शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

पुसदमध्ये दमदार पाऊस

By admin | Updated: August 29, 2014 00:07 IST

गत अडीच महिन्यात पावसाच्या सर्वच नक्षत्राने हुलकावणी दिली. शेतातील पिके करपायला लागली. अशा स्थितीत शेतकरी चिंतेत असताना श्रावण संपताच दमदार पावसाचे आगमन झाले.

शेतकऱ्यांना दिलासा : आतापर्यंत २९२ मिमीची नोंद पुसद : गत अडीच महिन्यात पावसाच्या सर्वच नक्षत्राने हुलकावणी दिली. शेतातील पिके करपायला लागली. अशा स्थितीत शेतकरी चिंतेत असताना श्रावण संपताच दमदार पावसाचे आगमन झाले. सोमवार, मंगळवार आणि बुधवारी झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. नदी-नाले खळखळून वाहू लागले असून पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. पूस धरणाच्या जलसाठ्यात दुप्पट वाढ झाली असून आता ३२ टक्के जलसाठा आहे. पुसद तालुक्यात आतापर्यंत २९२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.गेल्या अडीच महिन्यांपासून पावसाने सतत हुलकावणी दिली. पुसद तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. परिणामी खरीप पिकांची उंची घटली तसेच अनेक भागातील पिके करपली. २५ आॅगस्ट रोजी पोळ्याच्या दिवशी सायंकाळी पुसद शहरात पावसाला प्रारंभ झाला. विजांच्या कडकडाटासह तब्बल चार तास दमदार पाऊस कोसळला. त्यानंतर अधूनमधून रात्रभर रिमझिम पाऊस सुरू होता. २६ आॅगस्ट रोजी दुपारी तब्बल एक तास चांगला पाऊस झाला. २७ आॅगस्ट रोजी दिवसभर ढगाळी वातावरण होते. रात्री १० वाजताच्या सुमारास दीड तास दमदार पाऊस झाला. रात्रीसुद्धा पाऊस सुरूच होता. गेल्या तीन दिवसांपासून पुसद परिसरात पाऊस सुरू असल्याने शेतकरी सुखावला आहे. या पावसाचा फायदा पिकाला होणार आहे. उशिरा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची पिके पाहिजे तेवढ्या प्रमाणात जोमाने येणार नसली तरी या पावसाचा फायदा मात्र निश्चितच होणार आहे.यावर्षी वरूण राजा सुरुवातीपासूनच रुसला होता. जूनमध्ये पावसाने दगा दिला. त्यामुळे काही भागातील पेरण्या उलटल्या. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. त्यानंतरही पावसाची चिन्हे दिसत नव्हती. शेतकऱ्यांचे डोळे आशाकडे लागले होते. पिके पावसाअभावी कोमेजून चालले होते. नदी-नालेही कोरडे पडले होते. पूस धरणात केवळ १६ टक्के जलसाठा होता. त्यामुळे एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची वेळ आली होती. मात्र गेल्या तीन दिवसांपासून परिसरात पडत असलेल्या पावसाने पूस धरणात ३९०.७५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे, अशी माहिती प्रकल्पाच्या सूत्रांनी दिली. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. थंडावाही वाढला आहे. पावसाचा जोर कायम असून पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही अंशी मिटला आहे. मात्र ग्रामीण भागात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. (तालुका प्रतिनिधी)