शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
6
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
7
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
8
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
10
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
11
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
12
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
13
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
14
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
15
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
16
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
17
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
18
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
19
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
20
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...

परसोडी गावात कोंबडीशिवाय पिलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 21:48 IST

कोंबडी अंड्यावर बसविल्याशिवाय पिलं तयारच होत नाही, असच कुणी सांगेल. कोंबडीशिवाय पिलं तयार झाली म्हटले तर हसतील. मात्र आजच्या कल्पकतेच्या युगात हे सर्व घडत आहे. किचकट, दीर्घ कालावधीच्या आणि अडकून पडण्याच्या पध्दती बाद होत चालल्या आहे.

ठळक मुद्देकल्पकतेची किमया : पृष्ठाचा डबा व लाईटचा वापर, कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : कोंबडी अंड्यावर बसविल्याशिवाय पिलं तयारच होत नाही, असच कुणी सांगेल. कोंबडीशिवाय पिलं तयार झाली म्हटले तर हसतील. मात्र आजच्या कल्पकतेच्या युगात हे सर्व घडत आहे. किचकट, दीर्घ कालावधीच्या आणि अडकून पडण्याच्या पध्दती बाद होत चालल्या आहे. परसोडी (ता.कळंब) गावातील युवकांनी हीच कास धरत कोंबडीशिवाय पिलं तयार करण्याची किमया साधली आहे.परसोडी (बु.) येथील ऋषीकेश दीपक ढोले व त्याचे काका प्रशांत अंकुश ढोले यांनी कोंबडी अंड्यावर न बसविता पिल्ले तयार करणारे यंत्र विकसित केले. यासाठी त्यांना केवळ ७०० रुपये खर्च आला आहे. परसोडी (बु.) येथील सरपंच आणि प्रगतशील शेतकरी आनंदराव जगताप यांनी गावराण कोंबड्या पाळल्या आहे. त्यांच्याकडील दोन कोंबड्या अंड्यावर बसत नव्हत्या. याची माहिती कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेला ऋषीकेश दीपक ढोेले आणि प्रशांत अंकुश ढोले यांना देण्यात आली. ऋषीकेशने यापूर्वी शेतीत अनेक यशस्वी प्रयोग केलेले आहे. कोंबडीशिवाय पिलाचा प्रयोग यशस्वी करण्याचा चंग त्याने बांधला. यात तो यशस्वीसुध्दा झाला. यासाठी अनेक पुस्तके चाळली.अंडी उबविण्यासाठी ३७ ते ३८ डिग्री तापमान व ७० ते ८० टक्के आर्द्रतेची गरज असते, अशी माहिती त्यांना मिळाली. सर्वप्रथम त्यांनी ४० अंडी मावतील इतका पृष्ठाचा डबा आतून थर्माकोल लाऊन तयार केला. डब्यात ३८ अंडी ठेवली. ६० पॉवरचा लाईट लावला. ३८ डिग्री तापमान होताच लाईट आपोआप बंद होईल, अशी यंत्रणा (सेंसर) विकसित केली. आर्द्रतेसाठी बल्बखाली पाणी ठेवले. बल्बच्या तापमानाने पाण्याची वाफ होऊन डब्यात आर्द्रता मिळविण्यात आली. कालांतराने अंडी फिरविण्यात आली. डब्यात ठेवलेल्या ३८ अंड्यापैकी २१ दिवसानंतर ३५ अंड्यातून पिल्ले बाहेर आली. कोंबडी अंडी उबविते तेव्हा पूर्ण अंड्यातून पिल्ले बाहेर येत नाही. कृत्रिम प्रयोगाचा सक्सेस रेट यापेक्षा अधिक आहे.घरीच करता येणारा प्रयोगकोणालाही घरच्याघरी करता येण्यासारखा हा प्रयोग आहे. याचे अनेक फायदे आहेत. कोंबडीला २१ दिवस अंड्यावर बसण्याची आणि पिलांना सांभाळण्याची गरज नाही. कोंबडी पुन्हा लवकरच अंडी द्यायला तयार होते. या प्रयोगाच्या यशांनतर ऋषीकेशने एकाच वेळी ३०० अंडी बसतील, असे यंत्र विकसित केले आहे. यापूर्वी त्याने फवारणी यंत्र व खत पेरणी यंत्र तयार केलेले आहे.