शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार योजनेत इतर विभागांचाही सहभाग महत्त्वाचा

By admin | Updated: February 11, 2015 00:09 IST

जिल्ह्यातील ३७२ गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. ही सर्व गावे विकासाच्या बाबतीत परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने कामे करावयाची आहे.

दारव्हा : जिल्ह्यातील ३७२ गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. ही सर्व गावे विकासाच्या बाबतीत परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने कामे करावयाची आहे. त्यामुळे या योजनेशी संबंधीत यंत्रणेसोबतच विविध विभागांनीही या गावांमध्ये विकासाची कामे राबवून आपला सहभाग देणे आवश्यक आहे. त्यासाठी या विभागांनी विकासाचा आराखडा तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी केल्या.पालकमंत्र्यांनी दारव्हा तालुक्यातील विविध विकास कामे, जलयुक्त शिवार योजना व तालुक्यातील तलाठी कार्यालयाच्या बांधकामाचा आढावा दारव्हा येथील बचत भवन येथे आयोजित बैठकीत घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषद सदस्य पंढरी सिंहे, संगीता इंगोले, पंचायत समिती सभापती उज्वला बनसोड, उपसभापती प्रा.सुषमा गावंडे, सदस्य चरण पवार, जयश्री मिराशे, उपविभागीय अधिकारी मनोहर कडू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गायकवाड उपस्थित होते.जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत निवडण्यात आलेल्या गावांमध्ये जलसंधारण, पाणलोटची कामे करून या गावांमधील पाणी टंचाई कायमस्वरूपी निकाली काढायची आहे. त्यादृष्टीने संबंधीत यंत्रणा काम करीत आहे. परंतु एवढयावरच न थांबता ही गावे विकासाच्या दृष्टीने परिपूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे या गावांमध्ये पांदण रस्ते, पक्के रस्ते, इमारत बांधकाम, वृक्ष लागवड, विजेच्या समस्या, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा यांसह विविध प्रकारची कामेही करावयाची आहे. त्यामुळे निवडण्यात आलेल्या गावांमध्ये विकास कामे करण्यासाठी प्रत्येक विभागाने आठ दिवसात विकास आराखडा सादर करावा व कामे करावी, असे पालकमंत्र्यानी सांगितले. या कामांसाठी विभागांतर्गत असलेल्या निधीचा उपयोग करावा. निधी उपलब्ध नसल्यास मागणी करावी, असेही त्यांनी सांगितले.गावांमध्ये विकासाची कामे करीत असतांना गावकऱ्यांना विश्वासात घ्या. जलशिवार योजनेअंतर्गत कामांचे मूल्यमापन होणार असल्याने काळजीपूर्वक कामे केली जावी, असेही त्यांनी सुचविले. जिल्ह्यातील या योजनेतील गावे राज्यासाठी मार्गदर्शक ठरतील अशा पद्धतीने गावांमध्ये कामे करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. या योजनेंतर्गत दारव्हा तालुक्यातील ४६ गावांमध्ये कामे केली जात असून यावेळी या सर्व गावातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते. या सर्व गावातील विकास आराखडे करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित सरपंचांसह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी तालुक्यातील तलाठी कार्यालयाच्या बांधकामाचा आढावाही त्यांनी घेतला. जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी उपस्थित ४६ गावांचे सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांना मार्गदर्शन केले. (तालुका प्रतिनिधी)