शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

नीलगिरी वनातील पार्क १0 वर्षांपासून रखडला

By admin | Updated: September 21, 2014 00:03 IST

वणी तालुक्याला मिळणाऱ्या खनिज विकास निधीतून मंदरजवळील नीलगिरी वन परिसरात ‘ग्रीन पार्क’ उभारण्याचा प्रकल्प तयार करण्यात आला होता़ त्याला आता १०-१५ वर्षे लोटूनही मूर्त रूप का आले नाही,

वणी : वणी तालुक्याला मिळणाऱ्या खनिज विकास निधीतून मंदरजवळील नीलगिरी वन परिसरात ‘ग्रीन पार्क’ उभारण्याचा प्रकल्प तयार करण्यात आला होता़ त्याला आता १०-१५ वर्षे लोटूनही मूर्त रूप का आले नाही, हे अजूनही जनतेला कळले नाही़वणी तालुक्यात वेकोलिच्या १५ कोळसा खाणी असल्याने हा तालुका प्रदूषणात देशात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. येथील जनतेला सकाळ-सायंकाळी शुध्द हवा घेण्यासाठी एखादे उद्यान शहरातही नाही व तालुक्यातही नाही़ त्यामुळे मंदरजवळील नीलगिरी वनात ‘ग्रीन पार्क’ तयार करण्याचा आराखडा गेल्या १५ वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता़ त्याचे स्वरूप, त्याचे अंदाजपत्रक वन विभागाने तयार करून शासनाला सादर केले होते़ नीलगिरी वन हे ठिकाण शहरापासून केवळ चार किलोमीटर अंतरावर आहे़नीलगिरी वनात वन विभागाची शेकडो एकर जमीन आहे़ सुदैवाने येथे रोपवाटिका व काजूचे वन आहे़ जवळूनच निर्गुडा नदी वाहात आहे़ त्यामुळे येथे ग्रीन पार्क उभारण्याचा संकल्प वन विभागाने केला होता़ त्यात प्राणी संग्रहालय, विविध मनोरंजक खेळ साहित्य, जंगल परिसरात भ्रमण करणारी मिनी ट्रेन, विसावा कुटी, रंगीत फवारे, विविध फुलांचे बगीचे यांचा समावेश होता़ या सर्व बाबी त्यावेळी म्हणजे १५ वर्षांपूर्वी केवळ ३०-३५ लाख रूपयांत तयार होईल, असे अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते़ यामुळे वणीकरांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या़ विरंगुळ्यासाठी व शुध्द हवा घेण्यासाठी एक हक्काचे ठिकाण मिळणार, या आनंदात वणीकर जनता होती़ मात्र हा प्रकल्प नियोजनानंतर का बारगळला, हे अद्याप कोणताच लोकप्रतिनिधीही सांगायला तयार नाही़ गेल्या १५ वर्षांपूर्वीच्याच काळात वणी शहरात वरोरा रेल्वे गेट व बायपास टी पॉर्इंट, लालपुलिया परिसर येथे खनिज विकास निधीतून सौंदर्यीकरण करण्यात आले होते. मात्र या सौंदर्यीकरणाचा लाभ वणीकरांना घेतलाच आला नाही़ योग्य देखभालीअभावी हे सर्व सौंदर्यीकरण क्षणिक ठरले़ अल्पावधीतच सौंदर्यीकरण नेस्तनाबूत झाले. चोरट्यांनी साहित्य लंपास केले़ कोल डेपोवाल्यांनी अतिक्रमण करून त्या जागी कोळशाचे ढिगारे रचले़ अशा प्रकारे कोट्यवधी रूपयांचा खनिज विकास निधी पाण्यात गेला़ जर या निधीतून ग्रीन पार्कची उभारणी झाली असती, तर ती जनतेच्या उपयोगाची बाब ठरली असती़ याचप्रकारे दरवर्षी येणारा कोट्यवधींचा खनिज विकास निधी व्यर्थ खर्च होत आहे़ मात्र प्रदूषणाच्या चक्रव्यूहात सापडलेली जनता त्याचे चटके सहन करीत आहे़ (स्थानिक प्रतिनिधी)