शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

उमरखेड तालुक्यात पैनगंगेचे वाळवंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 23:38 IST

विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाºया पैनगंगा नदी पात्राला वाळवंटाचे स्वरूप आले असून आगामी काळातील पाणी टंचाईची चाहूल लागली आहे.

ठळक मुद्देपाणी टंचाईची चाहूल : ५० गावांना बसणार फटका

ऑनलाईन लोकमत उमरखेड : विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाºया पैनगंगा नदी पात्राला वाळवंटाचे स्वरूप आले असून आगामी काळातील पाणी टंचाईची चाहूल लागली आहे. नदी पात्र कोरडे असल्याने तालुक्यातील ५० गावांतील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. दरवर्षी या भागातील नागरिकांना उन्हाळ्यात पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येते.उमरखेड तालुक्याची जीवनदायी म्हणून पैनगंगेची ओळख आहे. परंतु अलिकडच्या काही वर्षात हिवाळ्यातच पैनगंगा कोरडी पडत आहे. त्यामुळे नदी तिरावरील पन्नास गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यावर्षी भांबरखेडा, तिवरंग, हातला, दिवट, पिंपरी, नागापूर, बेलखेड, बारा, संगम चिंचोली, मार्लेगांव, निंबगव्हाण, तिवडी, टाकळी, विडूळ, चालगणी, साखरा, खरूस, लोहरा, कारखेड, देवसरी, दिघडी, उंचवडद, चातारी, कोपरा बोरी, मानकेश्वर, सावळेश्वर, सिंदगी, सोईट, ढाणकी, भोजनगर, बिटरगांव, खरबी, परोटीवन, बंदीटाकळी यासह अनेक गावात पाणी टंचाई जाणवत आहे.यावर्षी डिसेंबर महिन्यात पैनगंगा कोरडी पडली असून नदीपात्रात पाण्याचे डबके साचले आहे. काही भागात तर वाळवंट झाले आहे. याच पैनगंगेच्या पात्रातून मोटारपंपाद्वारे ओलितासाठी पाणी घेतले जाते. मात्र यंदा पैनगंगा कोरडी पडल्याने ओलित ही धोक्यात आले आहे. पूर्वी बाराही महिने पैनगंगा खळखळून वाहत असायची परंत ुआता इसापूर धरणामुळे नदी हिवाळ्यातच कोरडी पडते.पावसाळ्यात पुराचा फटका तर उन्हाळ्यात पाणी टंचाई असे समीकरण झाले आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे.पाण्यासाठी भटकंतीपैनगंगा नदी कोरडी पडल्याने नदी तिरावरील विदर्भातील पन्नास आणि मराठवाड्यातील तीस गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. नदी तिरावर असलेल्या नळ योजनेच्या विहीरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे भविष्यात पाण्यासाठी हाहाकार उडणार आहे.