शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

परसोडी गावात कोंबडीशिवाय पिलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 21:48 IST

कोंबडी अंड्यावर बसविल्याशिवाय पिलं तयारच होत नाही, असच कुणी सांगेल. कोंबडीशिवाय पिलं तयार झाली म्हटले तर हसतील. मात्र आजच्या कल्पकतेच्या युगात हे सर्व घडत आहे. किचकट, दीर्घ कालावधीच्या आणि अडकून पडण्याच्या पध्दती बाद होत चालल्या आहे.

ठळक मुद्देकल्पकतेची किमया : पृष्ठाचा डबा व लाईटचा वापर, कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : कोंबडी अंड्यावर बसविल्याशिवाय पिलं तयारच होत नाही, असच कुणी सांगेल. कोंबडीशिवाय पिलं तयार झाली म्हटले तर हसतील. मात्र आजच्या कल्पकतेच्या युगात हे सर्व घडत आहे. किचकट, दीर्घ कालावधीच्या आणि अडकून पडण्याच्या पध्दती बाद होत चालल्या आहे. परसोडी (ता.कळंब) गावातील युवकांनी हीच कास धरत कोंबडीशिवाय पिलं तयार करण्याची किमया साधली आहे.परसोडी (बु.) येथील ऋषीकेश दीपक ढोले व त्याचे काका प्रशांत अंकुश ढोले यांनी कोंबडी अंड्यावर न बसविता पिल्ले तयार करणारे यंत्र विकसित केले. यासाठी त्यांना केवळ ७०० रुपये खर्च आला आहे. परसोडी (बु.) येथील सरपंच आणि प्रगतशील शेतकरी आनंदराव जगताप यांनी गावराण कोंबड्या पाळल्या आहे. त्यांच्याकडील दोन कोंबड्या अंड्यावर बसत नव्हत्या. याची माहिती कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेला ऋषीकेश दीपक ढोेले आणि प्रशांत अंकुश ढोले यांना देण्यात आली. ऋषीकेशने यापूर्वी शेतीत अनेक यशस्वी प्रयोग केलेले आहे. कोंबडीशिवाय पिलाचा प्रयोग यशस्वी करण्याचा चंग त्याने बांधला. यात तो यशस्वीसुध्दा झाला. यासाठी अनेक पुस्तके चाळली.अंडी उबविण्यासाठी ३७ ते ३८ डिग्री तापमान व ७० ते ८० टक्के आर्द्रतेची गरज असते, अशी माहिती त्यांना मिळाली. सर्वप्रथम त्यांनी ४० अंडी मावतील इतका पृष्ठाचा डबा आतून थर्माकोल लाऊन तयार केला. डब्यात ३८ अंडी ठेवली. ६० पॉवरचा लाईट लावला. ३८ डिग्री तापमान होताच लाईट आपोआप बंद होईल, अशी यंत्रणा (सेंसर) विकसित केली. आर्द्रतेसाठी बल्बखाली पाणी ठेवले. बल्बच्या तापमानाने पाण्याची वाफ होऊन डब्यात आर्द्रता मिळविण्यात आली. कालांतराने अंडी फिरविण्यात आली. डब्यात ठेवलेल्या ३८ अंड्यापैकी २१ दिवसानंतर ३५ अंड्यातून पिल्ले बाहेर आली. कोंबडी अंडी उबविते तेव्हा पूर्ण अंड्यातून पिल्ले बाहेर येत नाही. कृत्रिम प्रयोगाचा सक्सेस रेट यापेक्षा अधिक आहे.घरीच करता येणारा प्रयोगकोणालाही घरच्याघरी करता येण्यासारखा हा प्रयोग आहे. याचे अनेक फायदे आहेत. कोंबडीला २१ दिवस अंड्यावर बसण्याची आणि पिलांना सांभाळण्याची गरज नाही. कोंबडी पुन्हा लवकरच अंडी द्यायला तयार होते. या प्रयोगाच्या यशांनतर ऋषीकेशने एकाच वेळी ३०० अंडी बसतील, असे यंत्र विकसित केले आहे. यापूर्वी त्याने फवारणी यंत्र व खत पेरणी यंत्र तयार केलेले आहे.