शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

लोकसहभागातून करंजखेडचे झाले नंदनवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 23:35 IST

गावाला योग्य नेतृत्व मिळाले तर गावाचे कसे नंदनवन होऊ शकते, याचा प्रत्यय घ्यायचा असेल तर महागाव तालुक्यातील चार हजार लोकवस्तीच्या करंजखेडमध्ये यावे लागेल. सरपंचपदाची धुरा घेतल्यानंतर प्रवीण ठाकरे यांनी गावाचा कायापालटच केला.

ठळक मुद्देविकासाचा ध्यास : सरपंच प्रवीण ठाकरे ठरले ‘लोकमत सरपंच आॅफ द इअर’

संजय भगत।लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : गावाला योग्य नेतृत्व मिळाले तर गावाचे कसे नंदनवन होऊ शकते, याचा प्रत्यय घ्यायचा असेल तर महागाव तालुक्यातील चार हजार लोकवस्तीच्या करंजखेडमध्ये यावे लागेल. सरपंचपदाची धुरा घेतल्यानंतर प्रवीण ठाकरे यांनी गावाचा कायापालटच केला.अशा या सरपंचाच्या कार्याचा गौरव ‘लोकमत’ने सरपंच आॅफ द इअर पुरस्कार देऊन केला.महागावपासून अवघ्या पाच किलोमीटरवर करंजखेड आहे. माहूर दर्शनासाठी जाणाºया भक्तांच्या विश्रांतीचे हे ठिकाण. या ठिकाणी भक्तांना हमखास भोजन आणि निवास उपलब्ध होतो. त्यामुळेच वर्षभर दिंड्या करंजखेडवरूनच जातात. या गावातील ठाकरे कुटुंब या भक्तांसाठी सर्व व्यवस्था करतात. अशा या सेवाव्रती ठाकरे कुटुंबातील तिसºया पिढीचे वारस म्हणजे गावचे विद्यमान सरपंच प्रवीण ठाकरे. त्यांनी बीए, डीएड केले. परंतु नोकरीच्या मागे न लागता ग्रामविकासासाठी स्वत:ला वाहून घेतले. त्यांनी सर्वाधिक लक्ष केंद्रित केले ते जल व्यवस्थापनावर. तळ्यातील दहा हजार ब्रास गाळ लोकसहभागातून काढला. त्यामुळे पाण्याची समस्या चुटकीसरशी मिटली. त्यांच्या या कार्याचा जिल्हा परिषदेने गौरव केला. नंतर त्यांनी सौरऊर्जेचे महत्त्व गावकºयांना समजून सांगितले. त्यातून अनेक शेतकºयांनी सौरपंप उभारले. वीज बचतीसाठी गावात एलईडी लाईट लावली. त्यामुळे ७० टक्के वीज झाली. गावात डिजिटल शाळा साकारली. लोकवर्गणीतून गोळा झालेल्या दोन लाखातून डिजिटल प्रोजेक्टर बसविण्यात आले.स्वच्छतेतून समृद्धीकडे हा मंत्र देत त्यांनी तरुणांना एकत्र केले. गाव १०० टक्के हागणदारीमुक्त करून गावाची वाटचाल स्मार्ट ग्रामकडे सुरू झाली. आरोग्य, पायाभूत सुविधा, पर्यावरण संवर्धन, ई-प्रशासन आणि रोजगार निर्मिती असे उपक्रम राबविले. कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. करंजखेड ग्रामपंचायतीअंतर्गत ५९३ हेक्टर शेती असून यातील ४० टक्के शेती ओलिताखाली आहे.करंजखेडने तंटामुक्तीचा तीन लाखांचा पुरस्कारही प्राप्त केला आहे. गावात दारूबंदीचा ठराव एकमताने पारित करून गाव शंभर टक्के व्यसनमुक्त करण्यात आले. सरपंच ठाकरे यांच्या या उपक्रमात संदीप ठाकरे, उपसरपंच भरोस चव्हाण, अविनाश भांगे, बच्चू राठोड, सुमन जाधव, मंदा भांगे, कलाबाई भांगे, हरिभाऊ ठाकरे, लक्ष्मीबाई बोरकर, दीपाली भांगे, विनोद चौधरी, अविनाश ठाकरे, प्रवीण भांगे, भीमराव भालेराव, योगीता तांबूतकर आणि गावकरी सहकार्य करतात. समन्वयाचे काम ग्रामसेवक के.पी. घारड करतात.पर्यावरण संवर्धनाचा मंत्रडोंगरदऱ्यांत वसलेल्या करंजखेड येथील गावकऱ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटले आहे. त्यामुळेच आता गावातील प्रत्येक घरी गॅस कनेक्शन आहे. परिणामी जंगलतोड थांबली आहे. दरवर्षी ५०० वृक्षांची लागवड करून त्याचे संवर्धन केले जाते.ग्रामसभेला सर्वोच्च प्राधान्यकरंजखेड येथे कोणतेही काम करायचे असल्यास ग्रामसभा घेतली जाते. नागरिकांनी सूचविलेल्या कामांना प्राधान्य दिले जाते. कामात कोणती अडचण आल्यास सर्व मिळून ते सोडविले जाते. जिल्ह्यातील हे आदर्श गाव आता राज्यस्तरावर पोहोचावे, अशी अपेक्षा येथील नागरिकांनी व्यक्त केली.