शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

पावणेदोन लाख ग्राहकांची वीज कायम खंडित

By admin | Updated: October 28, 2016 02:01 IST

थकीत वीज बिलाबाबत वारंवार नोटीस देऊनही प्रतिसाद न देणाऱ्या वीज ग्राहकांची कायमस्वरुपी वीजजोडणी कापल्या जाते.

४६ कोटींची थकबाकी : चोरून वीज घेणाऱ्यांविरुद्ध कारवाईसुहास सुपासे यवतमाळ थकीत वीज बिलाबाबत वारंवार नोटीस देऊनही प्रतिसाद न देणाऱ्या वीज ग्राहकांची कायमस्वरुपी वीजजोडणी कापल्या जाते. जिल्ह्यात गेल्या पाच-सहा वर्षात जवळपास पावणेदोन लाख वीज ग्राहकांची कायमस्वरुपी वीज महावितरणकडून कापण्यात आली आहे.जे ग्राहक अनेक महिने वीज बिलाचा भरणाच करीत नाही, अशा ग्राहकांना नोटीस पाठविली जाते. परंतु त्यानंतरही वारंवार पाठपुरावा करून जे ग्राहक वीज बिलाचा भरणा करीत नाही, अशा ग्राहकांची आधी सहा महिन्यांसाठी तात्पुरती वीज कापल्या जाते. तरीदेखील या दरम्यान ग्राहकाने बिलाचा भरणा न केल्यास अशा ग्राहकांची वीज कायमस्वरुपी कापल्या जाते. अशा कायमस्वरुपी वीज कापलेल्या ग्राहकांची जिल्ह्यात एकूण संख्या एक लाख तीन हजार ७२ आहे. यांच्याकडे एकूण थकबाकी ४५ कोटी ७० लाख ७६ हजार ४२४ रुपये आहेत.जिल्ह्यात वीज वितरणचे तीन विभाग आहे. विभागानुसार थकबाकी व ग्राहकांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास यवतमाळ विभागात ३७ हजार ८५६ कायमस्वरुपी थकबाकीदारांची वीज कापली असून त्यांच्याकडे १७ कोटी ६६ लाख ५४ हजार १५७ रुपये आहेत. पांढरकवडा विभागात कायमस्वरुपी थकबाकीदार ग्राहक २४ हजार ६७० असून त्यांच्याकडे १२ कोटी ७८ लाख पाच हजार ९०० रुपये आहेत. पुसद विभागात एकूण थकबाकीदार ग्राहक ४० हजार ५४७ आहेत. त्यांच्याकडे एकूण १५ कोटी २६ लाख १६ हजार ६७ रुपये आहे. यामध्ये घरगुती थकबाकीदार ग्राहकांची संख्या सर्वाधिक म्हणजे ९२ हजार ६९९ आहे. त्या पाठोपाठ वाणिज्यिक ग्राहकांची संख्या ८३१५, औद्योगिक ग्राहकांची संख्या २०१९, पथदिवे २७ आणि इतर १२ ग्राहक कायमस्वरुपी थकबाकीदार आहेत. उल्लेखनीय म्हणजे यामध्ये कृषी व नळयोजनेच्या थकबाकीचा समावेश नाही. हा समावेश केल्यास थकबाकीचा आकडा यापेक्षा कितीतरी मोठा आहे. वीजचोरी पकडण्याचे आव्हानजिल्ह्यात कायमस्वरुपी थकबाकीदार घरगुती ग्राहकांची संख्या सर्वाधिक म्हणजे ९२ हजार ६९९ आहे. या सर्व ग्राहकांची वीज महावितरणने कायमस्वरुपी कापली आहे. म्हणजे सध्या हे ग्राहक विजेशिवाय राहत आहे किंवा अनधिकृत वीज घेत आहेत अथवा विजेची चोरी करीत आहेत, हेच यातून स्पष्ट होते. अशा सर्व ग्राहकांचा शोध घेण्याची धडक मोहीम लवकरच राबविण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. यात वीज चोरी व नियमबाह्यरित्या वीजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांवर योग्य कारवाई करण्याचे संकेत आहेत. अशा वीज चोरी करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आव्हान महावितरणसमोर आहे.