शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

खबरदारीअभावी जाताहेत प्रवाशांचे जीव

By admin | Updated: December 28, 2015 03:40 IST

रेल्वेगाड्यात कोचच्या दारावर उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. यामुळे तोल जाऊन खाली पडल्यामुळे अनेक प्रवाशांचा मृत्यू होत आहे.

प्रमाण वाढले : कोचच्या दारावर उभे राहून करतात प्रवासनागपूर : रेल्वेगाड्यात कोचच्या दारावर उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. यामुळे तोल जाऊन खाली पडल्यामुळे अनेक प्रवाशांचा मृत्यू होत आहे. तर असंख्य प्रवासी गंभीर जखमी होऊन त्यांना कायमचे अपंगत्व येण्याच्या घटनात वाढ झाली आहे.रेल्वेगाडीत प्रवास करताना अनेक प्रवासी मोबाईलवर बोलत बोलत कोचच्या दारावर उभे राहून प्रवास करतात. मोबाईलवर बोलण्याच्या नादात त्यांचे लक्ष नसल्यामुळे अचानक पाय घसरून त्यांचा तोल जातो. आधीच गाडी वेगात असल्यामुळे ते जोरात खाली फेकल्या जातात. यात ते गंभीर जखमी होतात. अनेक प्रवाशांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे तर काहींचा अतिरक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. रेल्वेस्थानकावर प्रवाशांना एका प्लॅटफार्मवरून दुसऱ्या प्लॅटफार्मवर जाण्यासाठी फूट ओव्हरब्रीजची सुविधा आहे. परंतु शॉर्टकटच्या नादात अनेक प्रवासी रेल्वे रुळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफार्मवर जाण्याचा प्रयत्न करतात. हा प्रयत्न अनेकदा त्यांच्या जीवावर बेततो. वेगात असलेल्या रेल्वेगाडीला एकदम ब्रेक मारणे शक्य होत नसल्याने संबंधित रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशाच्या चिंधड्या उडतात. या घटनात सातत्याने वाढ होत आहे. वारंवार अशा घटना घडूनही प्रवासी त्यापासून कुठलाच धडा घेताना दिसत नाहीत. त्यामुळे खबरदारी बाळगून आपला जीव वाचविण्यासाठी प्रवाशांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)अशी आहे दंडाची तरतूदरेल्वेगाडीच्या पायदानावर बसून प्रवास करणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रवाशांवर रेल्वे अ‍ॅक्ट १५६ नुसार कारवाईची तरतूद आहे. या अ‍ॅक्टनुसार एक हजार रुपये दंड किंवा सहा महिन्यांची शिक्षा किंवा दोन्ही अशी तरतूद आहे. फूटओव्हरब्रीज टाळून रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवरही रेल्वे अ‍ॅक्ट १४७ नुसार कारवाई करण्यात येते. या अ‍ॅक्टनुसार ५०० रुपये दंड किंवा सहा महिन्यांची शिक्षा किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे.सूचना, पथनाट्याद्वारे जनजागृती‘प्रवाशांनी रेल्वेगाडीच्या पायदानावर बसून प्रवास करणे तसेच रेल्वे रुळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफार्मवर जाणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकारचे कृत्य प्रवाशांनी करू नये यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात येतात. यात ध्वनिक्षेपकावरून प्रवाशांना सूचना देणे, रेल्वेस्थानकावर पथनाट्य सादर करून प्रवाशांमध्ये जनजागृती करणे आणि रेल्वेगाड्यात स्टिकर्स लावून माहिती पुरविण्याचे काम करण्यात येते.’कल्याण मोरे, निरीक्षक, रेल्वे सुरक्षा दल