शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
7
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
8
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
9
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."

मारेगावात ८६ पैकी २७ रास्त भाव दुकाने बंदच

By admin | Updated: August 9, 2014 01:24 IST

आदिवासीबहुल मारेगाव तालुक्यातील गेल्या तीन ते आठ वर्षांपासून बंद असणाऱ्या रास्त भाव दुकानांमुळे वितरण व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.

मारेगाव : आदिवासीबहुल मारेगाव तालुक्यातील गेल्या तीन ते आठ वर्षांपासून बंद असणाऱ्या रास्त भाव दुकानांमुळे वितरण व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सदर रास्त भाव परवाधारकांचे परवाने रद्द करून संबंधित गावांसाठी नव्याने जाहीरनामे काढावे, अशी मागणी होत आहे़तालुक्यात आदिवासी, गैर आदिवासी गावांसाठी एकूण ८६ रास्त भाव परवानाधारक आहेत. मात्र त्यातील तब्बल २७ रास्त भाव दुकाने विविध कारणांनी बंद पडलेली आहेत. ही सर्व बंद दुकाने दोन ते पाच किलोमीटर अंतरावरील गावांतील रास्त भाव दुकानांना अतिरिक्त म्हणून जोडण्यात आली़ ती सर्व दुकाने तीन ते आठ वर्षांपासून आजही तशीच कायम आहेत. त्यामुळे स्वस्त धान्यासाठी संबंधित गावांतील ग्रामस्थांची ससेहोलपट होत आहे़ तालुका पुरवठा विभागाने सदर दुकानांचे मूळ परवाने रद्द करून नव्याने जाहिरनामे काढण्याची गरज निर्माण झाली आहे़ ग्रामस्थांना दरमहा वेळेवर गावातूनच धान्य मिळावे, यासाठी लहान-मोठ्या गावात स्वस्त धान्य दुकाने सुरू करण्यात आली आहेत. तालुक्यात आदिवासींसाठी ३९ आणि गैर आदिवासींसाठी ४७, अशी एकूण ८६ परवानाधारक रास्त भाव दुकाने सुरू करण्यात आली होती. सोबतच आठ गावांत नवसंजीवनीअंतर्गत घरपोच धान्य पुरवठा योजना थाटात सुरू करण्यात आली होती. ही योजनाही आता बंद पडली आहे़ रास्त भाव दुकानांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गावागावात दक्षता समित्या नेमण्यात आल्या़ मात्र केवळ त्या कागदावरच विराजमान आहे़ तालुक्यात ८६ रास्त भाव दुकानांपैकी, परवानाधारक मयत, राजीनामे, निलंबन, अनाधिकृत गैरहजर, अशा विविध कारणांनी कान्हाळगाव, वरूड, महागाव, टाकळी, हिवरामजरा, पिसगाव, पांडविहीर, कुंभा १, डोंगरगाव, गोधणी, मेंढणी, बोदाड, बोटोणी १, सावंगी, खेकडवाई, खैरगाव, बुटी, मुकटा, शिवनाळा, गौराळा, लाखापूर, मजरा, कुंभार, नेत, सालेभट्टी, वसंतनगर, बोरी (खुर्द) येथील २७ दुकाने बंद आहेत. ही दुकाने इतर गावांतील रास्तभाव दुकानांना जोडण्यात आली आहे. ती आजही कायम आहे़ यातील काही गावांसाठी पुरवठा विभागाने दोन वर्षांपूर्वी जाहीरनामा काढला होता. तथापि महिला बचत गटांना प्राधान्य असल्याने इतरांनी अर्ज केलेच नाही़तालुक्यातील संबंधित गावातील महिला बचत गट पुरवठा विभागाच्या निकषाप्रमाणे सक्षम नसल्याने बचत गटांनी यात सारस्य दाखविले नाही. पुरवठा अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देऊन नव्याने सदर गावांसाठी जाहीरनामे काढावे, धान्य वितरणासाठी सक्षमांना प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा आहे. अन्यथा ही दुकाने कायमचीच बंद राहण्याची शक्यता बळावली आहे. (तालुका प्रतिनिधी)