शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदार ग्राहकांना अभय योजनेची संधी

By admin | Updated: September 28, 2016 00:47 IST

वीज वितरण कंपनीच्या थकीत वीज बिलामुळे ज्या ग्राहकांचा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे

महावितरण : २५ वर्र्षांत ३८ लाख ग्राहकांची जोडणी कापलीयवतमाळ : वीज वितरण कंपनीच्या थकीत वीज बिलामुळे ज्या ग्राहकांचा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे अशा ग्राहकांसाठी आता महावितरणकडून अभय योजना राबविली जाणार आहे. नोव्हेंबर २०१६ पासून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. सातत्याने आपल्याकडे विजेच्या बिलाची रक्कम न भरल्यामुळे थकबाकीदार झालेल्या ग्राहकांची वीज जोडणी महावितरणने कापली आहे. अशा ग्राहकांना आता पुन्हा एकदा अभय योजनेंतर्गत मुख्य प्रवाहात सामावून घेवून त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे. जिल्ह्यात हजारोच्या संख्येने असे ग्राहक आहे, तर राज्यातून एकूण ३८ लाख थकबाकीदार वीज ग्राहकांना अभय योजनेचा फायदा होवू शकतो. जून २०१६ अखेरपर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या लाखो वीज ग्राहकांच्या थकबाकीचा आकडा पाच हजार ४०० कोटी रुपयांचा असल्याचे सांगण्यात येते. गेल्या २५ वर्षांच्या कालावधीत विविध कारणांमुळे या लाखो वीज ग्राहकांचा पुरवठा महावितरणने खंडित केला आहे.येत्या नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्याच्या कालावधीत वीज ग्राहकांना मुद्दल आणि दंडाची रक्कम भरून वीजपुरवठा पूर्ववत करता येणार आहे. महावितरणने संजीवनी योजनेंतर्गत व्याजाची रक्कम माफ करण्याचे ठरविले आहे. त्यामुळेच व्याजाच्या रकमेतूनही सवलत मिळवत थकबाकीदार ग्राहकांना आपली वीज जोडणी पूर्ववत करता येईल. परंतु गेल्या २५ वर्षामध्ये कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेले ग्राहक कोणत्या माध्यमातून वीज वापरतात हा प्रश्नदेखील महावितरणसमोर आहे. या बाबीचा शोध घेण्याचे आवाहनसुद्धा महावितरणसमोर निश्चितच आहे. (प्रतिनिधी)मुद्दल व दंडाची रक्कम भरून वीजपुरवठा पूर्ववत होईलविविध कारणांमुळे गेल्या २५ वर्षात राज्यातील ३८ लाख वीज ग्राहकांची वीज जोडणी बंद करण्यात आल्यामुळे ते कायमस्वरूपी थकबाकीदार झाले. आता या सर्व वीज ग्राहकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न महावितरणकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी अभय योजना राबविली जाणार असून नोव्हेंबरमध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत २५ वर्षात थकबाकीदार झालेले वीज ग्राहक जर पुन्हा आपली वीज जोडणी पूर्ववत करू इच्छित असल्यास त्यांना संधी आहे. त्यासाठी त्यांना वीज बिलाची मुद्दल व दंडाची थकीत रक्कम भरून वीज पुरवठा पूर्ववत करता येईल. याचा लाभ घेण्याचा अशा ग्राहकांनी प्रयत्न करणे महावितरणच्याही फायद्याचेच आहे. कारण काही प्रमाणात का होईना महावितरणची वसुली यातून होणार आहे.