शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांच्या भाग्याचा आज फैसला?

By admin | Updated: February 23, 2017 00:58 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणातील सुमारे एक हजार १० उमेदवारांच्या

१०१० उमेदवार : जिल्हा परिषद, पंचायत समितीवर कुणाचा झेंडा फडकणार ? यवतमाळ : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणातील सुमारे एक हजार १० उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा उद्या गुरूवारी फैसला होणार आहे. दुपारी ४ वाजतापर्यंत मिनी मंत्रालयावर कुणाचा झेंडा फडकणार, हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, गामीण भागात निकालाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. जिल्हा परिषदेचे ६१ गट आणि १६ पंचायत समितींच्या १२२ गणांसाठी १६ व २१ फेब्रुवारी रोजी दोन टप्प्यात मतदान घेण्यात आले. या दोन्ही टप्प्यांची मतमोजणी उद्या संबंधित तहसीलस्तरावर होणार आहे. जिल्हा परिषदेच्या ६१ गटांसाठी ३४९, तर पंचायत समितींच्या १२२ जागांसाठी ६६१ उमेदवार रिंगणात होते. या सर्वांच्या राजकीय भवितव्याचा उद्या फैसला होणार आहे. विद्यमान जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती. ही सत्ता उलथवून टाकण्यासाठी यावेळी भाजपा आणि शिवसेनेने जोरदार तयारी केली. मात्र काँग्रेस व राष्ट्रवादीपेक्षा भाजपा व शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपल्याचे निवडणुकीतील प्रचारावरून दिसून आले. शिवसेनेने तर भाजपाला आडवे करूनच जिल्हा परिषदेत पोहोचायचे, असा चंग बांधला होता. भाजपानेही जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी सर्व उपाय केले. ऐनवेळी दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना उमेदवारी बहाल केली. या सर्व खेळींचा भाजपाला नेमका किती लाभ झाला, हे मतमोजणीअंती स्पष्ट होईल. गुरूवारी दुपारी ४ वाजतापर्यंत सर्व निकाल हाती येण्याची अपेक्षा आहे. त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. तथापि जिल्हा परिषदेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघीडीची सत्ता पुन्हा स्थापन होईल, असा राजकीय जाणकारांचा होरा आहे. जिल्हा परिषदेतील बहुतांश अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही त्यांची सत्ता स्थापन व्हावी, असे मनोमन वाटत आहे. मात्र मतदार राजाने नेमका कोणता कौल दिला, हे अद्याप स्पष्ट नसल्याने सर्वांचा जीव टांगणीला लागला आहे. (शहर प्रतिनिधी) ढोलताशा, गुलाल उधळण्याला बंदी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतमोजणीची एक फेरी केवळ १५ मिनिटांत पूर्ण होणार आहे. सर्व गट आणि गणांची मतमोजणी एकाच वेळी सुरू होणार आहे. मात्र शेवटच्या फेरीनंतरच निकाल जाहीर होणार आहे. मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. तत्काळ निकाल जाहिर करण्यापेक्षा सर्वच निकाल एकाचवेळी जाहीर करण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यात विशेष बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. सरासरी १६ टेबल प्रत्येक ठिकाणी राहणार आहे. जिल्ह्यात २५६ टेबलवर ७८६ कर्मचारी मतमोजणी करणार आहेत. पहिल्या फेरीला ३५ ते ४५ मिनीटे लागतील. तीन ते चार फेऱ्यानंतर मोजणीला गती येईल. नंतर १२ ते १५ मिनिटात फेरी पूर्ण होईल. त्यामुळे दुपारी ४ वाजतापर्यंत पूर्ण निकाल हाती येणार आहे. मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे. ५०० मीटर परिसरात जमावाने गोळा होणे, ढोल वाजविणे, घोषणाबाजी करणे, गुलाल उधळण्यावर बंदी घालण्यात आली आहे.