शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांसाठी शिक्षणाची संधी

By admin | Updated: January 3, 2016 02:57 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी भारतीय जैन संघटनेने पुढाकार घेतला असून जिल्ह्यातील अशा ५० मुलामुलींची निवड केली जाणार आहे.

भारतीय जैन संघटनेचा पुढाकार : पुणे येथे होणार शिक्षण पूर्णयवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी भारतीय जैन संघटनेने पुढाकार घेतला असून जिल्ह्यातील अशा ५० मुलामुलींची निवड केली जाणार आहे. पाचवी ते बारावीपर्यंतच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली जाणार असून पुणे येथील शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात त्यांचे शिक्षण पूर्ण केले जाणार आहे. भारतीय जैन संघटना गत दोन दशकांपासून शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासंदर्भात कार्य करीत आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा आणि राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख यांच्या नेतृत्वात पुणे येथील वाघोली परिसरात सुसज्ज शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. भारतीय जैन संघटनेने शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केले असून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांचे शिक्षण अर्ध्यावर थांबू नये म्हणून प्रयत्न केले जात आहे. त्याअंतर्गतच जिल्ह्यातील ५० मुलांची निवड करून त्यांना पुणे येथील शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाचवी, सहावी, सातवी, आठवी, नववी, दहावी, अकरावी आणि बारावीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांची यासाठी निवड केली जाणार आहे. ज्या शेतकरी कुटुंबात सन २०१४ आणि २०१५ या वर्षात वडील किंवा आजोबाने आत्महत्या केली, अशा कुटुंबातील मुलामुलींची निवड केली जाणार आहे. या मुलामुलींना पुणे येथील शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पासोबतच भारतीय जैन संघटनेचे सर्व सोयीयुक्त वसतिगृह आहे. येथे या मुलांच्या राहण्याची, जेवणाची, शैक्षणिक साहित्य, कपड्यांची, आरोग्याची तसेच मुलांच्या संपूर्ण विकासासाठी प्रयत्न केले जाणार आहे, शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात आल्हाददायक वातावरणात शिक्षण पूर्ण होणार आहे. आपल्या मुलामुलींचे भविष्य उज्ज्वल करू इच्छिणाऱ्यांनी ‘लोकमत’ जिल्हा कार्यालय, पृथ्वी वंदन, गांधी चौक, यवतमाळ (०७२३२-२४३११९, २४५११९) येथे विद्यार्थ्यांच्या संपूर्ण माहितीसह अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)