शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
3
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
4
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
5
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
6
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
7
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
8
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
9
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
10
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
11
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
12
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
13
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
14
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
15
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
16
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
17
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
18
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
19
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
20
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!

ओव्हरबर्डन मॅनेजमेंटचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 20:54 IST

कोळसा उत्खणनानंतर खाणीतून निघणाºया मातीचे योग्य व काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याच्या सूचना पर्यावरण मंत्रालय व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वेकोलिला मिळाल्या असल्या तरी .....

ठळक मुद्देवणी वेकोलि क्षेत्र : मातीचे ढिगारे शेतकºयांच्या मुळावर, मंत्र्यांकडून समस्या दुर्लक्षित

संतोष कुंडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : कोळसा उत्खणनानंतर खाणीतून निघणाºया मातीचे योग्य व काटेकोरपणे व्यवस्थापन करण्याच्या सूचना पर्यावरण मंत्रालय व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वेकोलिला मिळाल्या असल्या तरी वेकोलिकडून मात्र या नियमांचे कोणतेच पालन केले जात नसल्याने वेकोलिने उभे केलेले नियमबाह्यमातीचे ढिगारे शेतकºयांच्या मुळावर उठले आहेत. या ढिगाºयांमुळे वेकोलि बाधित क्षेत्रातील शेतीच्या उत्पादनाला मोठा फटका बसत आहे.या ढिगाºयांमुळे शेतकरी अनेक समस्यांना तोंड देत असले तरी प्रकल्पग्रस्तांच्या, खाण बाधितांच्या वेदनेशी नातं सांगणाºया केंद्रातील ‘वजन’दार मंत्र्यांकडूनही ही समस्या दुर्लक्षित केली जात असल्याने या भागातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. विशेषत: कोळसा खाण क्षेत्रातील शेतकºयांना प्रदूषणासह मातीच्या ढिगाºयांमुळे निर्माण झालेल्या समस्यांशी झुंजावे लागत आहे.वणी तालुक्यात १२ कोळसा खाणी आहेत. त्यांपैैकी दोन भूमिगत तर १० खुल्या कोळसा खाणी आहेत. यातील घोन्सा येथील कोळसा खाण निविदा न काढल्यामुळे सध्या बंद अवस्थेत आहे, तर राजूर व पिंपळगाव या दोन खाणी भूगर्भातील कोळसा संपुष्टात आल्याचे कारण देऊन बंद करण्यात आल्या आहेत. सध्या ९ कोळसा खाणींमधून कोळशाचे उत्पादन केले जात आहेत.खाणीतून निघालेल्या मातीचे ढिगारे उभे करताना अनेक नियम आहेत. बेंचेस पद्धतीने ढिगारे उभे करून त्यावर वृक्षारोपण करणे हा महत्वाचा नियम आहे. ढिगारा जर नैैसर्गिक जलस्त्रोता शेजारी असेल तर ढिगाºयावरून वाहणारे पावसाचे पाणी किंवा चिखल त्या जलप्रवाहात जाऊ नये, यासाठी ढिगाºयाभोवती संरक्षक भिंत बांधण्याचा नियम आहे. मात्र बहुतांश ढिगारे बेंचेस पद्धतीने उभारण्यात आले नाहीत किंवा त्या ढिगाºयाभोवती संरक्षण भिंतदेखील बांधण्यात आली नाही. त्यामुळे या ढिगाºयावरून वाहणारे पाणी थेट शेतात जाते किंवा शेतातून पाण्याचा निचरा होत नाही.जंगली श्वापदांकडून पिकांची नासाडीवेकोलिने उभ्या केलेल्या मातीच्या अनेक ढिगाºयावर वेकोलिने वृक्षारोपण केले. मात्र त्यामुळे शेतकºयांपुढे जंगली श्वापदांची मोठी समस्या निर्माण झाली आहे. ढिगाºयाच्या काठालगत असलेल्या शेतांमध्ये पावसामुळे पाणी साचतेच सोबतच या ढिगाºयांवरील झुडपे जंगली श्वापदांची वस्तीस्थाने बनली आहेत. पीक भरीवर आले की, या झुडपांत वास्तव्याला असलेले रोही, रानडुकरे शेतातील पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी करीत आहेत.