शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

वादग्रस्त गाळे रिकामे करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 22:05 IST

शहरातील गांधी चौकातील नगरपालिकेचे १६० गाळे तातडीने रिकामे करून ते गाळे जाहिर लिलाव अथवा ई-निविदाद्वारे ३० वर्षांसाठी भाडे पट्ट्याने देण्यात यावे, असा आदेश नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी शुक्रवारी दिला. तसा अध्यादेशही जारी करण्यात आला आहे.

ठळक मुद्देवणीच्या व्यापाऱ्यांमध्ये खळबळ : नगरविकास मंत्रालयाने दिला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शहरातील गांधी चौकातील नगरपालिकेचे १६० गाळे तातडीने रिकामे करून ते गाळे जाहिर लिलाव अथवा ई-निविदाद्वारे ३० वर्षांसाठी भाडे पट्ट्याने देण्यात यावे, असा आदेश नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी शुक्रवारी दिला. तसा अध्यादेशही जारी करण्यात आला आहे.हा आदेश सोमवारपर्यंत वणी नगरपालिकेकडे पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान, या निर्णयामुळे वणीतील संबंधित व्यापाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून या निर्णयावर स्थगनादेश आणण्यासाठी संबंधित व्यापाऱ्यांनी हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे. संबंधित १६० गाळ्यांचा पुन्हा लिलाव करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका नगरसेवक पी.के.टोंगे यांनी दाखल केली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश नगरविकासमंत्र्यांना दिले होते. त्यानंतर नगरविकासमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी संबंधित व्यापारी, याचिकाकर्ते पी.के.टोंगे व पालिकेचे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर ना.रणजित पाटील यांनी याप्रकरणावर निकाल देत सदर १६० गाळे तातडीने रिकामे करून घेण्याचा आदेश नगरपालिकेला बजावला आहे.वणी नगरपरिषदेच्या शिट क्रमांक १९ (अ) व १९ (ब) मधील जमीन मध्यप्रदेश सरकारने २३ फेब्रुवारी १९५६ मध्ये यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शिफारशीवरून वणी नगरपरिषदेला हस्तांतरीत केली होती. त्यानंतर नगरपालिकेने २५ हजार ५०० चौरस फूट जागेवर १६० गाळ्यांचे बांधकाम केले. १९९५६ साली या गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर निवार्सीतांकरिता ३० रूपये व इतरांकरिता १०० ते ३०० रूपयापर्यंत वार्षिक भाडे आकारून गाळ्यांचे वाटप करण्यात आले. वेळोवेळी अल्प प्रमाणात या भाड्यात वाढ करण्यात आली. २०१२ मध्ये ही वाढ तीनपट झाली. भाडेवाढीसंदर्भात पी.के.टोंगे यांनी २०१४ मध्ये याचिका दाखल केली होती. त्यात टोंगे यांना प्रादेशिक संचालक न.प.प्रशासन अमरावती व जिल्हाधिकारी यवतमाळ यांचा संदर्भ दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर यवतमाळच्या जिल्हाधिकाºयांनी गाळेधारकाकडून सदर गाळे रिकामे करण्याचे आदेश दिले होते. परंतु गाळेधारक नंदकिशोर खत्री व सुभाष गेलडा यांनी २०१५ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्याच काळात शिवलामल शुगवाणी व गुरूमुख केशवानी यांनी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे अपिल दाखल केली होती. त्यावर निर्णय होऊन गाळेधारकांना गाळ्यांचे मुल्यांकन करून भाड्याची आकारणी करावी व ३० वर्षाकरिता ते गाळे त्याच व्यापाºयांना भाडे पट्ट्यावर देण्यात यावे, असे आदेश सन २०१५ मध्ये देण्यात आले होते. त्याविरोधात पी.के.टोंगे यांनी उच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल केली. त्यावरून उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश नगरविकासमंत्र्यांना दिले होते.

टॅग्स :ministerमंत्री