शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

मारेगावात ८६ पैकी २७ रास्त भाव दुकाने बंदच

By admin | Updated: August 9, 2014 01:24 IST

आदिवासीबहुल मारेगाव तालुक्यातील गेल्या तीन ते आठ वर्षांपासून बंद असणाऱ्या रास्त भाव दुकानांमुळे वितरण व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.

मारेगाव : आदिवासीबहुल मारेगाव तालुक्यातील गेल्या तीन ते आठ वर्षांपासून बंद असणाऱ्या रास्त भाव दुकानांमुळे वितरण व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सदर रास्त भाव परवाधारकांचे परवाने रद्द करून संबंधित गावांसाठी नव्याने जाहीरनामे काढावे, अशी मागणी होत आहे़तालुक्यात आदिवासी, गैर आदिवासी गावांसाठी एकूण ८६ रास्त भाव परवानाधारक आहेत. मात्र त्यातील तब्बल २७ रास्त भाव दुकाने विविध कारणांनी बंद पडलेली आहेत. ही सर्व बंद दुकाने दोन ते पाच किलोमीटर अंतरावरील गावांतील रास्त भाव दुकानांना अतिरिक्त म्हणून जोडण्यात आली़ ती सर्व दुकाने तीन ते आठ वर्षांपासून आजही तशीच कायम आहेत. त्यामुळे स्वस्त धान्यासाठी संबंधित गावांतील ग्रामस्थांची ससेहोलपट होत आहे़ तालुका पुरवठा विभागाने सदर दुकानांचे मूळ परवाने रद्द करून नव्याने जाहिरनामे काढण्याची गरज निर्माण झाली आहे़ ग्रामस्थांना दरमहा वेळेवर गावातूनच धान्य मिळावे, यासाठी लहान-मोठ्या गावात स्वस्त धान्य दुकाने सुरू करण्यात आली आहेत. तालुक्यात आदिवासींसाठी ३९ आणि गैर आदिवासींसाठी ४७, अशी एकूण ८६ परवानाधारक रास्त भाव दुकाने सुरू करण्यात आली होती. सोबतच आठ गावांत नवसंजीवनीअंतर्गत घरपोच धान्य पुरवठा योजना थाटात सुरू करण्यात आली होती. ही योजनाही आता बंद पडली आहे़ रास्त भाव दुकानांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गावागावात दक्षता समित्या नेमण्यात आल्या़ मात्र केवळ त्या कागदावरच विराजमान आहे़ तालुक्यात ८६ रास्त भाव दुकानांपैकी, परवानाधारक मयत, राजीनामे, निलंबन, अनाधिकृत गैरहजर, अशा विविध कारणांनी कान्हाळगाव, वरूड, महागाव, टाकळी, हिवरामजरा, पिसगाव, पांडविहीर, कुंभा १, डोंगरगाव, गोधणी, मेंढणी, बोदाड, बोटोणी १, सावंगी, खेकडवाई, खैरगाव, बुटी, मुकटा, शिवनाळा, गौराळा, लाखापूर, मजरा, कुंभार, नेत, सालेभट्टी, वसंतनगर, बोरी (खुर्द) येथील २७ दुकाने बंद आहेत. ही दुकाने इतर गावांतील रास्तभाव दुकानांना जोडण्यात आली आहे. ती आजही कायम आहे़ यातील काही गावांसाठी पुरवठा विभागाने दोन वर्षांपूर्वी जाहीरनामा काढला होता. तथापि महिला बचत गटांना प्राधान्य असल्याने इतरांनी अर्ज केलेच नाही़तालुक्यातील संबंधित गावातील महिला बचत गट पुरवठा विभागाच्या निकषाप्रमाणे सक्षम नसल्याने बचत गटांनी यात सारस्य दाखविले नाही. पुरवठा अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देऊन नव्याने सदर गावांसाठी जाहीरनामे काढावे, धान्य वितरणासाठी सक्षमांना प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा आहे. अन्यथा ही दुकाने कायमचीच बंद राहण्याची शक्यता बळावली आहे. (तालुका प्रतिनिधी)