शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

पैनगंगा नदी पात्रला आले वाळवंटाचे रुप

By admin | Updated: February 20, 2017 01:28 IST

विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीचे पात्र गत काही दिवसापूर्वी कोरडे पडले असून ...

पाणीटंचाईची चाहूल : ५० गावातील नागरिक होणार प्रभावित उमरखेड : विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीचे पात्र गत काही दिवसापूर्वी कोरडे पडले असून यामुळे उमरखेड तालुक्यातील ५० गावात पाणीटंचाईची चाहूल लागली आहे. जनावरांच्या पाण्यासह विविध समस्या निर्माण होणार आहे.उमरखेड तालुक्याची जीवनदायिनी पैनगंगा यावर्षी पुन्हा कोरडी पडली आहे. गत काही वर्षांपासून पैनगंगा नदी कोरडी पडत असल्याने नदी तीरावरील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर्षीही पैनगंगा कोरडी झाल्याने भांबरखेडा, तिवरंग, हातला, दिवटपिंपरी, पळशी, नागापूर, बेलखेड, चिंचोली संगम, मार्लेगाव, तिवडी, टाकळी, विडूळ, चालगणी, साखरा, खरुस, देवसरी, कारखेड, लोहरा, देवसरी, दिघडी, उंचवडद, चातारी, बोरी, कोपरा, मानकेश्वर, सोईट, सिंदगी, गांजेगाव, सावळेश्वर, बिटरगाव, भोजनगर, जेवली, पेंदा, सोनदाबी, मोरचंडी, जवराळा, गाडी-बोरी, मुरली, सहस्त्रकुंड, पिंपळगाव, खरबी, परोटी वन यासह अनेक गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या नदीच्या काठावर गावागावातील नळ योजना आहे. परंतु यावर्षी डिसेंबर महिन्यातच पैनगंगेचे पात्र कोरडे पडायला लागले होते. नदी पात्रात ठिकठिकाणी डबके साचले आहे. आता तर काही भागात नदीचे वाळवंट झाले आहे. याच पैनगंगा नदीवर मोटारपंप लावून अनेक जण रबीचा हंगाम घेतात. परंतु नदी आटल्याने सिंचन करणे कठीण झाले आहे. अनेकांची रबी पिके धोक्यात आली आहे. पूर्वी बाराही महिने वाहणारी पैनगंगा इसापूर येथे धरण बांधल्यापासून उन्हाळ्यात आटायला लागली आहे. तर पावसाळ्यात अतिरिक्त पाणी सोडल्याने पुराचा फटका सहन करावा लागतो. दरवर्षी उन्हाळ्यात इसापूर धरणाचे पाणी नदी पात्रात सोडण्यासाठी नागरिकांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागतो. तब्बल तीन महिने या भागातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होतो. पिण्याच्या पाण्यासाठी आतापासूनच भटकंती करावी लागत असल्याने नागरिक त्रस्त आहे. (शहर प्रतिनिधी)पाण्यासाठी भटकंतीपैनगंगा नदी कोरडी पडल्याने विदर्भातील ५० आणि मराठवाड्यातील ३० गावांमध्ये पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. यावेळी नदीच्या तीरावरील नळ योजनेच्या विहिरींनी तळ गाठला आहे. प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.