शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

आर्णीत वाहतूक नियंत्रणाबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 22:10 IST

शहरातील वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. वाहतूक पोलिसांच्या दुटप्पी भूमिकेमुळे वाहतूक व्यवस्थाच नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसत अहे.

ठळक मुद्देट्रॅव्हल्सधारकांना अभय : दुचाकीस्वारांवर कारवाई, किरकोळ अपघात नित्याचेच

हरीओमसिंह बघेल ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : शहरातील वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. वाहतूक पोलिसांच्या दुटप्पी भूमिकेमुळे वाहतूक व्यवस्थाच नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसत अहे.शहरात एकच मुख्य रस्ता आहे. याच परिसरात मुख्य बाजारपेठ आहे. यामुळे हा रस्ता नेहमीच गर्दीने फुललेला असतो. त्यावरून होणाºया अनियंत्रित वाहतुकीने आता नागरिक बेजार झाले अहे. विद्यार्थी, महिलांची कुचंबणा होत आहे. वाहतूक नियंत्रित करण्यात वाहतूक पोलीस अपयशी ठरत आहे. परिणामी गेल्या काही दिवसांपासून शहरात वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे.वाहनधारकांवर पोलिसांचा कोणताही ‘अंकुश’ नाही. उलट अवैध वाहतूक ही अंडे देणारी कोंबडी असल्याने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. पोलीस यंत्रणा या कोंबडीला जिवंत कसे ठेवता येईल, यासाठीच प्रयत्न करताना दिसत आहेत. वाहतूक पोलीस महिन्याकाठी लाखो रूपयांची माया गोळा करण्यातच व्यस्त असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मुख्य रोडवरील बसस्थानक परिसर वर्दळीचा आहे. मात्र वाहतूक पोलीस तेथे कधीच दिसून येत नाही. ते शहराबाहेर उभे राहून दुचाकीस्वारांना पकडून धमकाविण्यातच धन्यता मानत आहे.शहरात बस्स्थानकासमोरच ट्रॅव्हल्सवाल्यानी हैदोस घातला आहे. बसस्थानकापासून शंभर मीटरच्या पलीकडे ट्रॅव्हल्स ऊभी करावी, असा नियम आहे. मात्र वाहतूक शिपायांच्या आशीर्वादाने ट्रॅव्हल्स चालक बस्स्थानकासमोरच वाहन ऊभे करुन प्रवासी भरताना दिसत आहे. यामुळे अनेकदा बस पास होताना अपघात झाले आहे.या परिसरात विद्यार्थ्यांचे सतत अपघात होत आहे. तरीही वाहतूक पोलीस ट्रॅव्हल्सवाल्यांना अभय देताना दिसत आहे. यामुळे आर्णीकर जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे एखादवेळी मोठा अपघात होऊन नाहक निष्पाप जिवांचे बळी जाण्याची शक्यता बळावली आहे.अवैध वाहनधारकांशी लागेबांधेगेल्या अनेक वर्षांपासून शहरात तेच ते वाहतूक पोलीस दिसत आहे. यातून त्यांचे अवैध वाहतूकदारांशी लागेबांधे निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस अवैध वाहतूकदारांवर कारवाई करताना दिसतच नाही. उलट ट्रॅव्हल्सच्या वाहतुकीला सुरक्षा पुरविताना दिसत आहे. याकडे ठाणेदारांनी लक्ष देण्याची गरज अहे. किमान बसस्थानक परिसरात होणारी वाहतूक कोंडी दूर करून सामान्य वाहनधारक आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Travelप्रवास