शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

शाळाबाह्य कामांचे ओझे, गुणवत्तेची खिचडी

By admin | Updated: September 5, 2015 02:56 IST

महाभारतात अर्जुनाला जीवनाचे सार सांगताना भगवान श्रीकृष्णाने स्वत:ची विविध रुपे दाखविली.

शिक्षक झाले आचारी : काळानुसार बदलले शिक्षणाचे रुप चंद्रकांत ठेंगे  पुसदमहाभारतात अर्जुनाला जीवनाचे सार सांगताना भगवान श्रीकृष्णाने स्वत:ची विविध रुपे दाखविली. आता आधुनिक काळातील गुरुंच्या विविध रुपांचा परिचय आजच्या शिष्यांना वेळोवेळी येतो. जीवनाचे सार सांगताना स्वत:च्या पेशाच्या उद्देशाची आठवण ठेवण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे. ज्ञानदान हा मूळ हेतू बाजूला ठेऊन शिक्षकांना कधी खिचडी शिजवावी लागते तर कधी जनगणना, कधी मतदान अधिकारी असे शाळाबाह्य कामाचे ओझे वाहावे लागते. यात गुणवत्तेची खिचडी होत आहे. खेड्यापाड्यातील उपेक्षित गरीब मुला-मुलींना दिले जाणारे शिक्षण व त्याविषयक धोरण, सल्ले देणारे तज्ज्ञ पुण्यात बसून अभ्यासक्रम तयार करतात. त्यानुसार तयार होणारी पारंपारिक कृतीशून्य पोपटपंची आणि त्यात भिरभिरणारे प्राथमिक शिक्षणाची अवस्था बदलविणे गरजेचे झाले आहे. परंतु या रथाचा सारथी असलेला शिक्षकच शाळाबाह्य कामांच्या ओझ्याखाली दबलेला आहे. गुणवत्ता ढासळण्यामागे खापर आता तर कामावर फोडून शिक्षक जबाबदारीतून निसटू पाहत आहेत. परंतु आजही हाडाच्या शिक्षकांची संख्या मोठी आहे आणि त्यांच्याच भरोश्यावर शिक्षणाचा डोल्हारा उभा आहे. पर्यवेक्षकीय यंत्रणेमुळे प्रशिक्षणाचा सुद्धा बोजवारा उडाला आहे. ज्ञानग्रहणापेक्षा मनोरंजन व वेळकाढूपणा येथे दिसतो. अधिकाऱ्यांचा कोणताही वचक येथे नसतो. भारंभार अहवाल व सोप्या कामासाठी वारंवार मिटींग यावर आवर घालणे गरजेचे आहे. एखादे देवस्थान प्रसिद्ध व्हावे, गर्दी वाढावी आणि पवित्रता भंग पावावी, असा प्रकार ज्ञानमंदिरात सुरू आहे. खिचडीच्या रुपाने शाळेत पैसे आले. व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष होण्यासाठी गटातटाचे राजकारण सुरू झाले. त्या राजकारणात अनेक शिक्षकांचा शिरकाव झाला. खिचडीसोबत भ्रष्टाचार शिजू लागला. ज्ञानाचे बुस्टर डोज देण्यात शिक्षक अपयशी ठरल्याचे सांगून पालकांनी सरकारी शाळांकडे पाठ फिरविली. मात्र त्यानंतरही उपाययोजना होतच नाही. गेल्या तीन वर्षांपासून शिक्षकांवर बीएलओची जबाबदारी देण्यात आली. राष्ट्रीय कार्य म्हणून प्रामाणिकपणे काम केल्यास ज्ञानदानात खंड पडतो, हे नाकारुन चालणार नाही. आता तर ‘सरल’चे काम करण्यास शिक्षक व्यस्त आहे. खासगी शाळांकडे कारकुनी काम करण्यास वेगळी यंत्रणा दिसून येते. परंतु सरकारी शाळातील शिक्षक मात्र याच कामात व्यस्त दिसतात. त्यामुळे येत्या काळात सरकारने प्राथमिक शिक्षणावर दुरोगामी बदल करणारी यंत्रणा उभारणे गरजेचे आहे.