शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

साडेतीन लाख शेतकरी बाहेरच

By admin | Updated: March 29, 2017 00:27 IST

गत आठ वर्षात जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही.

कर्जमाफी नाहीच : बँकांनी वसुलीसाठी आवळला पाश यवतमाळ : गत आठ वर्षात जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. हे शेतकरी आता बाहेर फेकले गेले. त्यांना पुन्हा कर्ज मिळणे कठीण झाले. अशात आणेवारी ५० टक्केच्यावर दर्शविण्यात आल्याने बँंकांनी संधीचे सोने करीत कर्ज वसुली मोहीम आणखी तेज केली आहे. यातूनच शेतकऱ्यांना शेती लिलावाच्या नोटीस बजावल्या जात आहे. गेल्या १५ दिवसांपासून कर्जमाफीच्या विषयावर राज्यात रणकंदन माजले आहे. कर्जमाफीच्या घोषणेशिवाय अंदाजपत्रक मांडू दिले जाणार नाही, अशी भूमिका विरोधकांनी घेतली. याच स्थितीत शनिवारी विधीमंडळात अंदाजपत्रक सादर झाले. मात्र त्यात कर्जमाफीचा साधा उल्लेखही करण्यात आला नाही. त्यासाठी कोणती तरतूदही केली गेली नाही. यामुळे सध्या कर्जमाफी होणार नाही, असेच संकेत शेतकऱ्यांना मिळाले आहे. या प्रकारात अखेर बळीराजाच बळी गेला आहे. कर्जमाफी होईल की नाही, याकडे राज्यातील शेतकरी डोळे लावून बसले होते. अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा होण्याची आशा त्यांना वाटत होती. मात्र अखेर कर्जमाफीची घोषणा झालीच नाही. त्यामुळे संपूर्ण राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांच्या हिरव्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले. परिणामी शेतकऱ्यांना आता कर्ज वसुली मोहिमेला सामोरे जावे लागणार आहे. कर्जमाफीची घोषणा न झाल्याने बँकांनी वसुलीची मोहीम आणखी तेज केली आहे. दरम्यानच्या काळात काही अधिकाऱ्यांनी वसुली मोहीम राबविली नाही. त्यांच्या व्यवस्थापकांनी आता जिल्ह्याच्या ठिकाणी डेरा टाकला आहे. ते दररोज वसुलीचे अपडेट घेत आहे. यामुळे बँक कर्मचारी कर्ज वसुलीकरिता गावे पालथी घालत आहे. आता अंदाजपत्रकात कर्जमाफीची घोषणा नसल्याने शेतकरी एकाकी पडले आहेत. त्यांना बँकेच्या परतफेडीचा सामना करावा लागणार आहे. शेत मालास दर नसल्याने शेतकरी आधीच खचले आहे. शासकीय खरेदी केंद्रे बंद आहेत. सोयाबीन, तूर, हरभऱ्याचे दर पडले आहेत. अशा स्थितीत कर्जाची परतफेड कशी करायची, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. (शहर वार्ताहर) दोन हजार कोटी थकले गत आठ वर्षात तीन लाख ५८ हजार शेतकऱ्यांनी कर्जाची उचल केली. त्यांच्याकडे आता व्याजासह दोन हजार कोटींच्या घरात कर्ज थकले आहे. त्यांना कर्जाच्या प्रवाहात आणण्यासाठी कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले. तरीही त्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. त्यामुळे पुन्हा पुनर्गठन झाले. आता हे कर्जच फेडता येणार नाही, अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे. जिल्हा बँकेचे एक लाख ९८ हजार थकबाकीदार शेतकरी आहेत. राष्ट्रीयकृत बँकांचे एक लाख ६० हजार शेतकरी थकबाकीदार आहे. या सर्व शेतकऱ्यांना कर्ज वसुली मोहिमेचा सामना करावा लागणार आहे.