शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

११०० एकर वनजमिनीचे स्वामित्व

By admin | Updated: December 11, 2014 23:13 IST

वनजमिनीवर अतिक्रमण करून पोटाची खळगी भरण्यासाठी शेती करणाऱ्या ३०९ जणांना ११४६.८६ एकर जमिनीचे स्वामीत्व मिळाले आहे. २००५ पूर्वी अतिक्रमित केलेल्या या जमिनीचा संपूर्ण

वन हक्क कायद्याचा लाभ : सामूहिक हक्कांतर्गत ५८ हजार एकर जमीनयवतमाळ : वनजमिनीवर अतिक्रमण करून पोटाची खळगी भरण्यासाठी शेती करणाऱ्या ३०९ जणांना ११४६.८६ एकर जमिनीचे स्वामीत्व मिळाले आहे. २००५ पूर्वी अतिक्रमित केलेल्या या जमिनीचा संपूर्ण अधिकार मिळाल्याने या कुटुंबाच्या अनेक अडचणी दूर झाल्या आहेत. शिवाय वनजमिनीमुळे गाव पातळीवर सामूहिक स्वरूपाच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. अशा १०५ जणांना ५८ हजार ८१९.६० एकर वनजमिनीचा कायमस्वरूपी पट्टा देण्यात आला आहे. यातून चराई क्षेत्र, गौण वनउपज, रस्ते, स्मशान, काही ठिकाणी धार्मिक स्थळांची निर्मिती केली जाणार आहे.वनजमिनीवर अतिक्रमण करून परंपरागत पद्धतीने शेती करणाऱ्या आदिवासी कुटुंबांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शिवाय वनविभागाच्या कारवाईची टांगती तलवार नेहमीच त्यांच्या डोक्यावर राहते. वनालगतच ही शेतजमीन असल्याने वन्यप्राण्यांचाही मोठ्या प्रमाणात उपद्रव सहन करावा लागतो. शिवाय निसर्गाने फटकारल्यानंतर झालेल्या नुकसानभरपाईची शासकीय मदतीतील एक छदामही अशा शेतकऱ्यांना मिळत नव्हता. त्यांच्यासाठीच २००६ मध्ये वनहक्क अधिनियम तयार करण्यात आला. त्यातून २००५ पूर्वीपासून अतिक्रमित वनजमिनीवर शेती करणाऱ्यांना कायमचा पट्टा देण्यात आला. यासाठी त्यांच्याकडून विविध प्रकारचे पुरावे घेण्यात आले. यामध्ये वनविभागाने आकारलेला दंड हा सर्वात ठोस पुरावा मानल्या जातो. अतिक्रमित जमिनीवर दावा करणाऱ्यांची बरीच प्रकरणे पुरेशा पुराव्याअभावी फेटाळण्यात आली. त्यातून केवळ वैयक्तिक लाभाची ३०९ आणि सामूहिक लाभाचे १०५ दावेच मान्य करण्यात आले. या निर्णयाने अतिक्रमित वनजमिनीवर शेती करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शासकीय योजनेसह कर्जाचाही लाभ त्यांना मिळणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)