शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

कोरोना वार्डातून डिस्चार्ज केलेला रुग्ण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 05:00 IST

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यवतमाळ शहरातील तायडेनगर परिसरातील एका कोरोना रुग्णाला अहवाल निगेटिव्ह आल्यावरून सुटी देण्यात आली. मात्र नंतर तो रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल मिळाला. सुटी दिलेल्या रुग्णाला परत आणण्यासाठी तो पळून गेल्याचे पत्र काढण्यात आले. २४ जुलै रोजी कोरोनामुक्त झाल्याने त्या ४२ वर्षीय रुग्णाला सोडून देण्यात आले.

ठळक मुद्देपळून गेल्याचा देखावा : वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना वॉर्डात उपचार घेत असलेला ४२ वर्षीय इसम कोरोना निगेटिव्ह आल्याने त्याला सुटी देण्यात आली. मात्र नंतर तो रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. गडबड झाल्याचे लक्षात येताच तो रुग्ण पळून गेला व त्याचा शोध घ्यावा असा आदेशही जिल्हा शल्यचिकित्सकांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला.कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यवतमाळ शहरातील तायडेनगर परिसरातील एका कोरोना रुग्णाला अहवाल निगेटिव्ह आल्यावरून सुटी देण्यात आली. मात्र नंतर तो रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल मिळाला. सुटी दिलेल्या रुग्णाला परत आणण्यासाठी तो पळून गेल्याचे पत्र काढण्यात आले. २४ जुलै रोजी कोरोनामुक्त झाल्याने त्या ४२ वर्षीय रुग्णाला सोडून देण्यात आले. मात्र २५ जुलै रोजी पत्र काढून पॉझिटिव्ह रुग्ण पळून गेला आहे, त्याचा शोध घेऊन दाखल करण्यात यावे असे पत्र तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावरून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच वैद्यकीय यंत्रणेची तारांबळ उडत असल्याचे दिसून येते. कोरोना रुग्णांच्या संदर्भात एकाच वेळी आरोग्य विभागाच्या तीन आस्थापना काम करीत आहे. यात जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना समन्वयक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्त यंत्रणा कार्यरत आहे. रुग्ण वाढत असल्याने आता या यंत्रणांवर ताण येत असून असे प्रकार घडत असल्याचे दिसते.आर्णीच्या महिलेचा मृत्यू, २५ नवे रुग्णजिल्ह्यात रविवारी एकाच दिवशी २५ पॉझिटिव्ह रूग्णाची नोंद करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक १९ रूग्ण पांढरकवडा येथील आहेत. तर आर्णी शहरात एका मृत्यूची नोंद करण्यात आली. यामुळे कोरोना बळींचा आकडा २८ वर पोहोचला आहे. २९ जणांना सुटी देण्यात आली. दररोज कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रूग्णाची संख्या २३८ वर पोहोचली आहे. रविवारी आर्णीमधील मोमीनपुरा भागातील रहिवासी असलेल्या ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या २५ जणांमध्ये १४ पुरूष आणि ११ महिलांचा समावेश आहे. यामध्ये पांढरकवडा शहरातील १० पुरूष, ९ महिला, पुसद शहरातील एक महिला आणि भंडारी येथील एक पुरूष अशा दोन रुग्णांची नोंद पुसदमध्ये करण्यात आली. वणी शहरातील एक पुरूष, एक महिला, यवतमाळातील तायडेनगरातील एक पुरूष आणि नेर शहरातील एक पुरूष पॉझिटिव्ह आढळला. जिल्ह्यात आतापर्यंत ७४४ पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद झाली आहे. बºया झालेल्या रूग्णांचा आकडा ४८० वर पोहचला आहे.कोरोना पॉझिटिव्ह असलेली व्यक्ती उपचारानंतर निगेटिव्ह झाली, तरीही ती व्यक्ती बाहेर गेल्यानंतर कुणाच्या संपर्कात आल्यास पुन्हा पॉझिटिव्ह येऊ शकते, नेमका असाच प्रकार या घटनेत झाला असावा. अन्यथा पॉझिटिव्ह व्यक्तीला निगेटिव्ह म्हणून सोडणे शक्य नाही.- डॉ. तरंगतुषार वारेजिल्हा शल्यचिकित्सक, यवतमाळ.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या