शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत शंभरावर ‘डीई’ प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 21:56 IST

जिल्हा परिषदेत चौकशीचा केवळ बागुलबुवा निर्माण केला जातो. प्रत्यक्षात तत्काळ चौकशी पूर्ण होऊन संबंधितांवर कारवाई केली जात नाही.

ठळक मुद्देचौकशीचा केवळ बागुलबुवा : प्रत्यक्ष कारवाईला बगल, कुणालाही भीती नाही, हिंमत वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेत चौकशीचा केवळ बागुलबुवा निर्माण केला जातो. प्रत्यक्षात तत्काळ चौकशी पूर्ण होऊन संबंधितांवर कारवाई केली जात नाही. त्यामुळे या मिनी मंत्रालयात कुणीच कुणाला जुमानत नसल्याचे व त्यामुळे हिंमत वाढल्याने आणखी कारनामे सुरूच असल्याचे दिसून येते. आजही जिल्हा परिषदेमध्ये शंभरावर अधिकारी-कर्मचाºयांच्या खातेनिहाय चौकशी (डीई) प्रलंबित आहेत. त्या वेगाने निकाली निघाव्या म्हणून प्रशासनाकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाही. अनेक पदाधिकारी व बहुतांश सदस्य अभ्यासू नसल्याचाही हा परिणाम मानला जात आहे.जिल्हा परिषदेत १३ विभाग आहेत. या सर्व विभागांत जवळपास २० हजारांच्या आसपास अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहे. यात शिक्षक व आरोग्य कर्मचाºयांची संख्या मोठी आहे. कार्यरत कर्मचाºयांकडून अनेकदा चुका होतात. अनेकदा निधीत अफरातफर होते. कर्तव्य बजावताना अनेक कर्मचारी चुकतात. काही जाणूनबुजून चुका करतात, तर काहींकडून अनवधानाने चूक घडते.अधिकारी, कर्मचाºयांनी अपहार केल्यास, कर्तव्यात कसूर केल्यास त्यांच्याविरूद्ध निलंबनाची कारवाई केली जाते. काहींची विभागीय चौकशी (डीई) सुरू केली जाते. निलंबन काळात अनेक कर्मचाºयांना फुकटचा अर्धा पगार देऊन पोसले जाते. सहा महिन्यानंतर हाच पगार दोन तृतीयांश होतो. निलंबन काळात कर्मचाºयाला कोणतेही काम नसते. फुकटचा पगार घेऊन सुटीही मिळते. तीच गत डीर्इंची आहे. जिल्हा परिषदेत सध्या डीईची १०० प्रकरणे रखडली आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांपासून संबंधित कर्मचाºयांची विभागीय चौकशी सुरू आहे.पाच वर्षांपासून चौकशी तरीही निष्कर्षापासून दूरविभागीय चौकशीच्या नावाखाली संबंधित कर्मचाºयाला वारंवार बोलाविले जाते. वारंवार त्यांचे बयाण घेतले जाते. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या अधिकारी, कर्मचाºयांचेही म्हणणे ऐकून घेतले जाते. नंतर पुढील तारीख दिली जाते. ‘तारीख ते तारीख’ असा हा सिलसिला गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. तरीही चौकशी अधिकारी निष्कर्षाप्रत पोहोचू शकले नाही. त्यामुळे या प्रकरणात कुठे तरी पाणी मुुरत असल्याचा संशय बळावत आहे. मात्र ही न्यायालयीन प्रक्रिया असल्याने चौकशीला कालमर्यादा घालता येणार नाही, असे प्रशासनाचे मत आहे.