शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्थापितांमुळे पक्षाची कोंडी

By admin | Updated: February 22, 2016 02:35 IST

काँग्रेसमध्ये गत काही वर्षांपासून प्रस्थापितांचे प्रस्थ वाढले आहे. नेत्यानंतर त्यांचा गोतावळाच विविध पदावर आरुढ होतो,

काँग्रेसची कार्यशाळा : पदाधिकाऱ्यांनी मांडल्या नेत्यांपुढे व्यथायवतमाळ : काँग्रेसमध्ये गत काही वर्षांपासून प्रस्थापितांचे प्रस्थ वाढले आहे. नेत्यानंतर त्यांचा गोतावळाच विविध पदावर आरुढ होतो, यामुळे सामान्य कार्यकर्ताच काँग्रेसपासून दुरावला आहे. काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर पक्षातील प्रस्थापितांनी केलेली कोंडी दूर करण्याची गरज असल्याची भावना अमरावती विभागातून आलेल्या काँग्रेसच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी नेत्यांपुढे व्यक्त केली. यवतमाळात अमरावती विभागीय काँग्रेसची कार्यशाळा व चर्चासत्राचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. यावेळी अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ या पाच जिल्ह्यातून आलेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक होते. त्यांच्या पुढेच कार्यकर्त्यांनी पाढा वाचला. बुलडाणा येथील शाम उमाळकर म्हणाले, पक्षाच्या चिन्हावर एकदा आमदार झालेली व्यक्ती त्या पुढची सर्व पदे आपल्या गोतावळ्यापुरतीच मर्यादित ठेवतात. त्यामुळे दोन पेक्षा अधिक वेळा कोणालाही कोणत्याही निवडणुकीत उमेदवारी देऊ नये, असा नियमच करावा. सध्या युवक काँग्रेसमध्ये निवडणुकीतून पदाधिकारी ठरतात. ही पद्धत अतिशय चुकीची असून प्रस्थापितांची मुले मोठ्या पदावर जाऊन बसतात, असे ते म्हणाले. यवतमाळचे अशोक बोबडे यांनी पक्षाजवळ कार्यकर्ता नसल्याची खंत व्यक्त केली. पूर्वी काँग्रेस सेवादल, युवक काँग्रेस, एनएसयुआय पूर्ण ताकदीने सक्रिय असायचे. यातून कॅडरबेस कार्यकर्ता पक्षाजवळ होता. यातूनच आम्ही घडलो. मात्र आज साधा निषेध नोंदविण्यासाठीही रस्त्यावर उतरणारा कार्यकर्ता काँग्रेसकडे नाही, राजकारणातील सक्रिय महिलांना उमेदवारी देताना डावलून प्रस्थापितांच्या सौभाग्यवतींनाच पुढे केले जाते. आज भाजपा सरकारविरोधात जनतेत मोठी नाराजी आहे. मात्र विरोधक म्हणून काँग्रेस ती कॅश करू शकत नाही. कॅडर बेस कार्यकर्ता तयार करण्यावर भर देण्याचे त्यांनी सांगितले. अकोला येथील मदन भरगड, पुसदचे डॉ. वजाहत मिर्झा, अ‍ॅड. सचिन नाईक, घाटंजी येथील राजेश निकोडे, अमरावती येथील किशोर बोरकर, नसीम खान, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष छाया दंडाळे, यवतमाळच्या मिनाक्षी वेट्टी, सिकंदर शाह, वाशिमचे दिलीप भोजराज यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नेत्यांनी त्यांच्या भावना श्रेष्ठींपुढे मांडण्याचे आश्वासन दिले. (कार्यालय प्रतिनिधी) काँग्रेसमधून कार्यकर्ता संपल्याची खंत चर्चासत्राच्या सुरुवातीला काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्यांनी व आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे ‘काल-आज आणि उद्याची स्थिती’ यावर आपली मतमतांतरे व्यक्त केली. पहिल्या सत्रात विधानसभा व लोकसभेतील पराभवावरूनच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाल्या. मात्र नंतर चर्चेचा सूर हा पक्षबांधणी व कार्यकर्त्यांची स्थिती यावर केंद्रीत करण्यात आला. अनेक दिग्गज पक्षात असूनही पदापासून वंचित असल्याचे वास्तव यावेळी पुढे आले. माजी आमदार संजय देशमुख, विजय खडसे, विजयाताई धोटे यांच्यासह जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, नरेंद्र ठाकरे, रमेश चव्हाण, राहुल ठाकरे, संध्याताई सव्वालाखे, प्रीतिला दुधे, अरुण राऊत, संतोष बोरेले, भारत राठोड, नितीन मिर्झापुरे आदी उपस्थित होते.