शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

लोकसहभागातून करंजखेडचे झाले नंदनवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 23:35 IST

गावाला योग्य नेतृत्व मिळाले तर गावाचे कसे नंदनवन होऊ शकते, याचा प्रत्यय घ्यायचा असेल तर महागाव तालुक्यातील चार हजार लोकवस्तीच्या करंजखेडमध्ये यावे लागेल. सरपंचपदाची धुरा घेतल्यानंतर प्रवीण ठाकरे यांनी गावाचा कायापालटच केला.

ठळक मुद्देविकासाचा ध्यास : सरपंच प्रवीण ठाकरे ठरले ‘लोकमत सरपंच आॅफ द इअर’

संजय भगत।लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : गावाला योग्य नेतृत्व मिळाले तर गावाचे कसे नंदनवन होऊ शकते, याचा प्रत्यय घ्यायचा असेल तर महागाव तालुक्यातील चार हजार लोकवस्तीच्या करंजखेडमध्ये यावे लागेल. सरपंचपदाची धुरा घेतल्यानंतर प्रवीण ठाकरे यांनी गावाचा कायापालटच केला.अशा या सरपंचाच्या कार्याचा गौरव ‘लोकमत’ने सरपंच आॅफ द इअर पुरस्कार देऊन केला.महागावपासून अवघ्या पाच किलोमीटरवर करंजखेड आहे. माहूर दर्शनासाठी जाणाºया भक्तांच्या विश्रांतीचे हे ठिकाण. या ठिकाणी भक्तांना हमखास भोजन आणि निवास उपलब्ध होतो. त्यामुळेच वर्षभर दिंड्या करंजखेडवरूनच जातात. या गावातील ठाकरे कुटुंब या भक्तांसाठी सर्व व्यवस्था करतात. अशा या सेवाव्रती ठाकरे कुटुंबातील तिसºया पिढीचे वारस म्हणजे गावचे विद्यमान सरपंच प्रवीण ठाकरे. त्यांनी बीए, डीएड केले. परंतु नोकरीच्या मागे न लागता ग्रामविकासासाठी स्वत:ला वाहून घेतले. त्यांनी सर्वाधिक लक्ष केंद्रित केले ते जल व्यवस्थापनावर. तळ्यातील दहा हजार ब्रास गाळ लोकसहभागातून काढला. त्यामुळे पाण्याची समस्या चुटकीसरशी मिटली. त्यांच्या या कार्याचा जिल्हा परिषदेने गौरव केला. नंतर त्यांनी सौरऊर्जेचे महत्त्व गावकºयांना समजून सांगितले. त्यातून अनेक शेतकºयांनी सौरपंप उभारले. वीज बचतीसाठी गावात एलईडी लाईट लावली. त्यामुळे ७० टक्के वीज झाली. गावात डिजिटल शाळा साकारली. लोकवर्गणीतून गोळा झालेल्या दोन लाखातून डिजिटल प्रोजेक्टर बसविण्यात आले.स्वच्छतेतून समृद्धीकडे हा मंत्र देत त्यांनी तरुणांना एकत्र केले. गाव १०० टक्के हागणदारीमुक्त करून गावाची वाटचाल स्मार्ट ग्रामकडे सुरू झाली. आरोग्य, पायाभूत सुविधा, पर्यावरण संवर्धन, ई-प्रशासन आणि रोजगार निर्मिती असे उपक्रम राबविले. कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. करंजखेड ग्रामपंचायतीअंतर्गत ५९३ हेक्टर शेती असून यातील ४० टक्के शेती ओलिताखाली आहे.करंजखेडने तंटामुक्तीचा तीन लाखांचा पुरस्कारही प्राप्त केला आहे. गावात दारूबंदीचा ठराव एकमताने पारित करून गाव शंभर टक्के व्यसनमुक्त करण्यात आले. सरपंच ठाकरे यांच्या या उपक्रमात संदीप ठाकरे, उपसरपंच भरोस चव्हाण, अविनाश भांगे, बच्चू राठोड, सुमन जाधव, मंदा भांगे, कलाबाई भांगे, हरिभाऊ ठाकरे, लक्ष्मीबाई बोरकर, दीपाली भांगे, विनोद चौधरी, अविनाश ठाकरे, प्रवीण भांगे, भीमराव भालेराव, योगीता तांबूतकर आणि गावकरी सहकार्य करतात. समन्वयाचे काम ग्रामसेवक के.पी. घारड करतात.पर्यावरण संवर्धनाचा मंत्रडोंगरदऱ्यांत वसलेल्या करंजखेड येथील गावकऱ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटले आहे. त्यामुळेच आता गावातील प्रत्येक घरी गॅस कनेक्शन आहे. परिणामी जंगलतोड थांबली आहे. दरवर्षी ५०० वृक्षांची लागवड करून त्याचे संवर्धन केले जाते.ग्रामसभेला सर्वोच्च प्राधान्यकरंजखेड येथे कोणतेही काम करायचे असल्यास ग्रामसभा घेतली जाते. नागरिकांनी सूचविलेल्या कामांना प्राधान्य दिले जाते. कामात कोणती अडचण आल्यास सर्व मिळून ते सोडविले जाते. जिल्ह्यातील हे आदर्श गाव आता राज्यस्तरावर पोहोचावे, अशी अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्त केली.