शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पिकांवरील कीड नियंत्रणाबाहेर

By admin | Updated: September 29, 2014 00:52 IST

वातावरणातील बदलाने कपाशी आणि सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात किडींचे आक्रमण झाले आहे. महागडी औषधी फवारूनही कीड नियंत्रणात येत नाही. यामुळे हतबल शेतकरी कृषी विभागाकडे

महागाव : वातावरणातील बदलाने कपाशी आणि सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात किडींचे आक्रमण झाले आहे. महागडी औषधी फवारूनही कीड नियंत्रणात येत नाही. यामुळे हतबल शेतकरी कृषी विभागाकडे धाव घेतात. मात्र त्यांचेही मार्गदर्शन कुचकामी ठरत आहे. यावर उपाय म्हणून काही शेतकऱ्यांनी अफलातून प्रयोग सुरू केला असून चक्क दारू फवारून कीड नियंत्रणाचा प्रयत्न करीत आहे.यावर्षी जिल्ह्यात खरिपाची स्थिती सुरुवातीपासून नाजूक आहे. पेरणी केली तेव्हा पावसाचा पत्ता नव्हता. त्यानंतर आलेल्या पावसाने बियाणे अंकुरले. मात्र तळपत्या उन्हाने अंकुरलेले बियाणे वाळून गेले. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले. यावरही मात करीत शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र निसर्ग साथ द्यायला तयार नव्हता. अशा स्थितीत पोळ्याच्या आठवड्यात दमदार पाऊस झाला. पिकांना नवसंजीवनी मिळाली. गणेशोत्सवाच्या काळात दहा दिवस सारखा पाऊस कोसळत होता. यानंतर पावसाने दडी मारली ती आजतागायत. अशा स्थितीत पिकांवर किडींनी आक्रमण केले आहे. मावा, तुडतुडे, पांढरी माशी आदींनी कपाशीला घेरले आहे. तर मोझॅक आणि इतर रोगांनी सोयाबीन उद्ध्वस्त करणे सुरू केले आहे. अशा स्थितीत शेतकरी परंपरागत ज्ञानावर आधारित किटकनाशके फवारून कीड नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु त्यात यश येत नाही. शेवटी अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे धाव घेतली. कृषी विभागाने यावर उपाय सुचविले. मात्र तेही उपाय कुचकामी ठरल्याचे दिसत आहे.अशा स्थितीत शेतकऱ्यांनी आता अफलातून प्रयोग केल्याचे महागाव तालुक्यात दिसत आहे. पिकांना चक्क देशी दारूची फवारणी करीत आहे. या फवारणीला कोणताही शास्त्रीय आधार नाही. मात्र शेतकरी अनुभवातून ही फवारणी करीत आहे. यंदाच हा प्रयोग शेतकरी करीत आहे, असे नाही. तर गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी याचा प्रयोग करीत आहे. कोणत्याही किडीवर दारू फवारणी हा काही उपाय होवू शकत नाही, असे शेतकऱ्यांना कृषी विभागाने पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी शेतकरी तुम्हीच योग्य मार्गदर्शन करा, असे उलट त्यांना विचारत आहे. यामुळे आता कृषी विभागाचे अधिकारीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या भानगडीत पडत नाही. तालुक्यात सध्या पिकाची स्थिती अत्यंत गंभीर आहे. सोयाबीनची शेती पिवळी पडली आहे. पऱ्हाटीवर लाल्या आणि इतर रोग दिसत आहे. यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. शेकडो शेतकरी हवालदिल झाले आहे. (शहर प्रतिनिधी)