शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

लोकप्रतिनिधींचा आगळावेगळा विवाह

By admin | Updated: June 4, 2015 02:13 IST

‘आधी केले, मग सांगितले’, या उक्तीला अनुसरून दोन विद्यमान लोकप्रतिनिधींनी मंगळवारी सर्व बंधने झुगारून आगळावेगळा आंतरजातीय विवाह केला.

दोन परिषद एकत्र : वटपौर्णिमेच्या दिवशी झुगारली बंधने, आंतरजातीय दाम्पत्य बंधनातवणी : ‘आधी केले, मग सांगितले’, या उक्तीला अनुसरून दोन विद्यमान लोकप्रतिनिधींनी मंगळवारी सर्व बंधने झुगारून आगळावेगळा आंतरजातीय विवाह केला. या विवाहाने येथील नगरपरिषदेचे आरोग्य सभापती धनंजय त्रिंबके आणि जिल्हा परिषद सदस्य अलका टेकाम वटपौर्णिमेच्या दिवशीच सर्व बंधने तोडून एकरूप झाले.तीन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू उंबरकर यांनी तालुक्यातील मोहोर्ली येथील कोलाम समाजातील अलका टेकाम नामक युवतीला घोन्सा-चिखलगाव गटातून मनसेच्या उमेदवारीबाबत विचारणा केली. कोलाम बांधव अत्यंत रूढीप्रिय म्हणून ओळखले जातात. मात्र अलकाने आधुनिक युगाची गरज लक्षात घेत सावित्रीबाई फुलेंचा वारसा पुढे चालविण्यासाठी ही उमेदवारी स्वीकारली. ती विजयी झाली अन् थेट जिल्हा परिषदेत पोहोचली. तेथे तिने आपल्या कार्याची चुणूक दाखविली. यानंतर वणी नगरपरिषदेची निवडणूक झाली. त्यात उंबरकर यांनी रूग्णसेवा केंद्राचे प्रमुख धनंजय त्रिंबके यांना उमेदवारी बहाल केली अन् तेसुद्धा चांगल्या मताधिक्क्याने विजयी झाले. सध्या धनंजय आरोग्य सभापती सोबतच पालिकेत मनसेचे गटनेते आहे. अलका आणि धनंजय एकाच पक्षात आहे. त्यामुळे जनता, नागरिकांच्या समस्या, विकास कामे याबाबत नेहमी त्यांच्यात चर्चा होऊ लागली. या चर्चेतून त्यांना एकमेकांचा स्वभाव कळला अन् कळत-नकळत ते एकमेकांच्या प्रेमात पडले. हा दुग्धशर्करा योग उंबरकर यांना कळला अन् त्यांनीच त्यांच्या विवाहासाठी पुढाकार घेतला. यापूर्वी उंबरकर यांनी जवळपास १५ मुला-मुलींचे लग्न स्वखर्चाने करवून दिले होते. जाती-पातीची बंधणे क्षणार्धात गळून पडली. त्यानंतर धनंजय आणि अलका यांच्या सहमतीने विवाहाची तारीख निश्चित करण्यात आली. मात्र अत्यंत साधेपणाने विवाह करण्याची दोघांचीही मानसिकता होती. त्यामुळे कोणताही गाजावाजा न करता मोजक्या हितचिंतकांच्या उपस्थितीत या दोघांचा मंगळवारी येथील जैताई मंदिरात विवाह सोहळा पार पडला. पाच मंगलाष्टके झाली अन् हे दोघेही वटपौर्णिमेच्या दिवशी लग्न बंधनात अडकले. (कार्यालय प्रतिनिधी)आदर्श लोकप्रतिनिधीसध्या अलका आणि धनंजय दोघेही लोकप्रतिनिधी आहे. त्यांनी आदर्श लोकप्रतिनिधीचा पायंडा या विवाहामुळे निर्माण केला आहे. जाती-पातींपेक्षा विचार किती मोठे असतात, हे त्यांनी दर्शवून दिले. त्यांच्या विवाहाने जिल्हा परिषद आणि नगरपरिषद या दोन परिषदा आता एकत्र आल्या आहेत. या दोनही संस्था विकासाच्या केंद्रबिंदू आहेत. आता हे नवदाम्पत्य आपापल्या परिषदेमार्फत लोक कल्याणाचे कार्य अधिक जोमाने करतील, अशी अपेक्षा आहे.