शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता रूंदीकरणात प्रवाशांचा जीव सापडला धोक्यात

By admin | Updated: September 30, 2014 23:42 IST

वणी ते करंजी या रस्त्याचे रूंदीकरण गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडले आहेत़ सोभतच काम सुरू असताना फलक नसल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे़

बोटोणी : वणी ते करंजी या रस्त्याचे रूंदीकरण गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडले आहेत़ सोभतच काम सुरू असताना फलक नसल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे़गेल्या दोन-तीन वर्षांपासून वणी ते करंजी या राज्य मार्गाचे कासवगतीने रूंदीकरण सुरू आहे़ रस्ते हे देश विकासाच्या रक्तवाहिन्या समजल्या जाते़ परंतु या रस्ता रूंदीकरणात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. वाहने खिळखिळी होत आहे. दररोज या रस्त्याने ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या कंबरा खिळखिळ्या झाल्या़ परिणामी वाहनासह प्रवाशांचे आयुष्य कमी होत आहे़वणी ते करंजी मार्गावरील खडकी नाल्यालगत रस्त्याचे रूंदीकरण होत आहे़ तेथे एकेरी वाहतूक सुरू असून रात्री फलकाअभावी वाहनधारकांना वाहन चालविणे कठीण जाते़ करंजीकडून येणारे वाहन जर वेगात असेल, आणि या ठिकाणी वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्यास किंवा बे्रेक न लागल्यास वाहन खडकीच्या नाल्यात गेल्याशिवाय राहात नाही़हीच परिस्थिती बोटोणीनजीकच्या पुलाची आहे. रस्ता रूंदीकरणानाने येथेही एकेरी वाहतूक आहे़ अर्धाअधिक रस्ता खोदल्यामुळे वाहन रस्त्याच्या खालून चालवावे लागते़ पाऊस पडल्यास तेथे चिखल साचत असल्याने वाहन पलटले जाते़ वाहनावरचे नियंत्रण सुटल्यास वाहन पुलामध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही़ या मार्गावर अनेक ठिकाणी पुलांचे बांधकाम करण्यात येत आहे़ त्यासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. त्या ठिकाणी गिट्टी, मुरूम टाकल्याने आता खड्डे पडले आहेत़पुलाचे बांधकाम रस्ता रूंदीकरणासाठी अडसर ठरत आहे़ त्यातच महावितरण कंपनीने भूमिगत वीज वाहिनीसाठी अनेक ठिकाणी आरपार रस्ते खोदले आहेत. गिट्टी, मुरूम टाकून तात्पुरती खड्ड्याची मलमपट्टी केली़ आता मात्र अनेक ठिकाणी नालीसारखे खड्डे पडत आहे़ वणी ते करंजी या ५० किलोमीटर रस्त्याचे रूंदीकरण आंध्रप्रदेशातील एका कंपनीला देण्यात आले. मात्र या कामात गैरप्रकार होत असल्याची ओरड सुरू आहे. सोमनााळा बसस्थानकानजीक डांबरीकरण उखडल्याने खड्डा पडला आहे़ मांगरूळ येथील हनुमान मंदिरानजीकच्या पुलाचे डांबरीकरण दबले आहे़ तेथे वाहन उसळते़ मांगरूळ-वेगाव चौफुली रस्त्यावर पुलाचे डांबरीकरण दबले आहे़ यात भ्रष्टाचार होत असल्याचा प्रवाशांचा आरोप आहे़ रस्त्याच्या रूंदीकरणासाठी खोल खोदकाम करण्यात आले. मात्र काम सुरू असल्याचे फलकच गायब झाले आहे़ त्यामुळे रात्री वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते़ याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी आहे़ (वार्ताहर)