऱ्यांकडून सातत्याने अडवणूक सुरू आहे. होत असलेली अडवणूक आर्थिक अपेक्षेतून सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर ती पूर्ण केल्यानंतरही वारंवार चकरा मारण्यास भाग पाडले जाते. ही गंभीर समस्या काही शेतकऱ्यांनी उपसभापती रमेश धुर्वे यांच्याकडे मांडली. त्यांनी संबंधितांना या प्रकाराविषयी समजाविले. यानंतरही कर्मचाऱ्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये बदल झालेला नाही. हा विषय धुर्वे यांनी सभेमध्ये गटविकास अधिकाऱ्यांकडे मांडला. या अधिकाऱ्यानेही याची दखल घेतली नाही. सदर विभागातील कर्मचारी प्रत्येकवेळी नवनवीन कारणे पुढे करून लाभार्थ्यांची अडवणूक करतात. पेरणीची कामे सोडून शेतकऱ्यांना पंचायत समितीत चकरा माराव्या लागतात. या बाबीकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आहे.अधिकाऱ्यांनाही जुमानत नाहीघाटंजी पंचायत समितीचा कारभार जणू कनिष्ठ कर्मचारीच चालवितात की काय, असा प्रश्न निर्माण होतो. कुठलाही कर्मचारी पदाधिकाऱ्यांनाच काय अधिकाऱ्यांनाही जुमानत नाही. पदाधिकाऱ्यांनी सांगितलेले काम तर होतच नाही. शिवाय अधिकाऱ्यांच्या आदेशालाही ठोकरले जाते. या प्रकारात सामान्य नागरिकांची मात्र गोची होत आहे. कर्मचारी मानत नाही, अधिकारी लक्ष देत नाही आणि पदाधिकाऱ्यांचे चालत नाही. या स्थितीत ते हतबल झाले आहे. पंचायत समितीच्या वारंवार चकरा मारूनही काम होत नाही. मजुरी बुडवून दाखल्यांसाठी या कार्यालयाचे उंबरठे त्यांना झिजवावे लागत आहेत.