शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

नीलगिरी वनातील पार्क १0 वर्षांपासून रखडला

By admin | Updated: September 21, 2014 00:03 IST

वणी तालुक्याला मिळणाऱ्या खनिज विकास निधीतून मंदरजवळील नीलगिरी वन परिसरात ‘ग्रीन पार्क’ उभारण्याचा प्रकल्प तयार करण्यात आला होता़ त्याला आता १०-१५ वर्षे लोटूनही मूर्त रूप का आले नाही,

वणी : वणी तालुक्याला मिळणाऱ्या खनिज विकास निधीतून मंदरजवळील नीलगिरी वन परिसरात ‘ग्रीन पार्क’ उभारण्याचा प्रकल्प तयार करण्यात आला होता़ त्याला आता १०-१५ वर्षे लोटूनही मूर्त रूप का आले नाही, हे अजूनही जनतेला कळले नाही़वणी तालुक्यात वेकोलिच्या १५ कोळसा खाणी असल्याने हा तालुका प्रदूषणात देशात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. येथील जनतेला सकाळ-सायंकाळी शुध्द हवा घेण्यासाठी एखादे उद्यान शहरातही नाही व तालुक्यातही नाही़ त्यामुळे मंदरजवळील नीलगिरी वनात ‘ग्रीन पार्क’ तयार करण्याचा आराखडा गेल्या १५ वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता़ त्याचे स्वरूप, त्याचे अंदाजपत्रक वन विभागाने तयार करून शासनाला सादर केले होते़ नीलगिरी वन हे ठिकाण शहरापासून केवळ चार किलोमीटर अंतरावर आहे़नीलगिरी वनात वन विभागाची शेकडो एकर जमीन आहे़ सुदैवाने येथे रोपवाटिका व काजूचे वन आहे़ जवळूनच निर्गुडा नदी वाहात आहे़ त्यामुळे येथे ग्रीन पार्क उभारण्याचा संकल्प वन विभागाने केला होता़ त्यात प्राणी संग्रहालय, विविध मनोरंजक खेळ साहित्य, जंगल परिसरात भ्रमण करणारी मिनी ट्रेन, विसावा कुटी, रंगीत फवारे, विविध फुलांचे बगीचे यांचा समावेश होता़ या सर्व बाबी त्यावेळी म्हणजे १५ वर्षांपूर्वी केवळ ३०-३५ लाख रूपयांत तयार होईल, असे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते़ यामुळे वणीकरांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या़ विरंगुळ्यासाठी व शुध्द हवा घेण्यासाठी एक हक्काचे ठिकाण मिळणार, या आनंदात वणीकर जनता होती़ मात्र हा प्रकल्प नियोजनानंतर का बारगळला, हे अद्याप कोणताच लोकप्रतिनिधीही सांगायला तयार नाही़ गेल्या १५ वर्षांपूर्वीच्याच काळात वणी शहरात वरोरा रेल्वे गेट व बायपास टी पॉर्इंट, लालपुलिया परिसर येथे खनिज विकास निधीतून सौंदर्यीकरण करण्यात आले होते. मात्र या सौंदर्यीकरणाचा लाभ वणीकरांना घेतलाच आला नाही़ योग्य देखभालीअभावी हे सर्व सौंदर्यीकरण क्षणिक ठरले़ अल्पावधीतच सौंदर्यीकरण नेस्तनाबूत झाले. चोरट्यांनी साहित्य लंपास केले़ कोल डेपोवाल्यांनी अतिक्रमण करून त्या जागी कोळशाचे ढिगारे रचले़ अशा प्रकारे कोट्यवधी रूपयांचा खनिज विकास निधी पाण्यात गेला़ जर या निधीतून ग्रीन पार्कची उभारणी झाली असती, तर ती जनतेच्या उपयोगाची बाब ठरली असती़ याचप्रकारे दरवर्षी येणारा कोट्यवधींचा खनिज विकास निधी व्यर्थ खर्च होत आहे़ मात्र प्रदूषणाच्या चक्रव्यूहात सापडलेली जनता त्याचे चटके सहन करीत आहे़ (स्थानिक प्रतिनिधी)