शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

देशभरातील शाळांमध्ये ‘आॅपरेशन डिजिटल बोर्ड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 20:49 IST

देशभरातील शाळांमध्ये सुरू असलेल्या ‘आॅपरेशन ब्लॅक बोर्ड’च्या धर्तीवर आता केंद्र सरकार ‘आॅपरेशन डिजिटल बोर्ड’ योजना राबविणार आहे.

ठळक मुद्देएक्स्पर्ट कमिटी स्थापन पहिल्या टप्प्यात दीड लाख शाळा होणार डिजिटल

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : देशभरातील शाळांमध्ये सुरू असलेल्या ‘आॅपरेशन ब्लॅक बोर्ड’च्या धर्तीवर आता केंद्र सरकार ‘आॅपरेशन डिजिटल बोर्ड’ योजना राबविणार आहे. योजनेचा आराखडा तयार करण्यासाठी देशभरातील आयटी तज्ज्ञांची समिती मानवसंसाधन विकास मंत्रालयाने गठीत केली असून त्यात महाराष्ट्रातील संदीप गुंड या शिक्षकांचाही समावेश आहे. येत्या शैक्षणिक सत्रात पहिल्या टप्प्यात देशातील दीड लाख शाळा डिजिटल केल्या जाणार आहेत.१९८५ पासून देशात ‘आॅपरेशन ब्लॅक बोर्ड’ योजना राबविली जात आहे. मात्र बदलत्या काळानुसार आता शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे आता शाळांमध्ये खडू फळ्याऐवजी आता डिजिटल बोर्ड येणार आहेत. आॅपरेशन डिजिटल बोर्ड योजना तयार करण्यासाठी मानवसंसाधन विकास मंत्रालयाच्या विशेष सचिव रिना राय यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे. यात एन. सर्वणकुमार, मद्रास आयआयटीचे प्रा. अशोक झुनझुनवाला, मद्रास आयआयटीचे संचालक प्रा. भास्कर रामामूर्ती, कानपूर आयआयटीचे प्रा. अभय कर्नंदीकर, मुंबई आयआयटीचे प्रा. कन्नन मौदगल्य, अझिम प्रेमजी फाउंडेशनचे जी. अनंत पद्मनाभन, बंगळूरूच्या एकस्टेप संस्थेचे सीईओ शंकर मारवाडा, अक्षरा फाउंडेशनचे अशोक कामत या तज्ज्ञांनाच समावेश आहे. विशेष म्हणजे, या कमिटीमध्ये देशभरातून केवळ संदीप गुंड (पष्टेपाडा) या एकमेव शिक्षकाची नेमणूक झाली.केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाच्या जानेवारीत झालेल्या बैठकीतच या योजनेबाबत निर्णय घेण्यात आला होता. नुकतीच तज्ज्ञांची समिती गठीत झाली समितीच्या बैठक दिल्ली येथील शास्त्री भवनात झाली. त्यात तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांनी डिजिटल अध्यापनाबाबत सादरीकरण केले. कमीत कमी खर्चात ‘मेन्टनंन्स फ्री’ स्मार्ट क्लासरूम उभारून डिजिटल अध्यापन कसे करता येईल, यावर गुंड यांनी भर दिला. लवकरच या समितीची पुढील बैठक पुणे, बंगरूळू किंवा दिल्लीत होणार असून स्वत: मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यात समितीने डिजिटल क्लासरूमबाबत ठेवलेल्या विविध पर्यायांपैकी प्रभावी पर्यायावर शिक्कामोर्तब होणार आहे.खडू फळा योजनेप्रमाणेच आॅपरेशन डिजिटल बोर्ड देशपातळीवर राबविण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी दीड लाख शाळा डिजिटल होण्याची शक्यता असून येत्या पाच वर्षात देशातील प्रत्येक शाळा डिजिटल करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.महाराष्ट्राची चळवळ झाली देशव्यापीकमीत कमी खर्चात डिजिटल स्कूल ही संकल्पना सर्वप्रथम महाराष्ट्रात सुरू झाली. शिक्षण सचिव नंदकुमार यांच्या मार्गदर्शनात पष्टेपाडाचे शिक्षक संदीप गुंड यांनी या चळवळीसाठी हजारो शिक्षकांना प्रशिक्षित केले. मानव संसाधन विकास मंत्रालयाचे सचिव अनिल स्वरुप यांनी स्वत: पष्टेपाडा शाळेला भेट देऊन ही चळवळ जाणून घेतली. संदीप गुंड यांना गुजरात, ओडिशा अशा विविध राज्यातही मार्गदर्शनासाठी पाचारण करण्यात आले होते. आता खुद्द केंद्र सरकारने डिजिटल स्कूल ही चळवळ देशभरात राबविण्याचा निर्णय घेतला असून त्यातही तज्ज्ञांच्या समितीत संदीप गुंड यांचा समावेश करण्यात आला आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र