शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रुग्ण आधी, डॉक्टर नंतर

By admin | Updated: July 5, 2014 01:39 IST

शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर पूर्णवेळ उपस्थित राहावा, अशी अपेक्षा असते. मात्र येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्ण आधी आणि डॉक्टर नंतर अशी स्थिती आहे.

नेर : शासकीय रुग्णालयांमध्ये डॉक्टर पूर्णवेळ उपस्थित राहावा, अशी अपेक्षा असते. मात्र येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्ण आधी आणि डॉक्टर नंतर अशी स्थिती आहे. तापाने फणफणत असलेल्या रुग्णाला डॉक्टर येईपर्यंत तपासणी आणि उपचारापासून वंचित राहावे लागते. याशिवाय इतर प्रकारच्या रुग्णांना तर केव्हा तपासणी होईल यासाठी कितीतरी वेळ प्रतीक्षा करावी लागते. एवढेच नव्हे तर येथील रुग्णालयात कर्मचाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. याचा त्रास रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना होतो. सदर रुग्णालयाला विविध प्रकारच्या समस्यांनी वेढले आहे. रुग्णवाहिका गेली कित्येक महिन्यांपासून आजारी आहे. तालुक्यासाठी उपलब्ध असलेली ही रुग्णवाहिका कधीच आॅनलाईन राहात नाही. या रुग्णवाहिकेद्वारे रुग्ण इतर ठिकाणी हलविताना दोन डॉक्टर आणि दोन परिचारिका आवश्यक आहे. मात्र असे कधीही घडले नाही. एकंदर या तालुक्यात रुग्णसेवेचा फज्जा उडाला आहे.या रुग्णालयामध्ये अनेक आजारांवरील औषधांचा तुटवडा आहे. यात रुग्णांची हेळसांड होते. रुग्णालयात दाखल रुग्णांना बाहेरून औषधी आणण्यास सांगू नये, असा शासनाचा आदेश आहे. मात्र ही बाबही दुर्लक्षित केली जात आहे. औषधसाठा पुरेसा नसल्यास तत्काळ उपलब्ध व्हावा यासाठी काही रकमेची तरतूद आरोग्य विभागामार्फत केली जाते. मात्र येथील शासकीय रुग्णालयाला ही रक्कम अजूनही मिळालेली नाही. येथील शवचिकित्सागृहाची अवस्थाही बिकट आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेहावरील कापड, शवचिकित्सा करणाऱ्या कर्मचाऱ्याने वापरलेले प्लास्टिक साहित्य जाळून नष्ट करायला पाहिजे. मात्र या बाबी कधीही होत नाही. शवचिकित्सागृहात मृतांवरील कपड्यांचे ढीग आहे. परिणामी या परिसरात दुर्गंधी सुटली आहे. शवचिकित्सेनंतर घेतलेला नमुना एका डब्यात घेवून संबंधितांकडे सोपविला जातो. येथे मात्र हे डबे बेवारस पडून असल्याचे चित्र आहे. रुग्णालयाच्या कामकाजात कुठलीही सुसुत्रता नाही. कोणत्यावेळी कोणता डॉक्टर गैरहजर राहील याचा नेम नाही. जिल्हा आरोग्य विभागही जनतेच्या तक्रारींचे निवारण करत नाही. अशीच काहीशी अवस्था येथील डोळ्याच्या दवाखान्याची आहे. गेली १५ दिवसांपासून रुग्ण परत जात असल्याचे काहींनी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले. यासंदर्भात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय जाधव यांना विचारले असता, त्यांनी जणू आपला रुग्णालयाशी कुठलाही संबंध नाही, असे उत्तर दिले. शवचिकित्सागृहासंदर्भात विचारले असता सफाई कामगारांना साफसफाईविषयी सूचना दिली आहे, असे सांगून त्यांनी आपली जबाबदारी झटकली. यावरून या रुग्णालयाचा करभार कसा चालतो हे दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)