शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

अवाजवी देयकांनी ग्राहक त्रस्त

By admin | Updated: July 29, 2015 02:30 IST

दर महिन्याला मीटरचे रिडींग न घेता सहा महिन्यातून एकदाच रिडींग देऊन वीज देयके पाठविली जातात.

वीज वितरणचा कारभार : मीटर रिडींगची पद्धतच चुकीचीमारेगाव : दर महिन्याला मीटरचे रिडींग न घेता सहा महिन्यातून एकदाच रिडींग देऊन वीज देयके पाठविली जातात. त्यामुळे ग्राहकांना अवाजवी देयकांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. तक्रार करूनही महावितरण मात्र कारभारात सुधारणा करण्यास तयार नाही.वीज आता सर्वांसाठीच जीवनावश्यक गरज बनली आहे. विजेच्या बाबतीत ग्राहकही आता जागृत झाले आहे. वीज कंपनीचे देयके तो नेहमी काळजीपूर्वक भरतो. तथापि कंपनी मात्र ग्राहकांच्या बाबतीत नेहमी उदासीन धोरण अवलंबते. महावितरण आपल्या कारभारात सुधारणा करताना दिसून येत नाही. कंपनीच्या या कारभाराने ग्राहक नेहमी असंतुष्ट असतात. वीज कंपनीकडून मिळणाऱ्या देयकाचा काळजीपूर्वक भरणा करणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. मात्र वीज कंपनी ग्राहकांना कधीही काळजीपूर्वक देयके पाठवित नाही, असा ग्राहकांचा अनुभव आहे.महावितरणच्या भोंगळ कारभाराबाबत कर्मचाऱ्यांची कमतरता, हे कारण नेहमी सांगितले जाते. देयके भरण्याची तारीख उलटून गेल्यानंतर देयकांचे वितरण करण्यात येते. बरेचदा तर दर महिन्याला देयकाचे वितरणही होत नाही. त्यामुळे ग्राहकांवर आर्थिक भुर्दंड बसतो. ग्रामीण भागात नियमित ग्राहकांच्या घरी जाऊन रिडींग घ्यायला कर्मचारी नसतात. बरेचदा रिडींग न घेताच ‘अ‍ॅव्हरेज’ देयके पाठविली जातात. ग्राहकांनी तक्रार केल्यानंतर पुढील महिन्यात कर्मचारी येईल, असे सांगून वेळ मारून नेली जाते. तरीही कर्मचारी रिडींगसाठी पोहोचतच नाही.आता नुकतेच जुनेच देयके ग्राहकंच्या हाती पडले. अचानकपणे आवाजवी देयके बघून ग्राहक चांगलेच चक्रावून गेले. त्यांचे डोळेच पांढरे झाले. गेल्या सहा महिन्यांपासून मीटर रिडींग न नेताच देयके पाठविली जात होती. आता या महिन्यात रिडींग घेऊन देफके पाठविण्यात आल्याने रिडींग वाढले आहे. रिडींग १०० च्या वर असल्याने जास्तच्या दराचा भुर्दंड ग्राहकांवर बसला आहे. या संदर्भात तालुक्यातील जळका येथील नारायण रोगे यांनी महावितरणच्या अभियंत्याची भेट घेतली असता, त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिले. महावितरण कंपनीचे अभियंते व कर्मचारी प्रथम तर ग्राहकांशी बोलायलाही तयार नसतात. बोलल्यानंतर ग्राहकांचे ऐकूण न घेताच आमचेच बरोबर आहे, हे स्पष्टपणे सांगतात. वीज वितरण कंपनीच्या ताठर भूमिकेमुळे ग्राहकांत प्रचंड रोष आहे. कंपनीने आपल्या कामात सुधारणा करून ग्राहकांशी सौजन्याने वागावे, अशी मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)