शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

उमरखेड तालुक्यात पैनगंगेचे वाळवंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 23:38 IST

विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाºया पैनगंगा नदी पात्राला वाळवंटाचे स्वरूप आले असून आगामी काळातील पाणी टंचाईची चाहूल लागली आहे.

ठळक मुद्देपाणी टंचाईची चाहूल : ५० गावांना बसणार फटका

ऑनलाईन लोकमत उमरखेड : विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाºया पैनगंगा नदी पात्राला वाळवंटाचे स्वरूप आले असून आगामी काळातील पाणी टंचाईची चाहूल लागली आहे. नदी पात्र कोरडे असल्याने तालुक्यातील ५० गावांतील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. दरवर्षी या भागातील नागरिकांना उन्हाळ्यात पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येते.उमरखेड तालुक्याची जीवनदायी म्हणून पैनगंगेची ओळख आहे. परंतु अलिकडच्या काही वर्षात हिवाळ्यातच पैनगंगा कोरडी पडत आहे. त्यामुळे नदी तिरावरील पन्नास गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. यावर्षी भांबरखेडा, तिवरंग, हातला, दिवट, पिंपरी, नागापूर, बेलखेड, बारा, संगम चिंचोली, मार्लेगांव, निंबगव्हाण, तिवडी, टाकळी, विडूळ, चालगणी, साखरा, खरूस, लोहरा, कारखेड, देवसरी, दिघडी, उंचवडद, चातारी, कोपरा बोरी, मानकेश्वर, सावळेश्वर, सिंदगी, सोईट, ढाणकी, भोजनगर, बिटरगांव, खरबी, परोटीवन, बंदीटाकळी यासह अनेक गावात पाणी टंचाई जाणवत आहे.यावर्षी डिसेंबर महिन्यात पैनगंगा कोरडी पडली असून नदीपात्रात पाण्याचे डबके साचले आहे. काही भागात तर वाळवंट झाले आहे. याच पैनगंगेच्या पात्रातून मोटारपंपाद्वारे ओलितासाठी पाणी घेतले जाते. मात्र यंदा पैनगंगा कोरडी पडल्याने ओलित ही धोक्यात आले आहे. पूर्वी बाराही महिने पैनगंगा खळखळून वाहत असायची परंत ुआता इसापूर धरणामुळे नदी हिवाळ्यातच कोरडी पडते.पावसाळ्यात पुराचा फटका तर उन्हाळ्यात पाणी टंचाई असे समीकरण झाले आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे.पाण्यासाठी भटकंतीपैनगंगा नदी कोरडी पडल्याने नदी तिरावरील विदर्भातील पन्नास आणि मराठवाड्यातील तीस गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. नदी तिरावर असलेल्या नळ योजनेच्या विहीरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे भविष्यात पाण्यासाठी हाहाकार उडणार आहे.