शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

मुजोर कर्मचाऱ्यांपुढे लोकप्रतिनिधीही हतबल

By admin | Updated: June 24, 2015 00:13 IST

पंचायत समितीचे कर्मचारी पदाधिकाऱ्यांनाही जुमानत नसल्याचे प्रकार वाढीस लागले आहे.

अडवणूक : शेतकऱ्यांना सिंचन विहिरीच्या रकमेसाठी हेलपाटेसुधाकर अक्कलवार घाटंजीपंचायत समितीचे कर्मचारी पदाधिकाऱ्यांनाही जुमानत नसल्याचे प्रकार वाढीस लागले आहे. त्यामुळे समस्या मांडायच्या कुणाकडे आणि सोडविणार कोण हा प्रश्न नागरिकांपुढे निर्माण झाला आहे. आर्थिक अपेक्षा पूर्ण करूनही या कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या अडवणुकीमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांनाही या गंभीर प्रकाराला तोंड द्यावे लागत आहे. विशेष म्हणजे, पंचायत समितीच्या उपसभापतीने मांडलेली समस्याही निकाली काढली जात नाही, हे वास्तव आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्यात विविध प्रकारची कामे हाती घेण्यात आली आहे. या योजनेचा कारभार सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू आहे. सदर योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचा लाभ देण्यात आला. शेतकऱ्यांनी मजुरांची जुळवाजुळव करत विहिरी पूर्ण केल्या. मात्र याचा मोबदला काढण्यासाठी सदर विभागातील कर्मचाऱ्यांकडून सातत्याने अडवणूक सुरू आहे. होत असलेली अडवणूक आर्थिक अपेक्षेतून सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर ती पूर्ण केल्यानंतरही वारंवार चकरा मारण्यास भाग पाडले जाते. ही गंभीर समस्या काही शेतकऱ्यांनी उपसभापती रमेश धुर्वे यांच्याकडे मांडली. त्यांनी संबंधितांना या प्रकाराविषयी समजाविले. यानंतरही कर्मचाऱ्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये बदल झालेला नाही. हा विषय धुर्वे यांनी सभेमध्ये गटविकास अधिकाऱ्यांकडे मांडला. या अधिकाऱ्यानेही याची दखल घेतली नाही. सदर विभागातील कर्मचारी प्रत्येकवेळी नवनवीन कारणे पुढे करून लाभार्थ्यांची अडवणूक करतात. पेरणीची कामे सोडून शेतकऱ्यांना पंचायत समितीत चकरा माराव्या लागतात. या बाबीकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आहे.अधिकाऱ्यांनाही जुमानत नाहीघाटंजी पंचायत समितीचा कारभार जणू कनिष्ठ कर्मचारीच चालवितात की काय, असा प्रश्न निर्माण होतो. कुठलाही कर्मचारी पदाधिकाऱ्यांनाच काय अधिकाऱ्यांनाही जुमानत नाही. पदाधिकाऱ्यांनी सांगितलेले काम तर होतच नाही. शिवाय अधिकाऱ्यांच्या आदेशालाही ठोकरले जाते. या प्रकारात सामान्य नागरिकांची मात्र गोची होत आहे. कर्मचारी मानत नाही, अधिकारी लक्ष देत नाही आणि पदाधिकाऱ्यांचे चालत नाही. या स्थितीत ते हतबल झाले आहे. पंचायत समितीच्या वारंवार चकरा मारूनही काम होत नाही. मजुरी बुडवून दाखल्यांसाठी या कार्यालयाचे उंबरठे त्यांना झिजवावे लागत आहेत.