शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

पिकांवरील कीड नियंत्रणाबाहेर

By admin | Updated: September 29, 2014 00:52 IST

वातावरणातील बदलाने कपाशी आणि सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात किडींचे आक्रमण झाले आहे. महागडी औषधी फवारूनही कीड नियंत्रणात येत नाही. यामुळे हतबल शेतकरी कृषी विभागाकडे

महागाव : वातावरणातील बदलाने कपाशी आणि सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात किडींचे आक्रमण झाले आहे. महागडी औषधी फवारूनही कीड नियंत्रणात येत नाही. यामुळे हतबल शेतकरी कृषी विभागाकडे धाव घेतात. मात्र त्यांचेही मार्गदर्शन कुचकामी ठरत आहे. यावर उपाय म्हणून काही शेतकऱ्यांनी अफलातून प्रयोग सुरू केला असून चक्क दारू फवारून कीड नियंत्रणाचा प्रयत्न करीत आहे.यावर्षी जिल्ह्यात खरिपाची स्थिती सुरुवातीपासून नाजूक आहे. पेरणी केली तेव्हा पावसाचा पत्ता नव्हता. त्यानंतर आलेल्या पावसाने बियाणे अंकुरले. मात्र तळपत्या उन्हाने अंकुरलेले बियाणे वाळून गेले. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले. यावरही मात करीत शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र निसर्ग साथ द्यायला तयार नव्हता. अशा स्थितीत पोळ्याच्या आठवड्यात दमदार पाऊस झाला. पिकांना नवसंजीवनी मिळाली. गणेशोत्सवाच्या काळात दहा दिवस सारखा पाऊस कोसळत होता. यानंतर पावसाने दडी मारली ती आजतागायत. अशा स्थितीत पिकांवर किडींनी आक्रमण केले आहे. मावा, तुडतुडे, पांढरी माशी आदींनी कपाशीला घेरले आहे. तर मोझॅक आणि इतर रोगांनी सोयाबीन उद्ध्वस्त करणे सुरू केले आहे. अशा स्थितीत शेतकरी परंपरागत ज्ञानावर आधारित किटकनाशके फवारून कीड नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु त्यात यश येत नाही. शेवटी अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे धाव घेतली. कृषी विभागाने यावर उपाय सुचविले. मात्र तेही उपाय कुचकामी ठरल्याचे दिसत आहे.अशा स्थितीत शेतकऱ्यांनी आता अफलातून प्रयोग केल्याचे महागाव तालुक्यात दिसत आहे. पिकांना चक्क देशी दारूची फवारणी करीत आहे. या फवारणीला कोणताही शास्त्रीय आधार नाही. मात्र शेतकरी अनुभवातून ही फवारणी करीत आहे. यंदाच हा प्रयोग शेतकरी करीत आहे, असे नाही. तर गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी याचा प्रयोग करीत आहे. कोणत्याही किडीवर दारू फवारणी हा काही उपाय होवू शकत नाही, असे शेतकऱ्यांना कृषी विभागाने पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी शेतकरी तुम्हीच योग्य मार्गदर्शन करा, असे उलट त्यांना विचारत आहे. यामुळे आता कृषी विभागाचे अधिकारीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या भानगडीत पडत नाही. तालुक्यात सध्या पिकाची स्थिती अत्यंत गंभीर आहे. सोयाबीनची शेती पिवळी पडली आहे. पऱ्हाटीवर लाल्या आणि इतर रोग दिसत आहे. यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. शेकडो शेतकरी हवालदिल झाले आहे. (शहर प्रतिनिधी)