शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
4
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
5
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
6
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
7
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
8
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
9
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
10
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
11
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
13
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
14
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
15
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
16
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
17
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
18
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
19
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
20
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 

परसोडी गावात कोंबडीशिवाय पिलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 21:48 IST

कोंबडी अंड्यावर बसविल्याशिवाय पिलं तयारच होत नाही, असच कुणी सांगेल. कोंबडीशिवाय पिलं तयार झाली म्हटले तर हसतील. मात्र आजच्या कल्पकतेच्या युगात हे सर्व घडत आहे. किचकट, दीर्घ कालावधीच्या आणि अडकून पडण्याच्या पध्दती बाद होत चालल्या आहे.

ठळक मुद्देकल्पकतेची किमया : पृष्ठाचा डबा व लाईटचा वापर, कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी

गजानन अक्कलवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : कोंबडी अंड्यावर बसविल्याशिवाय पिलं तयारच होत नाही, असच कुणी सांगेल. कोंबडीशिवाय पिलं तयार झाली म्हटले तर हसतील. मात्र आजच्या कल्पकतेच्या युगात हे सर्व घडत आहे. किचकट, दीर्घ कालावधीच्या आणि अडकून पडण्याच्या पध्दती बाद होत चालल्या आहे. परसोडी (ता.कळंब) गावातील युवकांनी हीच कास धरत कोंबडीशिवाय पिलं तयार करण्याची किमया साधली आहे.परसोडी (बु.) येथील ऋषीकेश दीपक ढोले व त्याचे काका प्रशांत अंकुश ढोले यांनी कोंबडी अंड्यावर न बसविता पिल्ले तयार करणारे यंत्र विकसित केले. यासाठी त्यांना केवळ ७०० रुपये खर्च आला आहे. परसोडी (बु.) येथील सरपंच आणि प्रगतशील शेतकरी आनंदराव जगताप यांनी गावराण कोंबड्या पाळल्या आहे. त्यांच्याकडील दोन कोंबड्या अंड्यावर बसत नव्हत्या. याची माहिती कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेला ऋषीकेश दीपक ढोेले आणि प्रशांत अंकुश ढोले यांना देण्यात आली. ऋषीकेशने यापूर्वी शेतीत अनेक यशस्वी प्रयोग केलेले आहे. कोंबडीशिवाय पिलाचा प्रयोग यशस्वी करण्याचा चंग त्याने बांधला. यात तो यशस्वीसुध्दा झाला. यासाठी अनेक पुस्तके चाळली.अंडी उबविण्यासाठी ३७ ते ३८ डिग्री तापमान व ७० ते ८० टक्के आर्द्रतेची गरज असते, अशी माहिती त्यांना मिळाली. सर्वप्रथम त्यांनी ४० अंडी मावतील इतका पृष्ठाचा डबा आतून थर्माकोल लाऊन तयार केला. डब्यात ३८ अंडी ठेवली. ६० पॉवरचा लाईट लावला. ३८ डिग्री तापमान होताच लाईट आपोआप बंद होईल, अशी यंत्रणा (सेंसर) विकसित केली. आर्द्रतेसाठी बल्बखाली पाणी ठेवले. बल्बच्या तापमानाने पाण्याची वाफ होऊन डब्यात आर्द्रता मिळविण्यात आली. कालांतराने अंडी फिरविण्यात आली. डब्यात ठेवलेल्या ३८ अंड्यापैकी २१ दिवसानंतर ३५ अंड्यातून पिल्ले बाहेर आली. कोंबडी अंडी उबविते तेव्हा पूर्ण अंड्यातून पिल्ले बाहेर येत नाही. कृत्रिम प्रयोगाचा सक्सेस रेट यापेक्षा अधिक आहे.घरीच करता येणारा प्रयोगकोणालाही घरच्याघरी करता येण्यासारखा हा प्रयोग आहे. याचे अनेक फायदे आहेत. कोंबडीला २१ दिवस अंड्यावर बसण्याची आणि पिलांना सांभाळण्याची गरज नाही. कोंबडी पुन्हा लवकरच अंडी द्यायला तयार होते. या प्रयोगाच्या यशांनतर ऋषीकेशने एकाच वेळी ३०० अंडी बसतील, असे यंत्र विकसित केले आहे. यापूर्वी त्याने फवारणी यंत्र व खत पेरणी यंत्र तयार केलेले आहे.