शहरं
Join us  
Trending Stories
1
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
2
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
3
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
4
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
5
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
6
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
7
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
8
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
9
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
10
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
11
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
12
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
13
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
14
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
15
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
16
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
17
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
18
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
19
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
20
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा

27 हजार 698 पैकी केवळ 63 विद्यार्थी नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 05:00 IST

परीक्षेसाठी यवतमाळ जिल्ह्यातील १४ हजार २८८ मुले आणि १३ हजार ४२० अशा २७ हजार ६९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील १४ हजार २३३ मुले आणि १३ हजार ४०२ मुली असे २७ हजार ६३५ म्हणजेच ९९.७७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यामध्ये मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.६८ तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.८६ टक्के इतके आहे. 

ठळक मुद्दे९९.७७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण : काॅमर्स शाखेचा १०० टक्के तर कला ९९.९४ तर विज्ञान शाखेचा ९९.४९ टक्के निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास ऑनलाईन पद्धतीने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदाही यवतमाळ जिल्ह्याने या निकालात बाजी मारली आहे. अमरावती विभागात यवतमाळ अव्वल ठरला असून जिल्ह्याचा ९९.७७ टक्के निकाल लागला आहे. यामध्ये कॉमर्सचा निकाल १०० टक्के लागला आहे. यंदा केवळ ६३ विद्यार्थी नापास झाले आहे. तर जुन्या अभ्यासक्रमाचे १८ विद्यार्थीही परीक्षेत अयशस्वी ठरले.परीक्षेसाठी यवतमाळ जिल्ह्यातील १४ हजार २८८ मुले आणि १३ हजार ४२० अशा २७ हजार ६९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील १४ हजार २३३ मुले आणि १३ हजार ४०२ मुली असे २७ हजार ६३५ म्हणजेच ९९.७७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यामध्ये मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.६८ तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.८६ टक्के इतके आहे. सात तालुक्यांचा १०० टक्के निकाल मंगळवारी जाहीर झालेला इयत्ता बारावीचा निकाल सर्वार्थाने उच्चांकी ठरला. जिल्ह्यातील तब्बल पाच तालुक्यांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये वणी, झरी जामणी, पांढरकवडा, मारेगाव, आणि बाभूळगाव  या तालुक्यांचा समावेश आहे.  दरम्यान, यंदा बारावीची लेखी परीक्षा प्रत्यक्ष न झाल्याने मागील वर्षीच्या मूल्यांकनावर निकाल लावल्याने टक्का वाढल्याचे दिसत आहे. 

वाणिज्यसह जुन्या अभ्यासक्रमाचाही १०० टक्के निकाल

- यंदा बारावी परीक्षेत विक्रमी विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. त्यातही कॉमर्स शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे. परीक्षेला दोन हजार ४७६ विद्यार्थी बसले होते. हे सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. या बरोबरच सायन्सच्या जुन्या अभ्यासक्रमाचेही सर्वच्या सर्व १८४ विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. - कॉमर्स शाखेतून १२२६ मुले आणि १२५० मुली अशा एकूण २४७६ जणांनी परीक्षा दिली होती. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण ठरले आहे. विज्ञान शाखेतून पाच हजार ५५० मुले आणि पाच हजार २०१ अशा दहा हजार ७५१ जणांनी परीक्षा दिली होती. त्यातील दहा हजार ६९७ म्हणजेच ९९.४९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. - कला शाखेतून सहा हजार ७२४ मुले आणि सहा हजार ७३८ मुली अशा १३ हजार ४६२ जणांनी परीक्षा दिली होती. त्यातील १३ हजार ४५४ म्हणजेच ९९.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.- व्होकेशनलमधून ७७८ मुले आणि २३१ मुली अशा एक हजार ९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली हाेती. त्यातील एक हजार ८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल ९९.९० लागला आहे. तर जुन्या अभ्यासक्रमाचाही यंदा घवघवीत निकाल लागला आहे. - विज्ञान शाखेतून १२५ मुले आणि ५९ मुली अशा १८४ जणांनी परीक्षा दिली होती. हे सर्व म्हणजे १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेच्या जुन्या अभ्यासक्रमासाठी ७८२ मुले आणि २७१ मुली अशा १०५३ जणांनी परीक्षा दिली होती. त्यातील १०५२ म्हणजेच ९९.९० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. - वाणिज्य शाखेच्या जुन्या अभ्यासक्रमाचाही १०० टक्के निकाल लागला आहे. परीक्षा दिलेले सर्व ६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याच बरोबर जुन्या अभ्यासक्रमातून व्होकेशनलसाठी बसलेले सर्व १०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 

कला शाखेतील सर्वाधिक विद्यार्थी फेल- बारावीच्या परीक्षेत मूल्यमापन करताना महाविद्यालयांतर्गत घेतल्या गेलेल्या विविध चाचण्या, प्रात्यक्षिक आणि मागील वर्षाच्या एकूण मूल्यांकनावर विद्यार्थ्यांना गुणदान करण्यात आले. याशिवाय काही विद्यार्थी नाव टाकल्यापासून काॅलेजकडे फिरकलेच नाही. तर काहींनी कुठल्याही परीक्षा, टेस्ट, प्रॅक्टीकल सादर केले नाही. असे विद्यार्थी परीक्षेत नापास झाले. यामध्ये कला शाखेतील ३८ मुले आणि १६ मुली, वाणिज्य शाखेतील सात मुले, एक मुलगी तर विज्ञान शाखेतील एक मुलगी या परीक्षेत अनुत्तीर्ण झाली आहे. 

 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल