शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पिकांवरील कीड नियंत्रणाबाहेर

By admin | Updated: September 29, 2014 00:52 IST

वातावरणातील बदलाने कपाशी आणि सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात किडींचे आक्रमण झाले आहे. महागडी औषधी फवारूनही कीड नियंत्रणात येत नाही. यामुळे हतबल शेतकरी कृषी विभागाकडे

महागाव : वातावरणातील बदलाने कपाशी आणि सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात किडींचे आक्रमण झाले आहे. महागडी औषधी फवारूनही कीड नियंत्रणात येत नाही. यामुळे हतबल शेतकरी कृषी विभागाकडे धाव घेतात. मात्र त्यांचेही मार्गदर्शन कुचकामी ठरत आहे. यावर उपाय म्हणून काही शेतकऱ्यांनी अफलातून प्रयोग सुरू केला असून चक्क दारू फवारून कीड नियंत्रणाचा प्रयत्न करीत आहे.यावर्षी जिल्ह्यात खरिपाची स्थिती सुरुवातीपासून नाजूक आहे. पेरणी केली तेव्हा पावसाचा पत्ता नव्हता. त्यानंतर आलेल्या पावसाने बियाणे अंकुरले. मात्र तळपत्या उन्हाने अंकुरलेले बियाणे वाळून गेले. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले. यावरही मात करीत शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र निसर्ग साथ द्यायला तयार नव्हता. अशा स्थितीत पोळ्याच्या आठवड्यात दमदार पाऊस झाला. पिकांना नवसंजीवनी मिळाली. गणेशोत्सवाच्या काळात दहा दिवस सारखा पाऊस कोसळत होता. यानंतर पावसाने दडी मारली ती आजतागायत. अशा स्थितीत पिकांवर किडींनी आक्रमण केले आहे. मावा, तुडतुडे, पांढरी माशी आदींनी कपाशीला घेरले आहे. तर मोझॅक आणि इतर रोगांनी सोयाबीन उद्ध्वस्त करणे सुरू केले आहे. अशा स्थितीत शेतकरी परंपरागत ज्ञानावर आधारित किटकनाशके फवारून कीड नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु त्यात यश येत नाही. शेवटी अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे धाव घेतली. कृषी विभागाने यावर उपाय सुचविले. मात्र तेही उपाय कुचकामी ठरल्याचे दिसत आहे.अशा स्थितीत शेतकऱ्यांनी आता अफलातून प्रयोग केल्याचे महागाव तालुक्यात दिसत आहे. पिकांना चक्क देशी दारूची फवारणी करीत आहे. या फवारणीला कोणताही शास्त्रीय आधार नाही. मात्र शेतकरी अनुभवातून ही फवारणी करीत आहे. यंदाच हा प्रयोग शेतकरी करीत आहे, असे नाही. तर गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी याचा प्रयोग करीत आहे. कोणत्याही किडीवर दारू फवारणी हा काही उपाय होवू शकत नाही, असे शेतकऱ्यांना कृषी विभागाने पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी शेतकरी तुम्हीच योग्य मार्गदर्शन करा, असे उलट त्यांना विचारत आहे. यामुळे आता कृषी विभागाचे अधिकारीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या भानगडीत पडत नाही. तालुक्यात सध्या पिकाची स्थिती अत्यंत गंभीर आहे. सोयाबीनची शेती पिवळी पडली आहे. पऱ्हाटीवर लाल्या आणि इतर रोग दिसत आहे. यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. शेकडो शेतकरी हवालदिल झाले आहे. (शहर प्रतिनिधी)