शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

पालेभाज्या आवाक्याबाहेर

By admin | Updated: July 21, 2014 00:22 IST

सर्वसामान्यांच्या जेवणातून पालेभाज्या हद्दपार होण्याची स्थिती निर्माण झाली असून डाळीही सुकामेवाच्या बरोबरीने आल्या आहेत. रविवारी भरलेल्या यवतमाळातील आठवडीबाजारातील दर पाहता

रूपेश उत्तरवार - यवतमाळ सर्वसामान्यांच्या जेवणातून पालेभाज्या हद्दपार होण्याची स्थिती निर्माण झाली असून डाळीही सुकामेवाच्या बरोबरीने आल्या आहेत. रविवारी भरलेल्या यवतमाळातील आठवडीबाजारातील दर पाहता सर्वसामान्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. लांंबलेल्या पावसाने महागाईत भर घातली असून ग्राहकांच्या पिशव्या मात्र अर्ध्या रित्याच दिसत होत्या. यवतमाळ शहरासह लगतच्या गावांमधून अनेक जण आठवडाभराचे साहित्य खरेदी करण्यासाठी यवतमाळच्या आठवडीबाजारात येतात. पालेभाज्या, डाळी व इतर जीवनावश्यक वस्तूची खरेदी केली जाते. मात्र गेल्या महिनाभरापासून महागाईचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. रविवारच्या आठवडीबाजारात असलेले पालेभाज्यांचे भाव पाहता प्रत्येक जण किती ही महागाई असेच म्हणताना दिसत होते. वर्षभरातील सर्वाधिक दर या रविवारच्या बाजारात दिसून आले. त्याचा परिणाम खरेदीवर झाला. इच्छा असतानाही खरेदी करणे शक्य झाले नाही. १० ते २० रुपये किलोच्या भाज्या ८० ते १०० रुपयांच्या घरात पोहोचल्या आहेत. १५ रुपये किलोचा कांदा २५ रुपये तर १० रुपये किलोचे टमाटर ८० रुपये किलो झाले आहे. ४० रुपये किलोचा सांभार १५० रुपयापर्यंत पोहोचला आहे. पाच रुपयात जुडीभर मिळणारा सांभार आता १० रुपयापेक्षा कमी किंमतीत मिळतही नाही. यवतमाळात नाशिकवरून पानकोबी, फुलकोबी आणि शिमला मिर्ची येते. मध्यप्रदेशातून टमाटर येतात तर नागपूर, खामगाव, संगमनेर येथून पालेभाज्या येतात. मागणीच्या तुलनेत भाजीपाल्याचे उत्पादन कमी झाल्याने दरवाढ झाली आहे. बाजारात केवळ वांगे, पालक आणि कोहळे ग्राहकांच्या बजेटमध्ये आहे. त्यामुळे त्याच भाज्या खरेदीवर कल दिसत होता. परंतु त्याच त्या भाज्या खावून ग्राहक कंटाळल्याने नवीन भाजीचा शोध घेत होते. परंतु खिशाला परवडत नव्हते. पालेभाज्यांना पर्याय म्हणून डाळीची निवड केली जाते. मात्र या डाळीही कडाडल्या आहे. ज्वारीचे भावही वाढले असून गहू १४ ते १८ रुपये, ज्वारी २४ ते ३८ रुपये किलो आहे.