शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

खबरदारीअभावी जाताहेत प्रवाशांचे जीव

By admin | Updated: December 28, 2015 03:40 IST

रेल्वेगाड्यात कोचच्या दारावर उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. यामुळे तोल जाऊन खाली पडल्यामुळे अनेक प्रवाशांचा मृत्यू होत आहे.

प्रमाण वाढले : कोचच्या दारावर उभे राहून करतात प्रवासनागपूर : रेल्वेगाड्यात कोचच्या दारावर उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. यामुळे तोल जाऊन खाली पडल्यामुळे अनेक प्रवाशांचा मृत्यू होत आहे. तर असंख्य प्रवासी गंभीर जखमी होऊन त्यांना कायमचे अपंगत्व येण्याच्या घटनात वाढ झाली आहे.रेल्वेगाडीत प्रवास करताना अनेक प्रवासी मोबाईलवर बोलत बोलत कोचच्या दारावर उभे राहून प्रवास करतात. मोबाईलवर बोलण्याच्या नादात त्यांचे लक्ष नसल्यामुळे अचानक पाय घसरून त्यांचा तोल जातो. आधीच गाडी वेगात असल्यामुळे ते जोरात खाली फेकल्या जातात. यात ते गंभीर जखमी होतात. अनेक प्रवाशांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे तर काहींचा अतिरक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. रेल्वेस्थानकावर प्रवाशांना एका प्लॅटफार्मवरून दुसऱ्या प्लॅटफार्मवर जाण्यासाठी फूट ओव्हरब्रीजची सुविधा आहे. परंतु शॉर्टकटच्या नादात अनेक प्रवासी रेल्वे रुळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफार्मवर जाण्याचा प्रयत्न करतात. हा प्रयत्न अनेकदा त्यांच्या जीवावर बेततो. वेगात असलेल्या रेल्वेगाडीला एकदम ब्रेक मारणे शक्य होत नसल्याने संबंधित रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशाच्या चिंधड्या उडतात. या घटनात सातत्याने वाढ होत आहे. वारंवार अशा घटना घडूनही प्रवासी त्यापासून कुठलाच धडा घेताना दिसत नाहीत. त्यामुळे खबरदारी बाळगून आपला जीव वाचविण्यासाठी प्रवाशांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)अशी आहे दंडाची तरतूदरेल्वेगाडीच्या पायदानावर बसून प्रवास करणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रवाशांवर रेल्वे अ‍ॅक्ट १५६ नुसार कारवाईची तरतूद आहे. या अ‍ॅक्टनुसार एक हजार रुपये दंड किंवा सहा महिन्यांची शिक्षा किंवा दोन्ही अशी तरतूद आहे. फूटओव्हरब्रीज टाळून रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवरही रेल्वे अ‍ॅक्ट १४७ नुसार कारवाई करण्यात येते. या अ‍ॅक्टनुसार ५०० रुपये दंड किंवा सहा महिन्यांची शिक्षा किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे.सूचना, पथनाट्याद्वारे जनजागृती‘प्रवाशांनी रेल्वेगाडीच्या पायदानावर बसून प्रवास करणे तसेच रेल्वे रुळ ओलांडून दुसऱ्या प्लॅटफार्मवर जाणे हा कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकारचे कृत्य प्रवाशांनी करू नये यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात येतात. यात ध्वनिक्षेपकावरून प्रवाशांना सूचना देणे, रेल्वेस्थानकावर पथनाट्य सादर करून प्रवाशांमध्ये जनजागृती करणे आणि रेल्वेगाड्यात स्टिकर्स लावून माहिती पुरविण्याचे काम करण्यात येते.’कल्याण मोरे, निरीक्षक, रेल्वे सुरक्षा दल