शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात डेंग्यूचा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 05:00 IST

डेंग्यूच्या नियंत्रणासाठी साचलेले पाणी वाहते करून देणे हाच रामबाण उपाय आहे. आता पावसाचे पाणी व सांडपाणी अनेक ठिकाणी रिकाम्या प्लॉटमध्ये साचले आहे. काही भागात जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईनचे खोदकाम सुरू आहे. त्या खोदकामाच्या गड्ड्यातही पाणी साचून आहे. त्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तापाची लक्षणे असलेल्या रुग्णांवर खासगी डॉक्टरांकडून उपचार केला जात नाही.

ठळक मुद्देयुवकाचा मृत्यू : आरोग्य यंत्रणा कोरोना उपाययोजनेत व्यस्त, गटारांमुळे आरोग्याला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील अनेक भागात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. डेंग्यू उद्रेकासारखी स्थिती निर्माण झाली आहे. वाढीव क्षेत्रातील कॉलन्यांमध्ये ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचले असून त्यात स्वच्छ पाणी आहे. याच पाण्यात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत आहे. दर्डानगर परिसरातील प्राध्यापक कॉलनीत एका १९ वर्षीय युवकाचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे.अभय भीमराव ठोंबरे (१९) असे या युवकाचे नाव आहे. त्याची प्रकृती खालावल्याने नागपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शहरात डेंग्यूचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत.डेंग्यूच्या नियंत्रणासाठी साचलेले पाणी वाहते करून देणे हाच रामबाण उपाय आहे. आता पावसाचे पाणी व सांडपाणी अनेक ठिकाणी रिकाम्या प्लॉटमध्ये साचले आहे. काही भागात जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईनचे खोदकाम सुरू आहे. त्या खोदकामाच्या गड्ड्यातही पाणी साचून आहे. त्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तापाची लक्षणे असलेल्या रुग्णांवर खासगी डॉक्टरांकडून उपचार केला जात नाही. त्यामुळे डेंग्यू व इतर कीटकजन्य आजारामुळे ताप व इतर लक्षणे असलेल्या रुग्णांना उपचार घेताना अडचणी येत आहेत. खासगी डॉक्टरांना प्रतिबंध असल्याने डेंग्यू सदृश लक्षणे असूनही तशा रुग्णांवर उपचार होत नाही. यामुळे रुग्णांपुढे दुहेरी संकट निर्माण झाले आहे.शासनाची आरोग्य यंत्रणा पूर्णत: कोरोना संसर्गाच्या नियंत्रण कामात व्यस्त आहे. आता पावसाळ्याचे दिवस असल्याने कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यात डेंग्यूपासून जीवघेणा धोका आहे. त्याच्या नियंत्रणासाठी सध्या तरी कुठलाही ठोस कार्यक्रम आरोग्य यंत्रणेकडून शहरात राबविला जात नाही.नगरपरिषदेचा मान्सूनपूर्व कामांना हरताळनगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडून मान्सूनपूर्व कामाकडे यावर्षी पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. काही ठराविक नालेसफाई करून या कामाची मोहीम थांबविण्यात आली. गेल्या काही आठवड्यांपासून पाऊस जोरदार सुरू असून अनेक भागात पावसाचे डबके साचलेले आहे. या साचलेल्या पाण्याला वाहते करून देण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोणतीच उपाययोजना केली जात नाही. परिणामी डेंग्यूसारख्या जीवघेण्या डासांची उत्पत्ती वाढत आहे. शहरात धुराळणी अनेक महिन्यांपासून बंद आहे. कीटकजन्य आजारांचा उद्रेक होण्याची स्थिती असतानाही आरोग्य विभाग धुराळणी व कीटकशासकांची फवारणी करताना दिसत नाही.

टॅग्स :dengueडेंग्यू