शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

नव्या वर्षात विकासकामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 21:58 IST

शेततळे, हागणदारीमुक्ती, धडक सिंचन विहिरी, भूसंपादन, रेशीम लागवड अशा विविध कामांमध्ये २०१७ मध्ये जिल्ह्याने चांगली प्रगती केली आहे. तर नव्या वर्षात ही सर्व कामे पूर्ण करण्यासोबतच सर्वच विकासकामे गतिमान पद्धतीने व नियोजनपूर्वक पूर्ण केली जातील, असा संकल्प जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचा संकल्प : ‘झिरो पेन्डेन्सी’ जोरात, जिल्ह्याची हागणदारीमुक्तीकडे वाटचाल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेततळे, हागणदारीमुक्ती, धडक सिंचन विहिरी, भूसंपादन, रेशीम लागवड अशा विविध कामांमध्ये २०१७ मध्ये जिल्ह्याने चांगली प्रगती केली आहे. तर नव्या वर्षात ही सर्व कामे पूर्ण करण्यासोबतच सर्वच विकासकामे गतिमान पद्धतीने व नियोजनपूर्वक पूर्ण केली जातील, असा संकल्प जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शुक्रवारी व्यक्त केला.नववर्षानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, १० नोव्हेंबरपासून महसूल विभागात सुरू केलेल्या ‘झिरो पेन्डेन्सी’ अभियानाला यश येत आहे. पहिल्या टप्प्यात अभिलेख्यांचे अद्ययावतीकरण केले जात आहे. तर दुसऱ्या टप्प्यात डेली डिस्पोझल करण्यावर भर राहील. नियमानुसार ५ वर्षापर्यंतच जतन करावे लागणारे अभिलेखे आपण गेल्या ३०-४० वर्षांपासून ठेवले आहे. त्याची गरज नाही. प्रलंबित प्रकरणे योग्यरित्या मार्गी लावण्यासाठी सिक्स बंडल सिस्टीम राबविणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.मागेल त्याला शेततळे योजनेत जिल्ह्याला ४५०० शेततळ्यांचे लक्ष्य मिळाले आहे. गेल्या दोन वर्षात त्यातील १६४९ पूर्ण झाले होते. मी रुजू झाल्यानंतर तीन महिन्यात १०३७ कामे सुरू केली. ८८२ कामे पूर्ण झाली, तर १५५ कामे प्रगतीपथावर आहेत. यवतमाळला राज्यातील सर्वाधिक शेततळ्यांचा जिल्हा करण्याचा मानसही डॉ. देशमुख यांनी व्यक्त केला. तुती लागवडीसाठी जास्तीत जास्त शेतकºयांची नोंदणी केली जात आहे. एक हजार शेतकºयांचे लक्ष्य पूर्ण करून वाढीव उद्दिष्ट मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.जिल्ह्यात ७२.८ टक्के लोकांकडे वैयक्तिक शौचालये आहेत. ६३ हजार ६८९ शौचालयाची कामे पूर्ण झाली आहेत. बाभूळगाव, राळेगाव, मारेगाव, कळंब हे तालुके हागणदारीमुक्त झाले आहेत. आता हे काम मिशनमोडवर घेऊन संपूर्ण जिल्हा हाणदारीमुक्त घोषित करण्यासाठी प्रयत्न केले जातील. प्रधानमंत्री आवास योजनेतील ६३.६८ टक्के लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. उर्वरित नोंदणी येत्या १५ दिवसात पूर्ण केली जाईल. धडक सिंचन विहिरींचे जिल्ह्याला ४८०० इतके उद्दिष्ट असून त्यात आतापर्यंत ३२६६ लाभार्थ्यांची निवड झाली आहे. तर मे महिन्यापर्यंत संपूर्ण उद्दिष्ट पूर्ण केले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.पत्रकार परिषदेला उपस्थित जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले की, कोरेगाव भीमा प्रकरणात जिल्ह्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच कळंब रोड व धामणगाव रोडवर दोन एसटी बसेसची ताडफोड झाली. या प्रकरणात ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.रेल्वेसाठी फेब्रुवारीपर्यंत भूसंपादन पूर्ण होईलवर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाचे काम गतिमान पद्धतीने पूर्ण केले जात आहे. एकंदर १८४ किलोमीटर लांबीचा हा रेल्वेमार्ग जिल्ह्यातील सहा तालुक्यांतून जात आहे. त्यासाठी ९५ गावांतील जमिनीचे संपादन आवश्यक आहे. भूसंपादनाची बहुतांश प्रकरणे आटोपली आहेत. तर येत्या फेब्रुवारीअखेरीस जमीन अधिग्रहणाचे काम पूर्ण केले जाईल. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ करिताही जिल्ह्यातील ५९ गावांतील जमिनीचे अधिग्रहण केले जात आहे. हे काम जानेवारीच्याच अखेरीस पूर्ण होईल, असे जिल्हाधिकारी देशमुख यांनी स्पष्ट केले.यवतमाळच्या पाणीटंचाईवर ‘फोकस’यवतमाळात यंदा तीव्र पाणीटंचाईची शक्यता आहे. त्यासाठी अमृत योजनेच्या कामासाठी बेंबळावर दोन मोठ्या पंपिंग मशिन बसविण्यास राज्य समितीने मान्यता दिली आहे. येत्या ३-४ दिवसात त्याची वर्क आॅर्डरही निघणार आहे. मात्र, प्रत्यक्ष मशिन कार्यान्वित होण्यासाठी दोन महिने लागतील. चापडोह प्रकल्पावर प्रत्यक्ष पाहणी केली असता, शहराला महिनाभर पुरेल एवढे पाणी तेथे आहे. परंतु, उन्हाळ्यातील टंचाई डोळ्यापुढे ठेवून टँकर पुरवठा, विहिरींचे अधिग्रहण या दृष्टीने नियोजन सुरू आहे. त्याबाबत रोज आढावा घेतला जात असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.