शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

खबरदारीअभावी जाताहेत प्रवाशांचे जीव

By admin | Updated: December 28, 2015 03:40 IST

रेल्वेगाड्यात कोचच्या दारावर उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. यामुळे तोल जाऊन खाली पडल्यामुळे अनेक प्रवाशांचा मृत्यू होत आहे.

प्रमाण वाढले : कोचच्या दारावर उभे राहून करतात प्रवासनागपूर : रेल्वेगाड्यात कोचच्या दारावर उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. यामुळे तोल जाऊन खाली पडल्यामुळे अनेक प्रवाशांचा मृत्यू होत आहे. तर असंख्य प्रवासी गंभीर जखमी होऊन त्यांना कायमचे अपंगत्व येण्याच्या घटनात वाढ झाली आहे.रेल्वेगाडीत प्रवास करताना अनेक प्रवासी मोबाईलवर बोलत बोलत कोचच्या दारावर उभे राहून प्रवास करतात. मोबाईलवर बोलण्याच्या नादात त्यांचे लक्ष नसल्यामुळे अचानक पाय घसरून त्यांचा तोल जातो. आधीच गाडी वेगात असल्यामुळे ते जोरात खाली फेकल्या जातात. यात ते गंभीर जखमी होतात. अनेक प्रवाशांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे तर काहींचा अतिरक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. रेल्वेस्थानकावर प्रवाशांना एका प्लॅटफार्मवरून दुसऱ्या प्लॅटफार्मवर जाण्यासाठी फूट ओव्हरब्रीजची सुविधा आहे. परंतु शॉर्टकटच्या नादात अनेक प्रवासी रेल्वे रुळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफार्मवर जाण्याचा प्रयत्न करतात. हा प्रयत्न अनेकदा त्यांच्या जीवावर बेततो. वेगात असलेल्या रेल्वेगाडीला एकदम ब्रेक मारणे शक्य होत नसल्याने संबंधित रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशाच्या चिंधड्या उडतात. या घटनात सातत्याने वाढ होत आहे. वारंवार अशा घटना घडूनही प्रवासी त्यापासून कुठलाच धडा घेताना दिसत नाहीत. त्यामुळे खबरदारी बाळगून आपला जीव वाचविण्यासाठी प्रवाशांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)अशी आहे दंडाची तरतूदरेल्वेगाडीच्या पायदानावर बसून प्रवास करणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रवाशांवर रेल्वे अ‍ॅक्ट १५६ नुसार कारवाईची तरतूद आहे. या अ‍ॅक्टनुसार एक हजार रुपये दंड किंवा सहा महिन्यांची शिक्षा किंवा दोन्ही अशी तरतूद आहे. फूटओव्हरब्रीज टाळून रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवरही रेल्वे अ‍ॅक्ट १४७ नुसार कारवाई करण्यात येते. या अ‍ॅक्टनुसार ५०० रुपये दंड किंवा सहा महिन्यांची शिक्षा किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे.सूचना, पथनाट्याद्वारे जनजागृती‘प्रवाशांनी रेल्वेगाडीच्या पायदानावर बसून प्रवास करणे तसेच रेल्वे रुळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफार्मवर जाणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकारचे कृत्य प्रवाशांनी करू नये यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात येतात. यात ध्वनिक्षेपकावरून प्रवाशांना सूचना देणे, रेल्वेस्थानकावर पथनाट्य सादर करून प्रवाशांमध्ये जनजागृती करणे आणि रेल्वेगाड्यात स्टिकर्स लावून माहिती पुरविण्याचे काम करण्यात येते.’कल्याण मोरे, निरीक्षक, रेल्वे सुरक्षा दल