शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

आर्णीत वाहतूक नियंत्रणाबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 22:10 IST

शहरातील वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. वाहतूक पोलिसांच्या दुटप्पी भूमिकेमुळे वाहतूक व्यवस्थाच नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसत अहे.

ठळक मुद्देट्रॅव्हल्सधारकांना अभय : दुचाकीस्वारांवर कारवाई, किरकोळ अपघात नित्याचेच

हरीओमसिंह बघेल ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : शहरातील वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. वाहतूक पोलिसांच्या दुटप्पी भूमिकेमुळे वाहतूक व्यवस्थाच नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसत अहे.शहरात एकच मुख्य रस्ता आहे. याच परिसरात मुख्य बाजारपेठ आहे. यामुळे हा रस्ता नेहमीच गर्दीने फुललेला असतो. त्यावरून होणाºया अनियंत्रित वाहतुकीने आता नागरिक बेजार झाले अहे. विद्यार्थी, महिलांची कुचंबणा होत आहे. वाहतूक नियंत्रित करण्यात वाहतूक पोलीस अपयशी ठरत आहे. परिणामी गेल्या काही दिवसांपासून शहरात वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे.वाहनधारकांवर पोलिसांचा कोणताही ‘अंकुश’ नाही. उलट अवैध वाहतूक ही अंडे देणारी कोंबडी असल्याने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. पोलीस यंत्रणा या कोंबडीला जिवंत कसे ठेवता येईल, यासाठीच प्रयत्न करताना दिसत आहेत. वाहतूक पोलीस महिन्याकाठी लाखो रूपयांची माया गोळा करण्यातच व्यस्त असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मुख्य रोडवरील बसस्थानक परिसर वर्दळीचा आहे. मात्र वाहतूक पोलीस तेथे कधीच दिसून येत नाही. ते शहराबाहेर उभे राहून दुचाकीस्वारांना पकडून धमकाविण्यातच धन्यता मानत आहे.शहरात बस्स्थानकासमोरच ट्रॅव्हल्सवाल्यानी हैदोस घातला आहे. बसस्थानकापासून शंभर मीटरच्या पलीकडे ट्रॅव्हल्स ऊभी करावी, असा नियम आहे. मात्र वाहतूक शिपायांच्या आशीर्वादाने ट्रॅव्हल्स चालक बस्स्थानकासमोरच वाहन ऊभे करुन प्रवासी भरताना दिसत आहे. यामुळे अनेकदा बस पास होताना अपघात झाले आहे.या परिसरात विद्यार्थ्यांचे सतत अपघात होत आहे. तरीही वाहतूक पोलीस ट्रॅव्हल्सवाल्यांना अभय देताना दिसत आहे. यामुळे आर्णीकर जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे एखादवेळी मोठा अपघात होऊन नाहक निष्पाप जिवांचे बळी जाण्याची शक्यता बळावली आहे.अवैध वाहनधारकांशी लागेबांधेगेल्या अनेक वर्षांपासून शहरात तेच ते वाहतूक पोलीस दिसत आहे. यातून त्यांचे अवैध वाहतूकदारांशी लागेबांधे निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस अवैध वाहतूकदारांवर कारवाई करताना दिसतच नाही. उलट ट्रॅव्हल्सच्या वाहतुकीला सुरक्षा पुरविताना दिसत आहे. याकडे ठाणेदारांनी लक्ष देण्याची गरज अहे. किमान बसस्थानक परिसरात होणारी वाहतूक कोंडी दूर करून सामान्य वाहनधारक आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Travelप्रवास