शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
2
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
3
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
4
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
5
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
6
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
7
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
8
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
9
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
10
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

जिल्हा परिषदेत शंभरावर ‘डीई’ प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 21:56 IST

जिल्हा परिषदेत चौकशीचा केवळ बागुलबुवा निर्माण केला जातो. प्रत्यक्षात तत्काळ चौकशी पूर्ण होऊन संबंधितांवर कारवाई केली जात नाही.

ठळक मुद्देचौकशीचा केवळ बागुलबुवा : प्रत्यक्ष कारवाईला बगल, कुणालाही भीती नाही, हिंमत वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेत चौकशीचा केवळ बागुलबुवा निर्माण केला जातो. प्रत्यक्षात तत्काळ चौकशी पूर्ण होऊन संबंधितांवर कारवाई केली जात नाही. त्यामुळे या मिनी मंत्रालयात कुणीच कुणाला जुमानत नसल्याचे व त्यामुळे हिंमत वाढल्याने आणखी कारनामे सुरूच असल्याचे दिसून येते. आजही जिल्हा परिषदेमध्ये शंभरावर अधिकारी-कर्मचाºयांच्या खातेनिहाय चौकशी (डीई) प्रलंबित आहेत. त्या वेगाने निकाली निघाव्या म्हणून प्रशासनाकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाही. अनेक पदाधिकारी व बहुतांश सदस्य अभ्यासू नसल्याचाही हा परिणाम मानला जात आहे.जिल्हा परिषदेत १३ विभाग आहेत. या सर्व विभागांत जवळपास २० हजारांच्या आसपास अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहे. यात शिक्षक व आरोग्य कर्मचाºयांची संख्या मोठी आहे. कार्यरत कर्मचाºयांकडून अनेकदा चुका होतात. अनेकदा निधीत अफरातफर होते. कर्तव्य बजावताना अनेक कर्मचारी चुकतात. काही जाणूनबुजून चुका करतात, तर काहींकडून अनवधानाने चूक घडते.अधिकारी, कर्मचाºयांनी अपहार केल्यास, कर्तव्यात कसूर केल्यास त्यांच्याविरूद्ध निलंबनाची कारवाई केली जाते. काहींची विभागीय चौकशी (डीई) सुरू केली जाते. निलंबन काळात अनेक कर्मचाºयांना फुकटचा अर्धा पगार देऊन पोसले जाते. सहा महिन्यानंतर हाच पगार दोन तृतीयांश होतो. निलंबन काळात कर्मचाºयाला कोणतेही काम नसते. फुकटचा पगार घेऊन सुटीही मिळते. तीच गत डीर्इंची आहे. जिल्हा परिषदेत सध्या डीईची १०० प्रकरणे रखडली आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांपासून संबंधित कर्मचाºयांची विभागीय चौकशी सुरू आहे.पाच वर्षांपासून चौकशी तरीही निष्कर्षापासून दूरविभागीय चौकशीच्या नावाखाली संबंधित कर्मचाºयाला वारंवार बोलाविले जाते. वारंवार त्यांचे बयाण घेतले जाते. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या अधिकारी, कर्मचाºयांचेही म्हणणे ऐकून घेतले जाते. नंतर पुढील तारीख दिली जाते. ‘तारीख ते तारीख’ असा हा सिलसिला गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. तरीही चौकशी अधिकारी निष्कर्षाप्रत पोहोचू शकले नाही. त्यामुळे या प्रकरणात कुठे तरी पाणी मुुरत असल्याचा संशय बळावत आहे. मात्र ही न्यायालयीन प्रक्रिया असल्याने चौकशीला कालमर्यादा घालता येणार नाही, असे प्रशासनाचे मत आहे.