शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

भारनियमनात होरपळली जनता

By admin | Updated: June 5, 2014 00:03 IST

परिसरात सरासरी १0 ते १२ तासांचे भारनियमन सुरू असल्याने जनता होरपळत आहे. सध्या सूर्य आग ओकत असताना त्याच वेळेत भारनियमन होत असल्याने ग्राहकांमद्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

घोन्सा : परिसरात सरासरी १0 ते १२ तासांचे भारनियमन सुरू असल्याने जनता होरपळत आहे. सध्या सूर्य आग ओकत असताना त्याच वेळेत भारनियमन होत असल्याने ग्राहकांमद्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.घोन्सा येथील ३३ के.व्ही. क्षमता असलेल्या उपकेंद्राअंतर्गत तीन फिडर येतात. त्यामध्ये साखरा, खडकडोह, सुसरी पेंढरी येथे फिडर आहे. त्यावरून परिसरातील एकूण ३८ ते ४0 गावांना वीज पुरवठा केला जातो. त्यामधील जवळपास चार ते पाच गावांत गावठाण फिडर योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र ही योजना कार्यान्वित असताना सुध्दा येथे भारनियमन केले जात आहे. त्यामुळे शासनाची गावठाण फिडर योजना कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे. जेथे गावठाण फिडर योजना कार्यान्वित करण्यात आली, तेथेसुध्दा जवळपास सहा तासांचे भारनियमन केले जात आहे. अनेक गावांमध्ये ही गावठाण फिडर योजना सुरू झाली नाही आणि ती येणार्‍या पावसाळ्यापर्यंतसुध्दा सुरू होणार नाही, अशी माहिती येथील कनिष्ठ अभियंत्यांनी दिली. तसेच भारनियमनाव्यतिरिक्तसुध्दा येथे वीज गुल होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यावेळीही भारनियमनात कुठलाही फेरबदल केला जात नाही. या भारनियमनाविषयी अधिकार्‍यांना विचारले असता, ते देयकाच्या वसुलीनुसार प्रत्येक गावाचा ग्रुप ठरविण्यात आल्याचे सांगतात. त्यानुसार भारयिनमन करण्यात आल्याचे सांगून ते ग्राहकांची बोळवण करतात. ज्या ग्राहकांनी वीज देयक भरले नाही, त्यांचा वीज पुरवठा महावितरणतर्फे खंडित करण्यात येतो.  परिणामी वसुली मात्र १00 टक्के होताना दिसत आहे. ही सत्य परिस्थिती असताना अधिकारी मात्र ग्राहकांना उडवाउडवीचे उत्तरे देताना दिसत आहे. सध्या उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे नागरिकांना थंड हवेची आवश्यकता असते. परंतु त्याचवेळी वीज गुल होत असल्यामुळे सामान्य जनता होरपळत आहे. त्यातून उष्माघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्राहकांच्या संतापाचा आता स्फळट होण्याची शक्यता बळावली आहे. (वार्ताहर)