शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये दमदार पाऊस

By admin | Updated: August 29, 2014 00:07 IST

गत अडीच महिन्यात पावसाच्या सर्वच नक्षत्राने हुलकावणी दिली. शेतातील पिके करपायला लागली. अशा स्थितीत शेतकरी चिंतेत असताना श्रावण संपताच दमदार पावसाचे आगमन झाले.

शेतकऱ्यांना दिलासा : आतापर्यंत २९२ मिमीची नोंद पुसद : गत अडीच महिन्यात पावसाच्या सर्वच नक्षत्राने हुलकावणी दिली. शेतातील पिके करपायला लागली. अशा स्थितीत शेतकरी चिंतेत असताना श्रावण संपताच दमदार पावसाचे आगमन झाले. सोमवार, मंगळवार आणि बुधवारी झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. नदी-नाले खळखळून वाहू लागले असून पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. पूस धरणाच्या जलसाठ्यात दुप्पट वाढ झाली असून आता ३२ टक्के जलसाठा आहे. पुसद तालुक्यात आतापर्यंत २९२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.गेल्या अडीच महिन्यांपासून पावसाने सतत हुलकावणी दिली. पुसद तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. परिणामी खरीप पिकांची उंची घटली तसेच अनेक भागातील पिके करपली. २५ आॅगस्ट रोजी पोळ्याच्या दिवशी सायंकाळी पुसद शहरात पावसाला प्रारंभ झाला. विजांच्या कडकडाटासह तब्बल चार तास दमदार पाऊस कोसळला. त्यानंतर अधूनमधून रात्रभर रिमझिम पाऊस सुरू होता. २६ आॅगस्ट रोजी दुपारी तब्बल एक तास चांगला पाऊस झाला. २७ आॅगस्ट रोजी दिवसभर ढगाळी वातावरण होते. रात्री १० वाजताच्या सुमारास दीड तास दमदार पाऊस झाला. रात्रीसुद्धा पाऊस सुरूच होता. गेल्या तीन दिवसांपासून पुसद परिसरात पाऊस सुरू असल्याने शेतकरी सुखावला आहे. या पावसाचा फायदा पिकाला होणार आहे. उशिरा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची पिके पाहिजे तेवढ्या प्रमाणात जोमाने येणार नसली तरी या पावसाचा फायदा मात्र निश्चितच होणार आहे.यावर्षी वरूण राजा सुरुवातीपासूनच रुसला होता. जूनमध्ये पावसाने दगा दिला. त्यामुळे काही भागातील पेरण्या उलटल्या. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. त्यानंतरही पावसाची चिन्हे दिसत नव्हती. शेतकऱ्यांचे डोळे आशाकडे लागले होते. पिके पावसाअभावी कोमेजून चालले होते. नदी-नालेही कोरडे पडले होते. पूस धरणात केवळ १६ टक्के जलसाठा होता. त्यामुळे एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची वेळ आली होती. मात्र गेल्या तीन दिवसांपासून परिसरात पडत असलेल्या पावसाने पूस धरणात ३९०.७५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे, अशी माहिती प्रकल्पाच्या सूत्रांनी दिली. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. थंडावाही वाढला आहे. पावसाचा जोर कायम असून पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही अंशी मिटला आहे. मात्र ग्रामीण भागात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. (तालुका प्रतिनिधी)