शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

लोकसहभागातून करंजखेडचे झाले नंदनवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 23:35 IST

गावाला योग्य नेतृत्व मिळाले तर गावाचे कसे नंदनवन होऊ शकते, याचा प्रत्यय घ्यायचा असेल तर महागाव तालुक्यातील चार हजार लोकवस्तीच्या करंजखेडमध्ये यावे लागेल. सरपंचपदाची धुरा घेतल्यानंतर प्रवीण ठाकरे यांनी गावाचा कायापालटच केला.

ठळक मुद्देविकासाचा ध्यास : सरपंच प्रवीण ठाकरे ठरले ‘लोकमत सरपंच आॅफ द इअर’

संजय भगत।लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : गावाला योग्य नेतृत्व मिळाले तर गावाचे कसे नंदनवन होऊ शकते, याचा प्रत्यय घ्यायचा असेल तर महागाव तालुक्यातील चार हजार लोकवस्तीच्या करंजखेडमध्ये यावे लागेल. सरपंचपदाची धुरा घेतल्यानंतर प्रवीण ठाकरे यांनी गावाचा कायापालटच केला.अशा या सरपंचाच्या कार्याचा गौरव ‘लोकमत’ने सरपंच आॅफ द इअर पुरस्कार देऊन केला.महागावपासून अवघ्या पाच किलोमीटरवर करंजखेड आहे. माहूर दर्शनासाठी जाणाºया भक्तांच्या विश्रांतीचे हे ठिकाण. या ठिकाणी भक्तांना हमखास भोजन आणि निवास उपलब्ध होतो. त्यामुळेच वर्षभर दिंड्या करंजखेडवरूनच जातात. या गावातील ठाकरे कुटुंब या भक्तांसाठी सर्व व्यवस्था करतात. अशा या सेवाव्रती ठाकरे कुटुंबातील तिसºया पिढीचे वारस म्हणजे गावचे विद्यमान सरपंच प्रवीण ठाकरे. त्यांनी बीए, डीएड केले. परंतु नोकरीच्या मागे न लागता ग्रामविकासासाठी स्वत:ला वाहून घेतले. त्यांनी सर्वाधिक लक्ष केंद्रित केले ते जल व्यवस्थापनावर. तळ्यातील दहा हजार ब्रास गाळ लोकसहभागातून काढला. त्यामुळे पाण्याची समस्या चुटकीसरशी मिटली. त्यांच्या या कार्याचा जिल्हा परिषदेने गौरव केला. नंतर त्यांनी सौरऊर्जेचे महत्त्व गावकºयांना समजून सांगितले. त्यातून अनेक शेतकºयांनी सौरपंप उभारले. वीज बचतीसाठी गावात एलईडी लाईट लावली. त्यामुळे ७० टक्के वीज झाली. गावात डिजिटल शाळा साकारली. लोकवर्गणीतून गोळा झालेल्या दोन लाखातून डिजिटल प्रोजेक्टर बसविण्यात आले.स्वच्छतेतून समृद्धीकडे हा मंत्र देत त्यांनी तरुणांना एकत्र केले. गाव १०० टक्के हागणदारीमुक्त करून गावाची वाटचाल स्मार्ट ग्रामकडे सुरू झाली. आरोग्य, पायाभूत सुविधा, पर्यावरण संवर्धन, ई-प्रशासन आणि रोजगार निर्मिती असे उपक्रम राबविले. कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. करंजखेड ग्रामपंचायतीअंतर्गत ५९३ हेक्टर शेती असून यातील ४० टक्के शेती ओलिताखाली आहे.करंजखेडने तंटामुक्तीचा तीन लाखांचा पुरस्कारही प्राप्त केला आहे. गावात दारूबंदीचा ठराव एकमताने पारित करून गाव शंभर टक्के व्यसनमुक्त करण्यात आले. सरपंच ठाकरे यांच्या या उपक्रमात संदीप ठाकरे, उपसरपंच भरोस चव्हाण, अविनाश भांगे, बच्चू राठोड, सुमन जाधव, मंदा भांगे, कलाबाई भांगे, हरिभाऊ ठाकरे, लक्ष्मीबाई बोरकर, दीपाली भांगे, विनोद चौधरी, अविनाश ठाकरे, प्रवीण भांगे, भीमराव भालेराव, योगीता तांबूतकर आणि गावकरी सहकार्य करतात. समन्वयाचे काम ग्रामसेवक के.पी. घारड करतात.पर्यावरण संवर्धनाचा मंत्रडोंगरदऱ्यांत वसलेल्या करंजखेड येथील गावकऱ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटले आहे. त्यामुळेच आता गावातील प्रत्येक घरी गॅस कनेक्शन आहे. परिणामी जंगलतोड थांबली आहे. दरवर्षी ५०० वृक्षांची लागवड करून त्याचे संवर्धन केले जाते.ग्रामसभेला सर्वोच्च प्राधान्यकरंजखेड येथे कोणतेही काम करायचे असल्यास ग्रामसभा घेतली जाते. नागरिकांनी सूचविलेल्या कामांना प्राधान्य दिले जाते. कामात कोणती अडचण आल्यास सर्व मिळून ते सोडविले जाते. जिल्ह्यातील हे आदर्श गाव आता राज्यस्तरावर पोहोचावे, अशी अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्त केली.