शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

शाळाबाह्य कामांचे ओझे, गुणवत्तेची खिचडी

By admin | Updated: September 5, 2015 02:56 IST

महाभारतात अर्जुनाला जीवनाचे सार सांगताना भगवान श्रीकृष्णाने स्वत:ची विविध रुपे दाखविली.

शिक्षक झाले आचारी : काळानुसार बदलले शिक्षणाचे रुप चंद्रकांत ठेंगे  पुसदमहाभारतात अर्जुनाला जीवनाचे सार सांगताना भगवान श्रीकृष्णाने स्वत:ची विविध रुपे दाखविली. आता आधुनिक काळातील गुरुंच्या विविध रुपांचा परिचय आजच्या शिष्यांना वेळोवेळी येतो. जीवनाचे सार सांगताना स्वत:च्या पेशाच्या उद्देशाची आठवण ठेवण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे. ज्ञानदान हा मूळ हेतू बाजूला ठेऊन शिक्षकांना कधी खिचडी शिजवावी लागते तर कधी जनगणना, कधी मतदान अधिकारी असे शाळाबाह्य कामाचे ओझे वाहावे लागते. यात गुणवत्तेची खिचडी होत आहे. खेड्यापाड्यातील उपेक्षित गरीब मुला-मुलींना दिले जाणारे शिक्षण व त्याविषयक धोरण, सल्ले देणारे तज्ज्ञ पुण्यात बसून अभ्यासक्रम तयार करतात. त्यानुसार तयार होणारी पारंपारिक कृतीशून्य पोपटपंची आणि त्यात भिरभिरणारे प्राथमिक शिक्षणाची अवस्था बदलविणे गरजेचे झाले आहे. परंतु या रथाचा सारथी असलेला शिक्षकच शाळाबाह्य कामांच्या ओझ्याखाली दबलेला आहे. गुणवत्ता ढासळण्यामागे खापर आता तर कामावर फोडून शिक्षक जबाबदारीतून निसटू पाहत आहेत. परंतु आजही हाडाच्या शिक्षकांची संख्या मोठी आहे आणि त्यांच्याच भरोश्यावर शिक्षणाचा डोल्हारा उभा आहे. पर्यवेक्षकीय यंत्रणेमुळे प्रशिक्षणाचा सुद्धा बोजवारा उडाला आहे. ज्ञानग्रहणापेक्षा मनोरंजन व वेळकाढूपणा येथे दिसतो. अधिकाऱ्यांचा कोणताही वचक येथे नसतो. भारंभार अहवाल व सोप्या कामासाठी वारंवार मिटींग यावर आवर घालणे गरजेचे आहे. एखादे देवस्थान प्रसिद्ध व्हावे, गर्दी वाढावी आणि पवित्रता भंग पावावी, असा प्रकार ज्ञानमंदिरात सुरू आहे. खिचडीच्या रुपाने शाळेत पैसे आले. व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष होण्यासाठी गटातटाचे राजकारण सुरू झाले. त्या राजकारणात अनेक शिक्षकांचा शिरकाव झाला. खिचडीसोबत भ्रष्टाचार शिजू लागला. ज्ञानाचे बुस्टर डोज देण्यात शिक्षक अपयशी ठरल्याचे सांगून पालकांनी सरकारी शाळांकडे पाठ फिरविली. मात्र त्यानंतरही उपाययोजना होतच नाही. गेल्या तीन वर्षांपासून शिक्षकांवर बीएलओची जबाबदारी देण्यात आली. राष्ट्रीय कार्य म्हणून प्रामाणिकपणे काम केल्यास ज्ञानदानात खंड पडतो, हे नाकारुन चालणार नाही. आता तर ‘सरल’चे काम करण्यास शिक्षक व्यस्त आहे. खासगी शाळांकडे कारकुनी काम करण्यास वेगळी यंत्रणा दिसून येते. परंतु सरकारी शाळातील शिक्षक मात्र याच कामात व्यस्त दिसतात. त्यामुळे येत्या काळात सरकारने प्राथमिक शिक्षणावर दुरोगामी बदल करणारी यंत्रणा उभारणे गरजेचे आहे.