शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

दहा हजार कोटींच्या पॅकेजमधून विदर्भाला केवळ साडेसात कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 12:44 IST

vidarbha Yawatmal news अतिवृष्टीग्रस्तांसाठी महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या दहा हजार कोटींच्या पॅकेजमधून विदर्भाच्या वाट्याला फक्त सात कोटी ३२ लाख ९० हजार रुपये येणार आहे.

ठळक मुद्देम्हणे, केवळ भंडारा जिल्ह्यातच नुकसानअमरावती विभागात घरे, भांड्यांचीच हानी

 लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : अतिवृष्टीग्रस्तांसाठी महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या दहा हजार कोटींच्या पॅकेजमधून विदर्भाच्या वाट्याला फक्त सात कोटी ३२ लाख ९० हजार रुपये येणार आहे. सरकारच्या लेखी केवळ भंडारा जिल्ह्यातच नुकसान झाले. इतर ठिकाणी घरे, भांडी आदी वस्तूंच्याच नुकसानीची नोंद आहे. नेहमीप्रमाणे याहीवेळी विदर्भावर मदतीत अन्याय झाला आहे. 

परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीपोटी सरकारने मदत जाहीर करताना विदर्भातील दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम, तर नागपूर विभागात नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या जिल्ह्यात शेतीचे कवडीचेही नुकसान झाले नसल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

भंडारा जिल्ह्यात शेतीचे केवळ दोन कोटी ११ लाख ४३ हजारांचेच नुकसान झाले. घरे, कपडे, भांडी आदी बाबींचे १९ लाख ८५ हजार, मृत जनावरांचे पाच लाख ८२ हजार, तर मोठ्या प्रमाणातील पडझडीचे नुकसान दोन कोटी ८६ लाख ५६ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमिळून एक कोटी ९४ लाख ५२ हजार रुपये इतकेच नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. अमरावती व अकोला या दोन जिल्ह्यात चार लाख ८२ हजार रुपयांचे नुकसान दर्शविण्यात आले आहे. आठ जिल्ह्यांमध्ये एकही जनावर मृत्यूमुखी पडले नाही, असे सरकारचे सर्वेक्षण आहे. उर्वरित महाराष्ट्राला मोठा वाटासरकारने जाहीर केलेल्या दहा हजार कोटींच्या पॅकेजमधील मोठा वाटा उर्वरित महाराष्ट्राला मिळणार आहे. महाराष्ट्र आणि विदर्भ यांच्यात या रकमेचे वाटप विसंगत पद्धतीने होणार आहे. उर्वरित महाराष्ट्राला जिरायतीसाठी हेक्टरी एक हजार, तर फळपिकासाठी २५ हजार रुपये मिळणार आहे. सनदी अधिकाऱ्यांनी केलेले पंचनामे सदोष असल्याचा आराेप होत आहे.पॅकेजमध्ये विदर्भावर अन्याय झाला आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी मुंबईत दाखल झालो आहे. काही जिल्ह्यात शेतीचे एक रुपयाचेही नुकसान झाले नाही हे कसे शक्य आहे.- किशोर तिवारी, अध्यक्ष, शेतकरी स्वावलंबन मिशन

टॅग्स :agricultureशेती