शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

यवतमाळात डेंग्यूचा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 05:00 IST

डेंग्यूच्या नियंत्रणासाठी साचलेले पाणी वाहते करून देणे हाच रामबाण उपाय आहे. आता पावसाचे पाणी व सांडपाणी अनेक ठिकाणी रिकाम्या प्लॉटमध्ये साचले आहे. काही भागात जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईनचे खोदकाम सुरू आहे. त्या खोदकामाच्या गड्ड्यातही पाणी साचून आहे. त्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तापाची लक्षणे असलेल्या रुग्णांवर खासगी डॉक्टरांकडून उपचार केला जात नाही.

ठळक मुद्देयुवकाचा मृत्यू : आरोग्य यंत्रणा कोरोना उपाययोजनेत व्यस्त, गटारांमुळे आरोग्याला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील अनेक भागात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. डेंग्यू उद्रेकासारखी स्थिती निर्माण झाली आहे. वाढीव क्षेत्रातील कॉलन्यांमध्ये ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचले असून त्यात स्वच्छ पाणी आहे. याच पाण्यात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत आहे. दर्डानगर परिसरातील प्राध्यापक कॉलनीत एका १९ वर्षीय युवकाचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे.अभय भीमराव ठोंबरे (१९) असे या युवकाचे नाव आहे. त्याची प्रकृती खालावल्याने नागपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शहरात डेंग्यूचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत.डेंग्यूच्या नियंत्रणासाठी साचलेले पाणी वाहते करून देणे हाच रामबाण उपाय आहे. आता पावसाचे पाणी व सांडपाणी अनेक ठिकाणी रिकाम्या प्लॉटमध्ये साचले आहे. काही भागात जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईनचे खोदकाम सुरू आहे. त्या खोदकामाच्या गड्ड्यातही पाणी साचून आहे. त्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तापाची लक्षणे असलेल्या रुग्णांवर खासगी डॉक्टरांकडून उपचार केला जात नाही. त्यामुळे डेंग्यू व इतर कीटकजन्य आजारामुळे ताप व इतर लक्षणे असलेल्या रुग्णांना उपचार घेताना अडचणी येत आहेत. खासगी डॉक्टरांना प्रतिबंध असल्याने डेंग्यू सदृश लक्षणे असूनही तशा रुग्णांवर उपचार होत नाही. यामुळे रुग्णांपुढे दुहेरी संकट निर्माण झाले आहे.शासनाची आरोग्य यंत्रणा पूर्णत: कोरोना संसर्गाच्या नियंत्रण कामात व्यस्त आहे. आता पावसाळ्याचे दिवस असल्याने कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यात डेंग्यूपासून जीवघेणा धोका आहे. त्याच्या नियंत्रणासाठी सध्या तरी कुठलाही ठोस कार्यक्रम आरोग्य यंत्रणेकडून शहरात राबविला जात नाही.नगरपरिषदेचा मान्सूनपूर्व कामांना हरताळनगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडून मान्सूनपूर्व कामाकडे यावर्षी पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. काही ठराविक नालेसफाई करून या कामाची मोहीम थांबविण्यात आली. गेल्या काही आठवड्यांपासून पाऊस जोरदार सुरू असून अनेक भागात पावसाचे डबके साचलेले आहे. या साचलेल्या पाण्याला वाहते करून देण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोणतीच उपाययोजना केली जात नाही. परिणामी डेंग्यूसारख्या जीवघेण्या डासांची उत्पत्ती वाढत आहे. शहरात धुराळणी अनेक महिन्यांपासून बंद आहे. कीटकजन्य आजारांचा उद्रेक होण्याची स्थिती असतानाही आरोग्य विभाग धुराळणी व कीटकशासकांची फवारणी करताना दिसत नाही.

टॅग्स :dengueडेंग्यू