शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

रस्ता रूंदीकरणात प्रवाशांचा जीव सापडला धोक्यात

By admin | Updated: September 30, 2014 23:42 IST

वणी ते करंजी या रस्त्याचे रूंदीकरण गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडले आहेत़ सोभतच काम सुरू असताना फलक नसल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे़

बोटोणी : वणी ते करंजी या रस्त्याचे रूंदीकरण गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडले आहेत़ सोभतच काम सुरू असताना फलक नसल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे़गेल्या दोन-तीन वर्षांपासून वणी ते करंजी या राज्य मार्गाचे कासवगतीने रूंदीकरण सुरू आहे़ रस्ते हे देश विकासाच्या रक्तवाहिन्या समजल्या जाते़ परंतु या रस्ता रूंदीकरणात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. वाहने खिळखिळी होत आहे. दररोज या रस्त्याने ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या कंबरा खिळखिळ्या झाल्या़ परिणामी वाहनासह प्रवाशांचे आयुष्य कमी होत आहे़वणी ते करंजी मार्गावरील खडकी नाल्यालगत रस्त्याचे रूंदीकरण होत आहे़ तेथे एकेरी वाहतूक सुरू असून रात्री फलकाअभावी वाहनधारकांना वाहन चालविणे कठीण जाते़ करंजीकडून येणारे वाहन जर वेगात असेल, आणि या ठिकाणी वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्यास किंवा बे्रेक न लागल्यास वाहन खडकीच्या नाल्यात गेल्याशिवाय राहात नाही़हीच परिस्थिती बोटोणीनजीकच्या पुलाची आहे. रस्ता रूंदीकरणानाने येथेही एकेरी वाहतूक आहे़ अर्धाअधिक रस्ता खोदल्यामुळे वाहन रस्त्याच्या खालून चालवावे लागते़ पाऊस पडल्यास तेथे चिखल साचत असल्याने वाहन पलटले जाते़ वाहनावरचे नियंत्रण सुटल्यास वाहन पुलामध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही़ या मार्गावर अनेक ठिकाणी पुलांचे बांधकाम करण्यात येत आहे़ त्यासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. त्या ठिकाणी गिट्टी, मुरूम टाकल्याने आता खड्डे पडले आहेत़पुलाचे बांधकाम रस्ता रूंदीकरणासाठी अडसर ठरत आहे़ त्यातच महावितरण कंपनीने भूमिगत वीज वाहिनीसाठी अनेक ठिकाणी आरपार रस्ते खोदले आहेत. गिट्टी, मुरूम टाकून तात्पुरती खड्ड्याची मलमपट्टी केली़ आता मात्र अनेक ठिकाणी नालीसारखे खड्डे पडत आहे़ वणी ते करंजी या ५० किलोमीटर रस्त्याचे रूंदीकरण आंध्रप्रदेशातील एका कंपनीला देण्यात आले. मात्र या कामात गैरप्रकार होत असल्याची ओरड सुरू आहे. सोमनााळा बसस्थानकानजीक डांबरीकरण उखडल्याने खड्डा पडला आहे़ मांगरूळ येथील हनुमान मंदिरानजीकच्या पुलाचे डांबरीकरण दबले आहे़ तेथे वाहन उसळते़ मांगरूळ-वेगाव चौफुली रस्त्यावर पुलाचे डांबरीकरण दबले आहे़ यात भ्रष्टाचार होत असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे़ रस्त्याच्या रूंदीकरणासाठी खोल खोदकाम करण्यात आले. मात्र काम सुरू असल्याचे फलकच गायब झाले आहे़ त्यामुळे रात्री वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते़ याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी आहे़ (वार्ताहर)