शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

मारेगावात ८६ पैकी २७ रास्त भाव दुकाने बंदच

By admin | Updated: August 9, 2014 01:24 IST

आदिवासीबहुल मारेगाव तालुक्यातील गेल्या तीन ते आठ वर्षांपासून बंद असणाऱ्या रास्त भाव दुकानांमुळे वितरण व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.

मारेगाव : आदिवासीबहुल मारेगाव तालुक्यातील गेल्या तीन ते आठ वर्षांपासून बंद असणाऱ्या रास्त भाव दुकानांमुळे वितरण व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सदर रास्त भाव परवाधारकांचे परवाने रद्द करून संबंधित गावांसाठी नव्याने जाहीरनामे काढावे, अशी मागणी होत आहे़तालुक्यात आदिवासी, गैर आदिवासी गावांसाठी एकूण ८६ रास्त भाव परवानाधारक आहेत. मात्र त्यातील तब्बल २७ रास्त भाव दुकाने विविध कारणांनी बंद पडलेली आहेत. ही सर्व बंद दुकाने दोन ते पाच किलोमीटर अंतरावरील गावांतील रास्त भाव दुकानांना अतिरिक्त म्हणून जोडण्यात आली़ ती सर्व दुकाने तीन ते आठ वर्षांपासून आजही तशीच कायम आहेत. त्यामुळे स्वस्त धान्यासाठी संबंधित गावांतील ग्रामस्थांची ससेहोलपट होत आहे़ तालुका पुरवठा विभागाने सदर दुकानांचे मूळ परवाने रद्द करून नव्याने जाहिरनामे काढण्याची गरज निर्माण झाली आहे़ ग्रामस्थांना दरमहा वेळेवर गावातूनच धान्य मिळावे, यासाठी लहान-मोठ्या गावात स्वस्त धान्य दुकाने सुरू करण्यात आली आहेत. तालुक्यात आदिवासींसाठी ३९ आणि गैर आदिवासींसाठी ४७, अशी एकूण ८६ परवानाधारक रास्त भाव दुकाने सुरू करण्यात आली होती. सोबतच आठ गावांत नवसंजीवनीअंतर्गत घरपोच धान्य पुरवठा योजना थाटात सुरू करण्यात आली होती. ही योजनाही आता बंद पडली आहे़ रास्त भाव दुकानांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गावागावात दक्षता समित्या नेमण्यात आल्या़ मात्र केवळ त्या कागदावरच विराजमान आहे़ तालुक्यात ८६ रास्त भाव दुकानांपैकी, परवानाधारक मयत, राजीनामे, निलंबन, अनाधिकृत गैरहजर, अशा विविध कारणांनी कान्हाळगाव, वरूड, महागाव, टाकळी, हिवरामजरा, पिसगाव, पांडविहीर, कुंभा १, डोंगरगाव, गोधणी, मेंढणी, बोदाड, बोटोणी १, सावंगी, खेकडवाई, खैरगाव, बुटी, मुकटा, शिवनाळा, गौराळा, लाखापूर, मजरा, कुंभार, नेत, सालेभट्टी, वसंतनगर, बोरी (खुर्द) येथील २७ दुकाने बंद आहेत. ही दुकाने इतर गावांतील रास्तभाव दुकानांना जोडण्यात आली आहे. ती आजही कायम आहे़ यातील काही गावांसाठी पुरवठा विभागाने दोन वर्षांपूर्वी जाहीरनामा काढला होता. तथापि महिला बचत गटांना प्राधान्य असल्याने इतरांनी अर्ज केलेच नाही़तालुक्यातील संबंधित गावातील महिला बचत गट पुरवठा विभागाच्या निकषाप्रमाणे सक्षम नसल्याने बचत गटांनी यात सारस्य दाखविले नाही. पुरवठा अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देऊन नव्याने सदर गावांसाठी जाहीरनामे काढावे, धान्य वितरणासाठी सक्षमांना प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा आहे. अन्यथा ही दुकाने कायमचीच बंद राहण्याची शक्यता बळावली आहे. (तालुका प्रतिनिधी)