शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

मारेगावात डेंग्यू, टायफाईड व मलेरियाचा झाला शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 05:00 IST

पावसाळ्यात नाली सफाई होणे गरजेचे आहे, परंतु पावसाळा सुरू झाला, तेव्हापासून नगरपंचायत प्रशासनाने नाली सफाईकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. पावसाळ्यात नालीतून पाणी वाहून जात असल्याने आपसुकच नाली सफाई होते, ही भावना सफाई कामगारांची झाली आहे. त्यामुळे काही विशिष्ट भागातीलच नाली सफाई होत आहे. त्यामुळे शहरातील काही भागांतील नालीतून दुर्गंधी येत असून, नागरिकांना नाली परिसरात उभे राहणेही कठीण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : शहरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने  शहरात आता मलेरिया, टायफाइडसह डेंग्यू आजाराचे थैमान घातले आहे. सरकारी रुग्णालयात रुग्णाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत खासगी रुग्णालयाकडे रुग्णांचा वाढता कल वाढला आहे. त्यामुळे सध्या शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक खासगी रुग्णालये हाउसफुल झाल्याची चित्र आहे.पावसाळ्यात नाली सफाई होणे गरजेचे आहे, परंतु पावसाळा सुरू झाला, तेव्हापासून नगरपंचायत प्रशासनाने नाली सफाईकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. पावसाळ्यात नालीतून पाणी वाहून जात असल्याने आपसुकच नाली सफाई होते, ही भावना सफाई कामगारांची झाली आहे. त्यामुळे काही विशिष्ट भागातीलच नाली सफाई होत आहे. त्यामुळे शहरातील काही भागांतील नालीतून दुर्गंधी येत असून, नागरिकांना नाली परिसरात उभे राहणेही कठीण झाले आहे. परिणामी, विविध आजारांना निमंत्रण देणाऱ्या डासांची उत्पत्ती होत आहे. शहरातील अनेक भागांत तापाची साथ सुरू असून, दररोज डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. शहरातील ग्रामीण रुग्णालयात तालुक्यातून दररोज शेकडो रुग्ण येतात, परंतु डॉक्टरांच्या कमतरतेमुळे व अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे बरेचदा या रुग्णांना दाखल करून घेतल्या जात नाही. विशिष्ट वेळेत याल तरच उपचार करू, अशी भूमिका या रुग्णालयाची असल्याचा आरोप रुग्ण करीत असून, दिलेल्या वेळेतच आजारी पडावे काय, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.  हीच अवस्था तालुक्यातील ग्रामीण भागातही असून, तिथेही इतर आजारासोबतच डेंग्यूची रुग्णसंख्या वाढत आहे. चिखलमय रस्ते, रस्त्यावर वाहणारे सांडपाणी, अस्वच्छ पिण्याचे पाणी यामुळे ग्रामीण भागात डेंग्यू आजार जोर पकडत आहे. तालुक्यात वाढते आजार पाहता, हिवताप तपासणी मोहीम राबवून डासांचे नियत्रंण करण्यासाठी फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

संततधार पाऊसच ठरतोय घातक- या वर्षी तालुक्यात अर्धा पावसाळा संपला, तरी मोठा पाऊस पडला नाही. त्यामुळे शहरातील व गावातील घाण व काडी कचरा वाहून गेला नाही. गेल्या आठवड्यात रिपरिप पाऊस सुरू होता. त्यामुळे ही घाण सडून चिखलाचे साम्राज्य वाढून रोगराईला चालना मिळाली. यामुळे आजारात वाढ होत आहे, तसेच वातावरणातही सतत बदल होत असून, दिवसभर उन्ह व सावलीचा खेळ सुरू असतो. वातावरणातील या बदलांमुळेही अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. विशेषत: या बदलत्या वातावरणाचा लहान मुलांना चांगलाच फटका बसत आहे.

 

टॅग्स :dengueडेंग्यू