शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

‘मुख्यालयी’च्या आदेशाची पायमल्ली

By admin | Updated: August 30, 2014 02:10 IST

ग्रामीण भागात शासनाकडून विविध सुविधा दिल्या जातात. त्यासाठी गावपातळीवर कर्मचारीही नियुक्त करण्यात आले आहे.

जवळा : ग्रामीण भागात शासनाकडून विविध सुविधा दिल्या जातात. त्यासाठी गावपातळीवर कर्मचारीही नियुक्त करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांनी आपल्या मुख्यालयी राहून जनतेची सेवा करावी, हे अपेक्षित आहे. त्यासाठी प्रत्येकाने मुख्यालयी राहण्याचा नियम राज्य शासनाकडून करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र या नियमाची राजरोसपणे पायमल्ली केली जात आहे.गावात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, शिक्षक, तलाठी या सर्वांनी मुख्यालयी राहणे आवश्यक आहे. याकरिता कर्मचाऱ्यांना १५ टक्के प्रोत्साहन भत्ता दिला जातो. एकस्तर पदोन्नतीही दिली जाते. याचा लाभ घेणारे ८० टक्के कर्मचारी आहे. प्रत्यक्षात मात्र या पैकी दहा टक्के कर्मचारी मुख्यालयी राहात नसल्याचे वास्तव आहे. बहुतांश कर्मचाऱ्यांनी शहरातच आपला ठिय्या मांडला आहे. ग्रामीण भागात मुख्यालयी कर्मचारी राहिल्यास गावाचा विकास झपाट्याने होतो. शिवाय शासनाच्या योजनाही प्रभावीपणे राबविल्या जातात. हे लक्षात घेऊनच शासन सेवेमध्ये रुजू होताना प्रत्येक कर्मचाऱ्याला मुख्यालयी राहण्याची अट घातली जाते. सेवेत आल्यानंतर मात्र कर्मचारी आपल्या मर्जीनेच काम करतात. प्रत्येकजण शहरात असल्याने ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागतो. आरोग्य सेवेचा तर पुरता बोजवारा उडाला आहे. या शिवाय इतरही कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी ग्रामस्थांना तालुक्याचे अथवा जिल्ह्याचे ठिकाण गाठावे लागते. ग्रामविकास अधिकारी, तलाठी, शिक्षक यांना मुख्यालयी राहणे आवश्यक आहे. हे कर्मचारी गावातील संबंधातल्या नागरिकाकडे भाड्याने राहतो, असे दाखवितात. त्यांच्याकडून घरभाडे भत्ता उचलला जातो. कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता मुख्यालयी राहात असल्याचे खोटे दाखले देवून हा भत्ता उचलण्यात येतो. ग्रामीण भागात पंचायत समितीचा दौराही होत नाही. प्रत्येकवेळी कागदोपत्री अहवाल सादर केला जातो. याला शाळा प्रशासनही जबाबदार आहे. शिवाय स्थानिक लोकप्रतिनिधींचाही कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याचे दिसते. बहुतांश कर्मचारी शहरातून ये-जा करूनच कामकाज करतात. बरेच कर्मचारी पंचायत समिती अथवा जिल्हा परिषदेत बैठक असल्याचे सांगून आठवड्यातून दोन ते तीन दिवस मुख्यालयी फिरकतच नाही. यामुळे ग्रामीण भागातील शासकीय कामकाज पूर्णत: ढेपाळले आहे. याला सुरळीत करण्यासाठी मुख्यालयी राहण्याच्या अटीची तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. वरिष्ठांकडून कठोर कारवाई केल्याशिवाय हे कर्मचारी मुख्यालयी दिसणारच नाही. यासाठी व्यापक मोहीम हाती घेण्याची गरज आहे. (वार्ताहर)