शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
4
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
5
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
6
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
7
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
8
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
9
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
10
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
11
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
12
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
13
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
14
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
15
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
16
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
17
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
18
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
19
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
20
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'

सोनदाभीत लोकसहभागातून पाणीटंचाईवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 23:25 IST

उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील सोनदाभी गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. व्याकूळ झालेल्या या गावातील नागरिकांनीच आपला पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला.

ठळक मुद्देगावकऱ्यांना दिलासा : पाणी फाऊंडेशनची प्रेरणा, एक किमीवरून आणले पाणी

ऑनलाईन लोकमतढाणकी : उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील सोनदाभी गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. व्याकूळ झालेल्या या गावातील नागरिकांनीच आपला पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. श्रमदान व लोकसहभागातून एक किलोमीटर अंतरावरील विहिरीत पाणी गावात आणले आणि पाणी समस्या मिटविली. यासाठी त्यांना पाणी फाऊंडेशनने सहकार्य केले.सोनदाभी येथे बंदी भागातील दुर्गम गाव. पाणीपुरवठ्यासाठी १४ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीने गतवर्षी विहिरीचे खोदकाम केले. विहिरीला पाणीसुद्धा लागले. परंतु विहीर गावापासून एक किलोमीटर दूर आहे. त्यातच पाईपलाईनचे काम पूर्ण झाले नाही. आडात आहे, पण पोहºयात नाही, अशी अवस्था येथील गावकऱ्यांची झाली होती. उन्हात एक किलोमीटरवरून पाणी आणणे शक्य नव्हते. त्यामुळे गावकरी तहानेने व्याकूळ झाले होते.शासनाची प्रतीक्षा न करता गावकºयांनीच पाणी प्रश्न सोडविण्याचा निर्णय घेतला. पाणी फाऊंडेशनचे संतोष गवळे, चिंतामणी पवार, मनीष मालोकार, मधुकर लिंगदे यांनी गावकºयांशी चर्चा केली. जिल्हाधिकाºयांची भेट घेतली. त्यांनी मदतीची आश्वासन दिले. पाणी फाऊंडेशनने गावकऱ्यांसमोर श्रमदान व लोकसहभागाची संकल्पना मांडली. भगवानसिंग साबळे, मारोती पिलवंड, अशोक घोगेवाड, नूरसिंग साबळे, देवानंद वाढेकर, युवराज साबळे, नानकसिंग बस्सी, अज्ञानसिंग जोडवे, काशीराम साबळे, शिवाजी काळबांडे, चंद्रसिंग पडवाळे यांनी पुढाकार घेऊन गावातील लोकांकडून पाईप जमा केले. श्रमदानातून पाईप टाकून विहिरीतील पाणी गावापर्यंत पोहोचले आणि पाणीटंचाईवर मात केली.गावकऱ्यांचे परिश्रमसोनदाभी येथील गावकऱ्यांनी श्रमदान केल्यामुळे गावाला आज मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. प्रशासनाची प्रतीक्षा करीत बसले असते तर गावकऱ्यांना उन्हाळ्यात पाणीही मिळाले नसते. गावकऱ्यांच्या परिश्रमाचे चीज झाल्याचे समाधान आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत आहे.