शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांच्या भाग्याचा आज फैसला?

By admin | Updated: February 23, 2017 00:58 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणातील सुमारे एक हजार १० उमेदवारांच्या

१०१० उमेदवार : जिल्हा परिषद, पंचायत समितीवर कुणाचा झेंडा फडकणार ? यवतमाळ : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणातील सुमारे एक हजार १० उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा उद्या गुरूवारी फैसला होणार आहे. दुपारी ४ वाजतापर्यंत मिनी मंत्रालयावर कुणाचा झेंडा फडकणार, हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, गामीण भागात निकालाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. जिल्हा परिषदेचे ६१ गट आणि १६ पंचायत समितींच्या १२२ गणांसाठी १६ व २१ फेब्रुवारी रोजी दोन टप्प्यात मतदान घेण्यात आले. या दोन्ही टप्प्यांची मतमोजणी उद्या संबंधित तहसीलस्तरावर होणार आहे. जिल्हा परिषदेच्या ६१ गटांसाठी ३४९, तर पंचायत समितींच्या १२२ जागांसाठी ६६१ उमेदवार रिंगणात होते. या सर्वांच्या राजकीय भवितव्याचा उद्या फैसला होणार आहे. विद्यमान जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती. ही सत्ता उलथवून टाकण्यासाठी यावेळी भाजपा आणि शिवसेनेने जोरदार तयारी केली. मात्र काँग्रेस व राष्ट्रवादीपेक्षा भाजपा व शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपल्याचे निवडणुकीतील प्रचारावरून दिसून आले. शिवसेनेने तर भाजपाला आडवे करूनच जिल्हा परिषदेत पोहोचायचे, असा चंग बांधला होता. भाजपानेही जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी सर्व उपाय केले. ऐनवेळी दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना उमेदवारी बहाल केली. या सर्व खेळींचा भाजपाला नेमका किती लाभ झाला, हे मतमोजणीअंती स्पष्ट होईल. गुरूवारी दुपारी ४ वाजतापर्यंत सर्व निकाल हाती येण्याची अपेक्षा आहे. त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. तथापि जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघीडीची सत्ता पुन्हा स्थापन होईल, असा राजकीय जाणकारांचा होरा आहे. जिल्हा परिषदेतील बहुतांश अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही त्यांची सत्ता स्थापन व्हावी, असे मनोमन वाटत आहे. मात्र मतदार राजाने नेमका कोणता कौल दिला, हे अद्याप स्पष्ट नसल्याने सर्वांचा जीव टांगणीला लागला आहे. (शहर प्रतिनिधी) ढोलताशा, गुलाल उधळण्याला बंदी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतमोजणीची एक फेरी केवळ १५ मिनिटांत पूर्ण होणार आहे. सर्व गट आणि गणांची मतमोजणी एकाच वेळी सुरू होणार आहे. मात्र शेवटच्या फेरीनंतरच निकाल जाहीर होणार आहे. मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. तत्काळ निकाल जाहिर करण्यापेक्षा सर्वच निकाल एकाचवेळी जाहीर करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यात विशेष बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. सरासरी १६ टेबल प्रत्येक ठिकाणी राहणार आहे. जिल्ह्यात २५६ टेबलवर ७८६ कर्मचारी मतमोजणी करणार आहेत. पहिल्या फेरीला ३५ ते ४५ मिनीटे लागतील. तीन ते चार फेऱ्यानंतर मोजणीला गती येईल. नंतर १२ ते १५ मिनिटात फेरी पूर्ण होईल. त्यामुळे दुपारी ४ वाजतापर्यंत पूर्ण निकाल हाती येणार आहे. मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे. ५०० मीटर परिसरात जमावाने गोळा होणे, ढोल वाजविणे, घोषणाबाजी करणे, गुलाल उधळण्यावर बंदी घालण्यात आली आहे.