शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

११०० एकर वनजमिनीचे स्वामित्व

By admin | Updated: December 11, 2014 23:13 IST

वनजमिनीवर अतिक्रमण करून पोटाची खळगी भरण्यासाठी शेती करणाऱ्या ३०९ जणांना ११४६.८६ एकर जमिनीचे स्वामीत्व मिळाले आहे. २००५ पूर्वी अतिक्रमित केलेल्या या जमिनीचा संपूर्ण

वन हक्क कायद्याचा लाभ : सामूहिक हक्कांतर्गत ५८ हजार एकर जमीनयवतमाळ : वनजमिनीवर अतिक्रमण करून पोटाची खळगी भरण्यासाठी शेती करणाऱ्या ३०९ जणांना ११४६.८६ एकर जमिनीचे स्वामीत्व मिळाले आहे. २००५ पूर्वी अतिक्रमित केलेल्या या जमिनीचा संपूर्ण अधिकार मिळाल्याने या कुटुंबाच्या अनेक अडचणी दूर झाल्या आहेत. शिवाय वनजमिनीमुळे गाव पातळीवर सामूहिक स्वरूपाच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. अशा १०५ जणांना ५८ हजार ८१९.६० एकर वनजमिनीचा कायमस्वरूपी पट्टा देण्यात आला आहे. यातून चराई क्षेत्र, गौण वनउपज, रस्ते, स्मशान, काही ठिकाणी धार्मिक स्थळांची निर्मिती केली जाणार आहे.वनजमिनीवर अतिक्रमण करून परंपरागत पद्धतीने शेती करणाऱ्या आदिवासी कुटुंबांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शिवाय वनविभागाच्या कारवाईची टांगती तलवार नेहमीच त्यांच्या डोक्यावर राहते. वनालगतच ही शेतजमीन असल्याने वन्यप्राण्यांचाही मोठ्या प्रमाणात उपद्रव सहन करावा लागतो. शिवाय निसर्गाने फटकारल्यानंतर झालेल्या नुकसानभरपाईची शासकीय मदतीतील एक छदामही अशा शेतकऱ्यांना मिळत नव्हता. त्यांच्यासाठीच २००६ मध्ये वनहक्क अधिनियम तयार करण्यात आला. त्यातून २००५ पूर्वीपासून अतिक्रमित वनजमिनीवर शेती करणाऱ्यांना कायमचा पट्टा देण्यात आला. यासाठी त्यांच्याकडून विविध प्रकारचे पुरावे घेण्यात आले. यामध्ये वनविभागाने आकारलेला दंड हा सर्वात ठोस पुरावा मानल्या जातो. अतिक्रमित जमिनीवर दावा करणाऱ्यांची बरीच प्रकरणे पुरेशा पुराव्याअभावी फेटाळण्यात आली. त्यातून केवळ वैयक्तिक लाभाची ३०९ आणि सामूहिक लाभाचे १०५ दावेच मान्य करण्यात आले. या निर्णयाने अतिक्रमित वनजमिनीवर शेती करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शासकीय योजनेसह कर्जाचाही लाभ त्यांना मिळणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)