शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
5
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
6
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
7
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
8
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
9
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
11
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
12
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
13
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
14
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
15
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
16
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
17
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
18
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
19
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
20
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा

थकबाकीदार ग्राहकांना अभय योजनेची संधी

By admin | Updated: September 28, 2016 00:47 IST

वीज वितरण कंपनीच्या थकीत वीज बिलामुळे ज्या ग्राहकांचा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे

महावितरण : २५ वर्र्षांत ३८ लाख ग्राहकांची जोडणी कापलीयवतमाळ : वीज वितरण कंपनीच्या थकीत वीज बिलामुळे ज्या ग्राहकांचा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे अशा ग्राहकांसाठी आता महावितरणकडून अभय योजना राबविली जाणार आहे. नोव्हेंबर २०१६ पासून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. सातत्याने आपल्याकडे विजेच्या बिलाची रक्कम न भरल्यामुळे थकबाकीदार झालेल्या ग्राहकांची वीज जोडणी महावितरणने कापली आहे. अशा ग्राहकांना आता पुन्हा एकदा अभय योजनेंतर्गत मुख्य प्रवाहात सामावून घेवून त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे. जिल्ह्यात हजारोच्या संख्येने असे ग्राहक आहे, तर राज्यातून एकूण ३८ लाख थकबाकीदार वीज ग्राहकांना अभय योजनेचा फायदा होवू शकतो. जून २०१६ अखेरपर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या लाखो वीज ग्राहकांच्या थकबाकीचा आकडा पाच हजार ४०० कोटी रुपयांचा असल्याचे सांगण्यात येते. गेल्या २५ वर्षांच्या कालावधीत विविध कारणांमुळे या लाखो वीज ग्राहकांचा पुरवठा महावितरणने खंडित केला आहे.येत्या नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्याच्या कालावधीत वीज ग्राहकांना मुद्दल आणि दंडाची रक्कम भरून वीजपुरवठा पूर्ववत करता येणार आहे. महावितरणने संजीवनी योजनेंतर्गत व्याजाची रक्कम माफ करण्याचे ठरविले आहे. त्यामुळेच व्याजाच्या रकमेतूनही सवलत मिळवत थकबाकीदार ग्राहकांना आपली वीज जोडणी पूर्ववत करता येईल. परंतु गेल्या २५ वर्षामध्ये कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेले ग्राहक कोणत्या माध्यमातून वीज वापरतात हा प्रश्नदेखील महावितरणसमोर आहे. या बाबीचा शोध घेण्याचे आवाहनसुद्धा महावितरणसमोर निश्चितच आहे. (प्रतिनिधी)मुद्दल व दंडाची रक्कम भरून वीजपुरवठा पूर्ववत होईलविविध कारणांमुळे गेल्या २५ वर्षात राज्यातील ३८ लाख वीज ग्राहकांची वीज जोडणी बंद करण्यात आल्यामुळे ते कायमस्वरूपी थकबाकीदार झाले. आता या सर्व वीज ग्राहकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न महावितरणकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी अभय योजना राबविली जाणार असून नोव्हेंबरमध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत २५ वर्षात थकबाकीदार झालेले वीज ग्राहक जर पुन्हा आपली वीज जोडणी पूर्ववत करू इच्छित असल्यास त्यांना संधी आहे. त्यासाठी त्यांना वीज बिलाची मुद्दल व दंडाची थकीत रक्कम भरून वीज पुरवठा पूर्ववत करता येईल. याचा लाभ घेण्याचा अशा ग्राहकांनी प्रयत्न करणे महावितरणच्याही फायद्याचेच आहे. कारण काही प्रमाणात का होईना महावितरणची वसुली यातून होणार आहे.