शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

पालेभाज्या आवाक्याबाहेर

By admin | Updated: July 21, 2014 00:22 IST

सर्वसामान्यांच्या जेवणातून पालेभाज्या हद्दपार होण्याची स्थिती निर्माण झाली असून डाळीही सुकामेवाच्या बरोबरीने आल्या आहेत. रविवारी भरलेल्या यवतमाळातील आठवडीबाजारातील दर पाहता

रूपेश उत्तरवार - यवतमाळ सर्वसामान्यांच्या जेवणातून पालेभाज्या हद्दपार होण्याची स्थिती निर्माण झाली असून डाळीही सुकामेवाच्या बरोबरीने आल्या आहेत. रविवारी भरलेल्या यवतमाळातील आठवडीबाजारातील दर पाहता सर्वसामान्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. लांंबलेल्या पावसाने महागाईत भर घातली असून ग्राहकांच्या पिशव्या मात्र अर्ध्या रित्याच दिसत होत्या. यवतमाळ शहरासह लगतच्या गावांमधून अनेक जण आठवडाभराचे साहित्य खरेदी करण्यासाठी यवतमाळच्या आठवडीबाजारात येतात. पालेभाज्या, डाळी व इतर जीवनावश्यक वस्तूची खरेदी केली जाते. मात्र गेल्या महिनाभरापासून महागाईचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. रविवारच्या आठवडीबाजारात असलेले पालेभाज्यांचे भाव पाहता प्रत्येक जण किती ही महागाई असेच म्हणताना दिसत होते. वर्षभरातील सर्वाधिक दर या रविवारच्या बाजारात दिसून आले. त्याचा परिणाम खरेदीवर झाला. इच्छा असतानाही खरेदी करणे शक्य झाले नाही. १० ते २० रुपये किलोच्या भाज्या ८० ते १०० रुपयांच्या घरात पोहोचल्या आहेत. १५ रुपये किलोचा कांदा २५ रुपये तर १० रुपये किलोचे टमाटर ८० रुपये किलो झाले आहे. ४० रुपये किलोचा सांभार १५० रुपयापर्यंत पोहोचला आहे. पाच रुपयात जुडीभर मिळणारा सांभार आता १० रुपयापेक्षा कमी किंमतीत मिळतही नाही. यवतमाळात नाशिकवरून पानकोबी, फुलकोबी आणि शिमला मिर्ची येते. मध्यप्रदेशातून टमाटर येतात तर नागपूर, खामगाव, संगमनेर येथून पालेभाज्या येतात. मागणीच्या तुलनेत भाजीपाल्याचे उत्पादन कमी झाल्याने दरवाढ झाली आहे. बाजारात केवळ वांगे, पालक आणि कोहळे ग्राहकांच्या बजेटमध्ये आहे. त्यामुळे त्याच भाज्या खरेदीवर कल दिसत होता. परंतु त्याच त्या भाज्या खावून ग्राहक कंटाळल्याने नवीन भाजीचा शोध घेत होते. परंतु खिशाला परवडत नव्हते. पालेभाज्यांना पर्याय म्हणून डाळीची निवड केली जाते. मात्र या डाळीही कडाडल्या आहे. ज्वारीचे भावही वाढले असून गहू १४ ते १८ रुपये, ज्वारी २४ ते ३८ रुपये किलो आहे.