शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
2
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
3
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
4
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
5
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
6
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
7
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
8
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
9
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
10
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
11
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
12
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
13
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
14
तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय? 
15
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
16
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
17
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
18
Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!
19
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
20
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
Daily Top 2Weekly Top 5

जलसंवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 22:34 IST

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना विविध विभागामार्फत राबविली जात आहे. पाणी व मृदा व्यवस्थापन हा यात मुख्य घटक आहे. जिल्ह्यात बऱ्यापैकी सरासरी पाऊस होत असूनही काही गावाना पाणी समस्या कायम भेडसावते.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : मृद व जलसंधारण विभागातर्फे मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना विविध विभागामार्फत राबविली जात आहे. पाणी व मृदा व्यवस्थापन हा यात मुख्य घटक आहे. जिल्ह्यात बऱ्यापैकी सरासरी पाऊस होत असूनही काही गावाना पाणी समस्या कायम भेडसावते. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, लाभधारक शेतकरी, ग्रामपंचायत पदाधिकारी आदींनी सक्रिया सहभाग घेऊन कायमची उपाययोजना आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) यांच्या संयुक्त विद्यमाने जलयुक्त शिवार अंतर्गत झालेल्या कामांचे हस्तांतरण, लोकसहभागाने योजनांची देखभाल, दुरुस्तीबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण व कार्यशाळा येथील बचत भवनात घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अध्यक्षस्थानाहून बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून जल व भूमी व्यवस्थापन संस्थेच्या सामाजिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. राजेंद्र पुराणिक, प्रा. किशोर राठोड, प्रा. मोहन नारखेडे उपस्थित होते. उपवनसंरक्षक भानुदास पिंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, कार्यशाळेचे आयोजक मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी चेतन कलशेट्टी, टाटा ट्रस्ट एनजिओचे शंकरराव अमिलकंठवार आदी उपस्थित होते.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. सिंचनासंबंधी येणाऱ्या विविध अडचणींवर मात कशी करावी याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी ए.आर. पांडे यांनी जलयुक्त शिवार अंतर्गत कार्याची माहिती प्रास्ताविकातून दिली. प्रशिक्षणाचे प्रेझेंटेशन कनिष्ठ अभियंता स्वप्नजा जाधव यांनी केले. संचालन भाग्यश्री तंबाखे, आभार मोहना कडू यांनी मानले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी