शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांसाठी शिक्षणाची संधी

By admin | Updated: January 3, 2016 02:57 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी भारतीय जैन संघटनेने पुढाकार घेतला असून जिल्ह्यातील अशा ५० मुलामुलींची निवड केली जाणार आहे.

भारतीय जैन संघटनेचा पुढाकार : पुणे येथे होणार शिक्षण पूर्णयवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी भारतीय जैन संघटनेने पुढाकार घेतला असून जिल्ह्यातील अशा ५० मुलामुलींची निवड केली जाणार आहे. पाचवी ते बारावीपर्यंतच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली जाणार असून पुणे येथील शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात त्यांचे शिक्षण पूर्ण केले जाणार आहे. भारतीय जैन संघटना गत दोन दशकांपासून शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासंदर्भात कार्य करीत आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा आणि राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख यांच्या नेतृत्वात पुणे येथील वाघोली परिसरात सुसज्ज शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. भारतीय जैन संघटनेने शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केले असून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांचे शिक्षण अर्ध्यावर थांबू नये म्हणून प्रयत्न केले जात आहे. त्याअंतर्गतच जिल्ह्यातील ५० मुलांची निवड करून त्यांना पुणे येथील शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाचवी, सहावी, सातवी, आठवी, नववी, दहावी, अकरावी आणि बारावीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांची यासाठी निवड केली जाणार आहे. ज्या शेतकरी कुटुंबात सन २०१४ आणि २०१५ या वर्षात वडील किंवा आजोबाने आत्महत्या केली, अशा कुटुंबातील मुलामुलींची निवड केली जाणार आहे. या मुलामुलींना पुणे येथील शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पासोबतच भारतीय जैन संघटनेचे सर्व सोयीयुक्त वसतिगृह आहे. येथे या मुलांच्या राहण्याची, जेवणाची, शैक्षणिक साहित्य, कपड्यांची, आरोग्याची तसेच मुलांच्या संपूर्ण विकासासाठी प्रयत्न केले जाणार आहे, शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात आल्हाददायक वातावरणात शिक्षण पूर्ण होणार आहे. आपल्या मुलामुलींचे भविष्य उज्ज्वल करू इच्छिणाऱ्यांनी ‘लोकमत’ जिल्हा कार्यालय, पृथ्वी वंदन, गांधी चौक, यवतमाळ (०७२३२-२४३११९, २४५११९) येथे विद्यार्थ्यांच्या संपूर्ण माहितीसह अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)