शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

दिग्रस एमआयडीसीत उद्योगांचीच वाणवा

By admin | Updated: April 30, 2016 02:41 IST

बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, उद्योजकांना आकर्षित करता यावे, यासाठी दिग्रस येथे एमआयडीसीची स्थापना करण्यात आली.

दिग्रस : बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, उद्योजकांना आकर्षित करता यावे, यासाठी दिग्रस येथे एमआयडीसीची स्थापना करण्यात आली. मात्र याठिकाणी गेल्या कित्येक वर्षात एकही उद्योग उभारता आला नाही. एमआयडीसीचा फलक बेरोजगारांना मात्र वाकुल्या दाखवित उभा आहे. दिग्रस हा आदिवासी बहुल तालुका आहे. या तालुक्यात शेतमजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कोणताही उद्योग नसल्यामुळे तरुणांच्या हातालाही काम मिळत नाही. येथे असलेले कापसावरील प्रक्रिया उद्योगही बंद पडले आहेत. तसेच खादी ग्रामोद्योगचा असलेला उद्योगही कायमचा बंद आहे. यामुळे तरुणांना रोजगारासाठी मोठ्या शहराकडे धाव घ्यावी लागते. तरुणांना तालुक्याच्या ठिकाणीच रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी दिग्रस येथे एमआयडीसीची स्थापना करण्यात आली. आर्णी मार्गावर जमीन अधिग्रहित करण्यात आली. एमआयडीसीने मोठा फलकही लावला. मात्र एकही उद्योजक या एमआयडीसीत उद्योग उभा करण्याची हिंमत करीत नाही. त्याला कारणही तसेच आहे. एमआयडीसीत कोणत्याही सुविधा नाही. परिसराला झुडुपी वनस्पतीने व्यापले आहे. वीज, पाणी आणि रस्त्याचीही सुविधा नाही. त्यामुळे कुणी येथे उद्योग उभारण्यास तयार नाही. (प्रतिनिधी)